Follow
mahesh m. shirkar
@301598477
1,771
Posts
5,685
Followers
mahesh m. shirkar
496 views
3 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१५ एप्रिल इ.स.१६७३* स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली. प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले. आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची. राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. "सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात ? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत ? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका". होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्‍याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले. प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागले *१५ एप्रिल इ.स.१६८०* कारवार बंदरातील धान्य संभाजी महाराजांनी आणविले *१५ एप्रिल इ.स.१६८०* महाराजांच्या मृत्युनंतर शंभूराजांनी राजापूर, कुडाळकडील ‘कामावीसदारास’ पत्रे धन घेऊन पन्हाळ्यावर बोलावले तसेच कारवारच्या बंदरात धान्य होते ते त्यांनी आपणाकडे आणले. *१५ एप्रिल इ.स.१६८३* छत्रपती संभाजी राजांनी स्वत: १००० घोडदळ व २००० पायदळ घेऊन ‘तारापूर’ वर हल्ला केला आणि ते शहर जाळले. याशिवाय मराठ्यांनी दमण पासून वसई पर्यंत असलेल्या डहाणू, आसेरीम, सैबाना आणि इतर काही गावावर हल्ले केले. त्यांनी काही गावे लुटली, काही जाळली, होड्या व पाडाव हस्तगत केले आणि २ पोर्तुगीज पाद्री कैद केले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
602 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१४ एप्रिल इ.स.१६६४* जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली. *१४ एप्रिल इ.स.१६६५* इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता *१४ एप्रिल इ.स.१७३६* चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला. *१४ एप्रिल इ.स.१८९१* #डॉ._बाबासाहेब_आंबेडकर_जयंती भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल इ.स.१८९१ रोजी झाला. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
2.8K views
2 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१३ एप्रिल इ.स.१६६३* नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले. *१३ एप्रिल इ.स.१६६५* किल्ले पुरंदर चा लहान भाऊ अशी ओळख असलेला किल्ले वज्रगड चे तट बुरूज पडले. *१३ एप्रिल इ.स.१७००* छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली. *१३ एप्रिल इ.स.१७०४* संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला. *१३ एप्रिल इ.स.१७३१* छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
500 views
2 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१२ एप्रिल इ.स.१६६३* छत्रपती शिवराय शाहिस्तेखानाची फजिती करून पुन्हा गोवा मोहीमेसाठी रवाना झाले. *१२ एप्रिल इ.स.१७०३* मुघल फौजांनी सिंहगडावर तोफांचा मारा सुरू केला , त्यात औरंगजेबाने स्वतः जातीने हजर राहून सिंहगड जिंकून घेतला. पण फक्त ३ वर्षेच किल्ला मुघलांच्या ताब्यात राहिला .. १७०६ मध्ये मराठ्यांनी पुन्हा सिंहगड जिंकला आणि सिंहगड शेकडो वर्ष मराठ्यांकडेच राहिला. *१२ एप्रिल इ.स.१७३७* मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
619 views
4 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *११ एप्रिल इ.स.१६७४* छत्रपती शिवरायांनी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. *११ एप्रिल इ.स.१७३८* वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. *११ एप्रिल इ.स.१८२७* *#क्रांतिसूर्य_महात्मा_फुले_यांची_जयंती* अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करू या ! #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
1.9K views
4 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१० एप्रिल इ.स.१६६०* किल्ले पन्हाळगडास सिद्धि जोहरचा वेढा आदिलशाहीचा सरदार सिद्धि जोहर,सिद्धि मसूद आणि फाजल खानाने किल्ले पन्हाळ्याला चौफेर वेढा दिला होता.परंतु जोहरची कोणतीही तोफ गडाच्या अंगाला स्पर्श करू शकत नव्हती.मार्याच्या टप्यात पुढे सरकावे तर गडावरुन बंदूकी,तोफा आणि बाणांचा वार्षावाला सामोरे जाणे शक्य नव्हते एक दिवस तटाच्या रोखाने तोफेचा गोळा तटाच्या भिंतीवर धडकला. प्रचंड आवाज आणि हादरा, ही शिवछत्रपतींना आश्चर्याची आणि संतापाची ठीणगी होती. तटावरुन महाराजांनी वेढ्यातील छावनीचे निरीक्षण करताच शिवछत्रपतींना दिसली टोपीकर इंग्रजांची धूर्त बेईमानी तोफ आणि यूनियन जॅक झेंडे... दिड महिन्यांपूर्वी ज्या हेन्री रीव्हिंग्टन वर मेहेरबानी केली तोच कृतघ्न इंग्रज स्वराज्यावर आक्रमण करायला परक्याला परका सामील झाला होता. *१० एप्रिल इ.स.१६६२* छत्रपती शिवरायांनी आई तुळजा भवानी देवीची प्रतिष्ठापना केली. *१० एप्रिल इ.स.१६९३* १६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते. तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. *१० एप्रिल इ.स.१७५८* सरदार मानाजी पायगुडेंचा पराक्रम सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
945 views
6 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *८ एप्रिल इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला. *८ एप्रिल इ.स.१६७४* चिपळून येथे छत्रपती शिवरायांनी मराठी लष्कराची पाहणी केली. राजाभिषेकपूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे स्वराज्याचे सरसेनापतीपद हंबीरराव मोहीते यांना दिले. *८ एप्रिल इ.स.१६७५* छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. *८ एप्रिल इ.स.१६७८* दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन. *८ एप्रिल इ.स.१६८३* मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली. *८ एप्रिल इ.स.१८५७* क्रांतिकारी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा प्रकारे १८५७ च्या उठावातील पहिला क्रांतिकारक व पहिला हुतात्मा होण्याचा बहुमान मंगल पांडे यांस जातो. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा ब्रिटिशांवर इतका जबर्दस्त प्रभाव पडला होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे’ याच नावाने संबोधू लागले होते. बराकपूरच्या लष्करी छावणीमध्ये मंगल पांडे यांस फाशी देण्यात आले. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜
mahesh m. shirkar
1.5K views
8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *६ एप्रिल इ.स.१६५६* छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. *६ एप्रिल इ.स.१६६५* “इ.स. १६६५ एप्रिल ६.पोर्तूगीज व्हाईसराय शिवराय कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं.त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले.त्यांनी तुमची जहाजें झरुन आणूंन बंदरांत ठेवली.परंतू तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली. *६ एप्रिल इ.स.१६६६* छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
659 views
10 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *५ एप्रिल इ.स.१६६३* शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले. तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned. ऐन मध्यरात्र सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले. या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व मावळ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले... #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏
mahesh m. shirkar
395 views
11 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *४ एप्रिल इ.स.१६६३* छत्रपती शिवराय 'किल्ले सिंहगडावर दाखल असतांना मावळ्यांनी शाहिस्तेखानावर आक्रमण केले. *४ एप्रिल इ.स.१६७०* नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, पळून पळून दमलेला दाऊदखान नगरला परतला. *४ एप्रिल इ.स.१६७९* छत्रपती शिवरायांची विजापूरजवळ 'शहापूर' येथे स्वारी. *४ एप्रिल इ.स.१६८३* छत्रपती शिवरायांपासून स्वराज्यात असलेला मुन्शी "काझी हैदर" फितूर झाला. #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩