Follow
mahesh m. shirkar
@301598477
1,788
Posts
5,704
Followers
mahesh m. shirkar
535 views
5 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३ जून इ.स.१६७३* छत्रपती शिवराय व थोमास निकल्स यांची किल्ले रायगडावर भेट. *३ जून इ.स. १६७४* छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती याग, पूजा, गोदान केले. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
428 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२ जून इ.स.१६६४* छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा(सिंहगड)किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला. *२ जून इ.स.१६६५* किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले. *२ जून इ.स.१६७४* छञपती शिवरायांनी राजाभिषेकापूर्वी नक्षञयञ आणि उत्तरपूजन विधी केले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
611 views
2 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१ जून इ.स.१६७४* छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी आजच्या दिवशी दानधर्म केला. *१ जून इ.स.१६८१* रायगडाच्या उत्तरेस पंचवीस मैलांवर नागोठाण्याजवळ अंबा नदीच्या काठी पाली येथे शहजाद्यास त्यांनी आणून किल्ल्याच्या पायथ्याशी एक घर मोकळे करून दिले. तेव्हा अकबरासोबत ४०० घोडेस्वार, थोडे पायदळ, ५० उंट ओझ्याचे सामान घेऊन छत्रपती संभाजी राजांचा पाहुणचार घेऊ लागले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
545 views
3 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* #३१_मे... #राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची जयंती... स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभावंत, लोकाभिमुख रणरागीणी... अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं. ११ डिसेंबर १७६७ रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु हळू-हळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली. इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. राजमाता अहिल्याराणी होळकर (३१ मे १७२५) यांच्या जयंती निमित्त... त्यांच्या समाज उध्दारक कार्य, प्रेरणादाई सक्षम विचारांना व दैदिप्यमान कार्याला...🔥 मानाचा क्रांतिकारी मुजरा...🚩 #अहिल्यादेवी_होळकर #जयंतीनिमित्त_विनम्र_अभिवादन #🚩शिवराय #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
484 views
5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२९ मे इ.स.१६५८* औरंगजेबाला दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली. या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता. त्याचे नाव शेख मीर. हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला. या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले. ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. *दि. २९ मे इ.स.१६७४* यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ‘ बटु ‘ स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय
mahesh m. shirkar
740 views
6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२८ मे इ.स.१६६४* सिंहगडावरील निकामी हल्ल्यानंतर हताश होउन जसवंतसिंह वेढा उठवून औरंगाबादला परतला. नोवेम्बर १६६३ पासून तो सिंहगड किल्ल्यास वेढा घालून बसला होता. ५ एप्रिल १६६३ रोजी सुमारे २ वर्षे लालमहालात ठाण मांडून बसलेल्या शास्ताखान उर्फ़ शाहिस्तेखानावर शिवरायांचा आकस्मिक छापा घातला. 'चैत्र शुद्ध अष्टमी' म्हणजेच रामनवमीच्या आदल्या दिवशी आणि मुस्लिम लोकांच्या रोज्याच्या ६ व्या दिवशी धक्कादायक असा छापा. खान कसाबसा पसार मात्र खानाची ३ बोटे कापली. जिवाच्या भीतीने खान तिकडून जो पळाला तो थेट औरंगाबादला जाउन थांबला. मात्र त्याने जसवंतसिंह यांस सिंहगड किल्ल्या जिंकायची आज्ञा केली होती. *२८ मे इ.स.१६७४* छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेकाच्या १० दिवस आधी मुंज करण्यात आली. *२८ मे इ.स.१६६४* महाराजा जसवंतसिंहाने सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या सर्व सैन्याला परत निघण्याचा आदेश देऊन तळ सोडला. *२८ मे इ.स.१६६८* छत्रपती शिवाजी महाराजांचा व फिरंग्यांचा कुडाळ येथे तह झाला *२८ मे इ.स.१६८७* गोवळकोंड्याचा वेढा चालू असताना 'शेख निजाम' नावाचा एक सरदार औरंगजेबास येऊन मिळाला. बादशहाने लगेच त्यास ६००० मनसब व 'मुकरबखान' किताब दिला. *२८ मे इ.स.१७०१* दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने पन्हाळगड - पावनखिंड जिंकला. आता तो निघाला विशाळगड जिंकायला. औरंगजेबाने अखेर तह करून विशाळगड २७ मे १७०२ रोजी ताब्यात घेतला. पन्हाळगड - पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला त्याला बरोबर १ वर्ष लागले #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩शिवराय #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
578 views
7 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *२७ मे इ.स.१६४२* छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरला एक गाव भेट दिले *२७ मे इ.स.१६६५* *छत्रपती शिवरायांनी* मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदीलशहाशी बोलणी करूण त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला *२७ मे इ.स.१६७२* *छत्रपती शिवरायांनी* स्वता जातीने मे च्या शेवटच्या आठवड्यात मराठा फौजेसह हरीश्चंद्रगड, चामुंडगड, किल्ले हडसर, महेशगड, किल्ले जीवधन आदी गड-किल्ल्यांवर हल्ले केले *२७ मे इ.स.१७०२* दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेब बादशहाने आज अखेर मराठ्यांकडून "विशाळगड" जिंकला. किल्ले पन्हाळा, पावनखिंड जिंकून विशाळगड ताब्यात घ्यायला औरंगजेबला बरोबर एक वर्ष लागले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
1K views
9 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *२५ मे इ.स.१६६२* शाईस्तेखानाचे दोन सरदार सरफराज खान व नामदार खान या दोघांनी नेताजी पालकरांचा सुप्याजवळील लढाईत पराभव केला व अल्पशी लूट मिळवली. *२५ मे इ.स.१६६६* महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले असताना एके दिवशी एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले, ' महाराज , हे पाहा काय! ' महाराज अन् सर्वचजण उठले, दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज, शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतुनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा ( गुप्त राजकीय कामेधामे ) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
679 views
10 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *२४ मे इ.स.१६४८* विर *"बाजी पासलकर"* स्मृतीदिन. हि माहिती आवर्जून वाचा " रणझुंझार बाजीकाका पासलकर " यांची…!!! बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.तोरणा, सुभानमंगळ,रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले.विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजूरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता.खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला.मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता.छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भूईकोटावर चालून जाण्यास सांगितले.त्यांनी एका रात्रीत गड सर केला.तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर,कान्होजी जेधे,बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले,अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला,पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला.गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युध्द झाले.बाजी पासलकर,कान्होजी जेधे,गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली.फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले.दोघात तुंबळ युध्द झाले.अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासाखाशी गांठ पडली.एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार पडले.मग उभयतांकडील दळ आपले जागियास गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. #🚩शिवराय #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
646 views
11 days ago
*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩* *२३ मे इ.स.१६७३* *छत्रपती शिवरायांची* आपल्यावर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रज अधिकारी थाॅमस निकल्सन हा राजधानी किल्ले रायगड वर दाखल. रायगडाचे वर्णन करताना तो म्हणतो की,जर अन्नधान्य आणि अखंडीत दारूगोळा पुरवठा झाला तर हा किल्ला साऱ्या जगाविरूद्ध लढू शकतो. *२३ मे इ.स.१६९८* स्वराज्याचे तिसरे *छत्रपती राजाराम महाराज* यांच्या महाराणी राजसबाई यांच्या पोटी *संभाजीराजे(दुसरे)* यांचा जन्म. *२३ मे इ.स.१७२९* पेशवे थोरले बाजीराव यांनी अलाहबादचा सुभेदार महमंदखान बंगश याचा दारुण पराभव केला *२३ मे इ.स.१७३७* पोर्तुगीजांकडून जिंकल्यानंतर पेशवे थोरले बाजीराव यांनी अर्नाळा किल्ला पुन्हा बांधून घेतला. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩शिवराय