#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
#१२_जून_१६४९
मराठ्यांनी चाकण प्रांत व किल्ले संग्रामदुर्ग स्वराज्यात दाखल करून घेतले.
चाकण हा भुईकोट आहे व चाकणची निर्मिती कोणी केली हे अद्यापही ठाऊक नाही. बहामनीच्या राजवटीत चाकण हे सुभ्याचं मुख्य ठिकाण होतं. पुढे चाकणच्या किल्ल्यासाठी अहमद निजाम व बहामनी सरदार आदिलखान (आदिलशाहीचा संस्थापक) यांच्यात लढाई होऊन चाकणचा सुभेदार जैनुद्दीनसह सातशे जण मारले गेले. निजामशाहीचा अस्त होईपर्यंत चाकण निजामाच्याच ताब्यात होते.
शहाजीराजांनी सन १६६३ मध्ये निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी चाकण शहाजीराजांच्या ताब्यात होते.
स्वराज्य स्थापनेच्या वेळी चाकण आदिलशाहीच्या ताब्यात असून त्यावर आदिलशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हा होते.
आदिलशाहीने चाकणचं नाव इस्लामाबाद केले होतं. पुढे शिवाजी महाराजांनी चाकणचा इस्लामाबाद जिंकून घेतला.
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांचे मन जिंकून घेऊन त्यांना स्वराज्याच्या कामी आणलं, शिवाजी राजांनी चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवून फिरंगोजी नरसाळा यांनाच किल्लेदारी दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
#१२_जून_१६७४
इंग्रज आणि शिवराय यांत तह झाला.
तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले.
मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा
मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
#१२_जून_१६६५
"पुरंदर किल्ला" सय्यद मुहम्मद जवार याच्याकडे देऊन गड मिर्झाराजे जयसिंहाच्या ताब्यात गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
#१२_जून_१७३२
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी तंटा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻🚩🏇🏻
#१२_जून_१८९६
इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगडला भेट दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभूराजे
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇