Follow
mahesh m. shirkar
@301598477
1,792
Posts
5,682
Followers
mahesh m. shirkar
659 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ एप्रिल इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला. *८ एप्रिल इ.स.१६७४* चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले. *८ एप्रिल इ.स.१६७५* छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. *८ एप्रिल इ.स.१६७८* दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन. *८ एप्रिल इ.स.१६८३* मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली. *८ एप्रिल इ.स.१८५७* क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते. बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
1.5K views
3 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *६ एप्रिल इ.स.१६५६* छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. *६ एप्रिल इ.स.१६६५* “इ.स. १६६५ एप्रिल ६.पोर्तूगीज व्हाईसराय शिवराय कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं.त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले.त्यांनी तुमची जहाजें झरुन आणूंन बंदरांत ठेवली.परंतू तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली. *६ एप्रिल इ.स.१६६६* छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
603 views
4 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *५ एप्रिल इ.स.१६६३* शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले. तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned. ऐन मध्यरात्र सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले. या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व मावळ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले... #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
395 views
5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *४ एप्रिल इ.स.१६६३* छत्रपती शिवराय 'किल्ले सिंहगडावर दाखल असतांना मावळ्यांनी शाहिस्तेखानावर आक्रमण केले. *४ एप्रिल इ.स.१६७०* नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, पळून पळून दमलेला दाऊदखान नगरला परतला. *४ एप्रिल इ.स.१६७९* छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी. *४ एप्रिल इ.स.१६८३* छत्रपती शिवरायांपासून स्वराज्यात असलेला मुन्शी "काझी हैदर" फितूर झाला. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
584 views
6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३ एप्रिल इ.स.१६८०* *आज ३ एप्रिल....* *#छत्रपती_शिवाजी_महाराज_पुण्यतिथी* *जगाच्या इतिहासतील एक सर्वात काळाकुट्ट भयाण दिवस आज हां दगडाचा सह्याद्री अश्रुन्नी भिजला होता,*त्या दुर्ग दुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने देखिल टाहो फोडला होता...*१६८० साली याच दिवशी शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही* *तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते, तारणहार राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले..* *ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक, अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम..* *अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय.पण गद्दरानो ख़बरदार, हा झंझावत पुन्हा जागृत होईल, लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल, ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल...* *जय शिवराय जय शिवराय जय शिवराय* *१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील..* *छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी केलेल्या अभंगापैकी एक अभंग शककर्ते शिवरायकार धर्मभास्कर कै. विजयराव देशमुख यांनी तंजावर येथील ऐतिहासिक सरस्वती महालात जाऊन संशोधीत केला आहे* *महाराजांनी आपल्या संपुर्ण आयुष्यात एक अभंग रचला असला तरी त्या एकाच अभंगात संपुर्णपणे आयुष्याचे सार सामावलेले आहे. ते सांगताना महाराज म्हणतात* *नाशिवंत सुखासाठी* *अंतरला जगजेठी* *याते नाही नाही रे गोडी* *लक्ष चौ-यौशीचे जोडी* *मनुष्यजन्म गेल्यावारे* *काय करशिल रे बारे* *शिवराजे सांगे जना* *म्या तो सोडली वासना* *युगपुरुष क्षत्रियकुलावंतस शककर्ते सम्राट छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ........* #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
422 views
7 days ago
भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् … जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर। कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें अंजनीसूत, पवनपुत्र श्री बजरंग बली की जय🚩 श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩 *#शिवविचार_प्रतिष्ठान* *#हनुमान_जन्मोत्सव* #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
408 views
7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१ एप्रिल इ.स.१६७०* छत्रपती शिवराय सुरतेवर पुन्हा हल्ला करण्याची अफवा पसरली. त्यांच्या बंदोबस्तासाठी गुजरातचा सुभेदार 'बहादूरशहा' ५००० फोजेसह सुरत मध्ये तळ ठोकून बसला. *१ एप्रिल इ.स.१६७३* छत्रपती शिवरायांचे सरसेनापती 'प्रतापराव गुजर' यांना आज्ञापत्र. "बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका". *१ एप्रिल इ.स.१६७३* मराठ्यांनी परळीचा किल्ला (सज्जनगड) जिंकला.गडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच या गडाचे नाव परळी पडले, या गावात २ अतिशय जीर्ण मंदीरे आहेत पण औरंगजेबच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झाला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
517 views
8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३१ मार्च इ.स.१६५९* *विशाळगड* छञपती शिवरायांनी इ.स.१६५९ मध्ये हा किल्ला जिंकला व याचे नामकरण केले विशाळगड ! विशाळगड हा मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासातील एका अचाट पराक्रमाचा साक्षीदार आहे आणि तो म्हणजे महाराजांची आदिलशाही सरदार सिद्दी जौहर याने टाकलेल्या पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका ! आणि यासाठी अवघे 300 मावळे घेऊन आठ तासांहूनी अधिक काळ हजारोंच्या फौजेला गजापूरच्या खिंडीत थोपवून धरणारे वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाचा ! पुढे छ. शिवरायांच्या मृत्यूनंतर छ. संभाजीराजांनी विशाळगडावर बराचसा काळ व्यतीत केला. त्यांनी या किल्ल्याची डागडुजी तसेच पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष दिले म्हणूनच आज आपल्याला विशाळगड हा किल्ला दिसत आहे. *३१ मार्च इ.स.१६६५* *"मिर्झाराजे जयसिंग" व "दिलेरखान पठाण" किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी दाखल. त्यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि ऐतिहासिक पुरंदरचा रणसंग्राम चालू झाला. #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
978 views
10 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३० मार्च इ.स.१६४५* *नरसप्रभू देशपांडेंना आदिलशाही सुभेदाराचे धमकीवजा पत्र* *वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली, रोहीडे व वेळवंड खोरे येथील देशपांडे, कुलकर्णी, दादाजी नरसप्रभू हे महाराजांच्या सोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथील सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले, या पत्रात दादाजी चिंतेत आहे हे कळताच राजांनी खालील पत्र पाठवले, " हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा आहे " आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनुसार आहे, हि धारणा त्यांनी या पत्रातून व्यक्त करून मनोबल वाढवले. *३० मार्च इ.स.१७२९* मराठ्यांनी थोरले बाजीरावच्या नेतृत्वाखाली जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
522 views
11 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२९ मार्च इ.स.१६६७* छत्रपती शिवरायांनी बांधण्यास सुरूवात केलेला "किल्ले सिंधुदुर्ग" बांधून पूर्ण झाला.जलदुर्गावर नव्या नेमणुका केल्या सिंधुदुर्गावर रायाजी भोसले यांना किल्लेदार म्हणून नेमणूक केली. *२९ मार्च इ.स.१६५७* औरंगजेबाने विजापूरकरांचा बिदरचा किल्ला जिंकला. यामागील हेतू विजापुरकारांचा जास्तीत जास्त मुलुख जिंकून मोगल साम्राज्य वाढवणे. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज