™🇮🇳
31K views •
#😔भाविकांच्या कारचा अपघातात 5 जण ठार 🔴
भक्तीच्या ओढीने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटच्या दिशेने निघालेल्या भाविकांवर वाटेतच काळाने झडप घातली आहे. पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून सहा मित्र अर्टिका कारने स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास देवडी पाटीजवळ गाडी आली असता, भरधाव वेगामुळे चालकाचा ताबा सुटला. कार रस्त्यापासून तब्बल दहा ते पंधरा फूट दूर जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये अडकले होते. माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ज्योती जयदास टाकले (वय ३७, रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
1️⃣ माला रवी साळवे (वय ४०)
रा. पंचशील नगर झोपडपट्टी, सेक्टर १८, न्यू पनवेल
2️⃣ अर्चना तुकाराम भंडारे (वय ४७)
रा. सेक्टर ७, खांदा कॉलनी, पनवेल पश्चिम
3️⃣ विशाल नरेंद्र भोसले (वय ४१)
रा. आरबीआय एमएसओ रूम नं. ८, रेल्वे कॉलनी, पनवेल स्टेशनजवळ
4️⃣ अमर पाटील
रा. खारघर
5️⃣ आनंद माळी
देवदर्शनासाठी आनंदाने निघालेला प्रवास असा दुःखद शेवट गाठेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या अपघातामुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेगावर नियंत्रण आणि सुरक्षित वाहनचालना किती महत्त्वाची आहे, हेच या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #भावपूर्ण श्रद्धांजली #ब्रेकिंग न्यूज
181 likes
3 comments • 296 shares