*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२९ एप्रिल इ.स.१६६१*
छत्रपती शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले छत्रपती शिवरायांनी फेब्रुवारी ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.
*२९ एप्रिल इ.स.१६८२*
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."
#शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜