आंबेडकर पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आढावा...
भाग 4
'महाराष्ट्रातील किल्येक वृत्तपत्रे अज्ञान लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने आहेत. कारण त्यांना वृत्तपत्रे म्हणजे जनकल्याणाची, लोकजागृतीची व समाजपरिवर्तनाची साधने वाटत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आपल्या समकालीन काही वृत्तपत्रांना जे ध्येयशील पत्रकारितेच्या ध्येयापासून वंचित झाली होती, त्यांना वृत्तपत्रांच्या मूळ उद्दिष्टांची जाणीव करून देणारे टीकाही केली आहे.'
डॉ. आंबेडकरांचे समकालीन वृत्तपत्रे म्हणजे 'काळ', 'नवयुग', 'प्रभात', 'कुलाबा', 'समाचार', 'पुरुष 'पुरुषार्थ', 'सकाळ', 'भाला', 'लोकमान्य', 'अग्रणी', 'राष्ट्रवीर', 'केसरी', 'नवाकाळ' इत्यादी आहेत. यांची झेप मर्यादित होती. त्यामुळे सामाजिक सुधारणेत व मूलभूत सामाजिक परिवर्तनाला अग्रस्थान दिलेले दिसत नाही. डॉ. आंबेडकर प्रणित 'समता' या वृत्तपत्रानी प्रारंभ केले आणि त्यातून समताधिष्ठीत समाजव्यवस्था निर्माण होण्यास पूरक ठरणाऱ्या अग्रलेखनास प्रारंभ झाला. त्यातून एकसंघाने एका अस्पृश्यांचा विवाह वैदिक पद्धतीने घडून आला. त्यातून रोटी बंदी व बेटी बंदी तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचे निश्चित केले. डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्राने अस्पृश्यता निर्माण करणे, मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करणे, धार्मिक खोट्या कल्पना, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, जातीभेद ग्रंथप्रामाण्य नष्ट करणे ही उद्दिष्टे मानल्यामुळे या अनुषंगाने वैचारिक बुद्धिप्रामाण्ययुक्त अग्रलेखन व अन्य लेखन केलेले आहे.
'इतरांप्रमाणे आम्हालाही आमची मती आहेत आणि ती प्रतिपादने हा आमचा हक्क आहे. ते आमचे कर्तव्यही आहे, तेव्हा हेही लक्षात ठेवले पाहिजे की अस्पृश्यता हा प्रश्न इतर प्रश्नांपासून अजिबात वेगळा करणे शक्य नाही. जातीभेद, धर्मविषयक कल्पना, ग्रंथप्रामाण्य राजकीय हक्क व राजकीय चळवळ इत्यादी अनेक गोष्टींचा अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाशी कमीजास्त प्रमाणात संबंध पोचतो. अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत टोलटोलवी करायला आम्ही सवड देत नाही, हेच आमच्या कित्येक उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या टीकाकारांचा आमच्याइतका रोष आहे हे आम्ही जाणून आहोत.'
समकालीन वृत्तपत्रातून खालीलप्रमाणे काही टीका केलेल्या आहेत
(१) काळ : 'आम्ही डॉ. आंबेडकरांना एवढे सुचवू शकतो की ज्यात त्यांना काही समजत नाही व ज्याबद्दल त्यांना मुळीच आदर नाही, त्यात त्यांनी तोंड घालू नये व निष्कारण वाद चिघळू देऊ नये. डॉ. आंबेडकरांना सध्या जे महत्त्व प्राप्त झाले आहे, ते केवळ त्यांच्या गुणांमुळे नसून महार जातीत्वामुळे होय.'
(२) नवयुग : 'डॉ. आंबेडकरांचे बाष्फळ उद्गार होत. अशा प्रकारे 'भगवद्गीता', 'मनुःस्मृती' व अन्य धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यांचे तर्क कठोर मांडणी डॉ. आंबेडकरांनी करू नये.'
(३) भाला : 'तुम्ही केवळ देऊळ किंवा पाणवठे बाटविण्याचा प्रयत्न एकदम बंद करा, तसे न केल्यास आम्ही तुमच्या पाठी सडकू' त्यावर.
(४) बहिष्कृत भारत : 'आमच्या जो पाठी सडकील त्यांची आम्ही टाळकी सडकू.' डॉ. आंबेडकरांच्या या मुक्तीवादाला 'भाला'कार उत्तर देऊ शकले नाहीत व पुढे टीकाही केलेली नाहीत. पुढे डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेवर 'प्रभात' दैनिकाने विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी 'डॉ. आंबेडकर धर्मांतर करण्यास पुढे सरसावले, तर पुणे कराराप्रमाणे त्यांना मिळणाऱ्या सवलतीस त्यांना मुकावे लागेल म्हणून धर्मांतरापेक्षा पक्षांतर अधिक हितावह असेल, म्हणून त्याचा विचार व्हावा.'
(५) हंटर (संपादक: कोल्हापूरचे खंडेराव बागल १९२५) 'समता'
आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मिळेपर्यंत आम्ही उच्च म्हणविणाऱ्या जातीला स्वस्त बसू देणार नाही. हे या वृत्तपत्राचे धोरण होते. यातून सत्यशोधक तत्त्वांचा प्रसार, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम ऐक्य विचारांचा प्रसार केला जात होता. या वृत्तपत्राने डॉ. आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्रकरणाची बाजू घेतली.
(६) कुलाबा समाचार : (संपादक रामभाऊ मंडलीक, पुणे) या
वृत्तपत्राने राजकीय कीय चळवळीचे प्रमुख साधन मानले होते. सदर वृत्तपत्राने डॉ. आंबेडकरांच्या विचार व कार्यावर वेळोवेळी टीका करीत होते...
पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙