#😇भक्ती स्टेट्स #🙏भक्ती मोशन व्हिडिओ #🌻आध्यात्म 🙏 #अधिक मास तीन वर्षांनी एकदा येणारा अधिकमास, अर्थात बारा महिन्यात तेरावा असा हा विशेष महिना, या कालावधीत सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. याला मलमास असे म्हणत असून कोणतेही मंगलकार्य अधिकामासात होत नाही. पण प्रकृती आणि परिस्थिती पाहून अधिकमासात व्रत, दानपुण्य करावे असे सांगितले जाते. पण काही कारणामुळे दान करणे किंवा व्रत करणे शक्य झाले नाही तर काय करावे हे सुद्धा शास्त्रात सांगितले आहे
श्री पुरुषोत्तमाचा नामजप
श्री पुरुषोत्तमाची सेवा केल्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. म्हणून तर अधिकमासात दान, गोमातेची सेवा-पुजन, उपावास किंवा व्रतवैकल्य केली जातात पण समजा तुम्हाला यापैकी काहीही शक्य झाले नाही तर तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ असून, श्री पुरुषोत्तमाचा नामजप करणे म्हणजे त्या परमेश्वराच्या अधिक जवळ जाणे.
नामस्मरणाचे महत्त्व
भगवंताच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान प्राप्त झाले. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. अखंड नामस्मरणाने पावन झालेली ही काही उदाहरणे आहेत. म्हणून अधिकमासात अखंड नामस्मरण करा. भगवंताच्या नामोच्चरामुळे मन स्वच्छ होतं आणि मनातील सगळ्या शंका दूर होतात. तुम्ही बसल्या जागेवर भगवान श्रीपुरुषोत्तमाचे राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करू शकता. नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही. सतत भगवंताचे चिंतन केल्यामुळे थोर पुण्य लाभते असे सांगितलेले आहे.अधिकमासात स्नानदानादि व्रत नियम या सर्वापेक्षा भगवान पुरुषोत्तमाच्या, राधाकृष्णाच्या नामचिंतनाचा महिमा मोठा आहे.भगवंताच्या नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्रासदायक शक्ती नष्ट होते. साधकांचा अखंड नामजप चालू असेल, तर वाईट शक्ती साधकांच्या जवळसुद्धा येत नाही. भगवंताचा अखंड नामजप केल्याने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती साधकांना घेता येते.
नामस्मरण-मंत्रजप
नामस्मरण किंवा मंत्रजपामुळे वेगवेगळी कंपने निर्माण होतात. ही कंपने आपल्याला विविध फायद्यांकडे घेऊन जातात. मंत्रांचा पंचतत्त्वावर प्रभाव पडतो आणि त्याद्वारे आरोग्य, मानसिक स्थिती आणि मानसिक स्थितीपेक्षा सूक्ष्म अवस्था सुधारल्या जातात. ओम नमो नारायणाय किंवा ओम श्री गुरवये नमः या सारख्या मंत्राचा जप तुम्ही सहजपणे करु शकता. नामजप म्हणजे कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सुलभ अशी एकमेव उपासना आहे. समजा तुम्हाला नामजप करताना काही समस्या येत असेल तर दिवसभर घरात सीडी किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नामजपू लावून ठेवू शकता. त्यामुळे वास्तुशुद्धी देखील होते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते. तुमचे रोजचे व्यवहार करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे तुमची मंत्र साधना सुरु राहते तसेच तुमची रोजची कामे आणि व्यवहारदेखील पूर्ण होतात.
मन एकाग्र कसे करावे?
नामस्मरण किंवा जप करताना मन एकाग्र होत नाही. अनेक विचार मनात येतात किंवा डोळ्यासमोर काहीतरी विचित्र घडतं आहे असे वाटते. कोणता आवाज झाला किंवा कोणी काही बोलले तर लक्ष विचलीत होते, यावर उपाय म्हणून हळू आवाजात नामस्मरण करावे. यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. तुम्ही अधिकमासात नक्की नामस्मरण करा. यामुळे एकाग्रता वाढेल, मनात सकारात्मक विचार येतील. दुष्ट विचारांचा प्रभाव दूर होईल. तसेच सदैव परमेश्वराचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा देखील पूर्ण होतील.