संत

-Kalpana K
1.7K views
15 days ago
#💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश ❗️३१ जुलै❗️ ‼️जय हरि विठ्ठल‼️🙏🙏 🌹प्रवचनाचा विषय🌹 🟥🟥आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ.🟥🟥 🔹आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे.🔹 🔸️आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते.🔸️ ❄एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.❄ 🛟वसिष्ठांनी रामाला सांगितले की,"रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा."🛟 💮 'मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे,' ही दृढभावना ठेवून प्रपंच करावा.💮 🏵जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात 'राम कर्ता' मानून वागणारा तो पारमार्थिक, 'मी कर्ता' असे मानून वागणारा तो प्रापंचिक.🏵 ⭕ 'मी कर्ता' असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही,तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्ध झाले❗⭕ 🪞प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त राम आहे.🪞 🌀मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे.🌀 💠प्रपंचात आपण किती कष्ट करतो❗ तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये.💠 💢प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा.💢 ♦️हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ति आहे; आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे.हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.♦️ 🔹सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो.🔹 ❄️धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे;त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच❗❄️ 🎄#बोधवचन :'रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन.' अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते.🎄 🌷#प्रवचने:श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌷 🚩श्री राम जय राम जय जय राम🚩
-Kalpana K
936 views
25 days ago
#🌻आध्यात्म 🙏 #✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 ❗२१ जुलै❗ ‼जय हरि विठ्ठल‼ 🌷प्रवचनाचा विषय🌷 🟧🟧वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे.🟧🟧 🏵शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृत युगामध्ये ध्यानाने, त्रेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते.🏵 🔹️परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते.शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते.🔹️ ⭕मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही.⭕ 🔸️वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात.🔸️ ❄सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले.❄ 🛟वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे.🛟 💢जसा वेद हा अनादि, तसे नाम अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे.💢 🌀इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय.🌀 💠म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे. किंबहुना,आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो.💠 ♦️नाम घेणार्‍या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. ♦️ 💮भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. 💮 🔶️इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा.🔶️ 🌲#बोधवचन :इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.🌲 🌹#प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🌹 🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩