bhimsenik

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
509 views
9 hours ago
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दिनक्रम" ---------------------------------------------------- बाबासाहेब सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान उठत असत रात्री जरी ते उशिरापर्यंत वाचन लिखाण करीत तरीसुद्धा त्यांना सकाळी लवकर जाग येत असे. त्यांनंतर मुखार्जन व इतर प्रातःविधी उरकून ते चहा घेत असत चहा पिता पिता त्यांना वर्तमानपत्रे चाळण्याची सवय होती. त्यांनतर थोडा वेळ ते वर्तमान पत्र वाचत बसत .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना न्युरायटीस व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यावर योगासन हा एक चांगला इलाज होता. म्हणून बाबासाहेब नियमित रोज योगासने करीत असत .त्यानंतर थोडा वेळ व्यायाम केल्यावर ते बंगल्याच्या व्हरांड्यात येऊन आराम खुर्चीत बसत . त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर बाबासाहेबांच्या सर्वांगाला माॅलिश चे तेल लावून माॅलिश करीत असे . अशा प्रकारे नियमित माॅलिश करण्याची त्यांना सवय होती. ह्या माॅलिश चा हेतू हा कि त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन मज्जातंतुना तरतरी यावी. अशी त्यांची माॅलिश जवळ -जवळ अर्धातास चालत असे. योगासने व माॅलिश हा करणे हा त्यांच्या आजारावरील उपचाराचा एक भाग होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंघोळीला जात असत आंघोळ झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब सकाळच्या न्याहरी ( brekfast ) करण्यासाठी डायनिंग टेबल वर येऊन बसत साधारण ८-ते -९ च्या दरम्यान ते न्याहरी करिता ते टेबलावर हजर असत. डॉ. बाबासाहेबांच्या न्याहरीचा पहिला पाॅरिज कोर्स असे. पाॅरिज म्हणजे उकळलेले ओट्स ( Boiled Oats ). हे उकळलेले ओट्स दुधात चांगल्या रीतीने मिसळायचे म्हणजे झाला तयार पॉरीज कोर्स ! ह्या दुधात थोडे बादामवाटून घातलेले असत. त्याला तुम्ही पेज म्हणा , कांजी म्हणा, पाश्चीमात्य भाषेत हा पदार्थ पॉरीज म्हणून ओळखला जातो. कधी कधी ते कॅार्न फ्लेक्स देखील घेत असत. कधीकधी अड्यांचे बाॅईल्ड एग फ्राय, फुलं फ्राय, आमलेट , भूरजी, तसेच स्क्रॅम्बल्ड एग , अंड्यासोबत गरम गरम टोस्ट बटर लावून घेत असत. निरनिराळ्या प्रकारचे जाम त्यांना विशेष आवडत असे .त्यानंतर कॉफी त्यांना खूप आवडत असे क्रोकरीची ( चिनीमातीची भांडी ) त्यांना फार आवड . म्हणून नाश्त्यासाठी ,चहासाठी कॉफीसाठी जेवणासाठी असा निरनिराळ्या प्रकारच्या क्रोकरीचे संच त्यांच्या बंगल्यावर होते. आणि तशी ताकीद त्यांनी घरातील नोकरांना दिली होती. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळे सेट ते वापरायला सांगत . सकाळचा नाश्ता घेतल्यावर कार्यालयाला जाण्याची तयारी करीत असत. त्यांना ड्रेसअप व्हायला खूप आवडत असे . अशा प्रकारे सर्व तयारी झाल्यानंतर ते जायला निघत . बंगल्याच्या पोर्चमध्ये गाडी तयारच असे. घरातून ते साधारण ९-३० च्या दरम्यान बाहेर पडत .कारण त्यावेळी घटनेचे काम सुरु होते. म्हणून वेळेवर जावे लागत असे . त्यानंतर ते दुपारच्या वेळेस साधारणपणे १-३० ते २-०० च्या सुमारास घरी येत .आल्यावर जेवण घेत त्यांचा आहार फार कमी होता . गव्हाच्या पीठाचे दोन लहान फुलके व थोडासा भात ते खात असत जेवणात त्यांना मांसाहार आवडत असे. ते अगदीच थोड खात पण पदार्थात त्यांना विविधता आवडत असे. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर डॉ. बाबासाहेब थोडा वेळ आराम करीत असत . म्हणजे नुसते पडत असत कारण त्यांना आरामाची फार गरज होती. कार्यालयात कामे करून खूप थकून जात असत . मग थोडा वेळ आराम करून ते दुपारी ३ -०० ला उठत आणि चहा घेतला कि पुनः पार्लमेंटला उपस्थित होत असत. त्यानंतर ते ९-०० ते १० -०० च्या दरम्यान परत येत आल्यावर ते खूप शिणलेले असत दिवसभराच्या अतीव ताणामुळे ते मलुल गेलेले असत. त्यांच्याइतकी जबाबदारी त्या वेळच्या कोणत्याही नेत्यावर नसावी. बंगल्यात खूप भव्य अशी लाॅन होती. एक लहानसा हौद होता. त्या हौदात कमळ देखील होती. हौदात लहानसे सुंदर असे कारंजे होते. या हौदाजवळ रात्रीच्या वेळी खुर्च्या व टेबल लावलेले असत तिथे बाबासाहेब बसत असत . घटना समितीचे काम ,कायदा मंत्रालयाचे काम , दुसऱ्या दिवशी मांडल्या जाणाऱ्या कलमांची माहिती इतर सभासदांना देऊन त्यांच्या शंका निरसन करणे. इ . अनेक कामे करून ते अतिशय थकून जात आणि मग त्यांची जेवणाची इच्छा होत नसे . परंतु नानाकचंद रत्तू हे त्यांना आग्रह करीत म्हणून नाईलाजाने त्यांना थोड खाव लागे. त्यानंतर ते बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर झोपण्यास जात . परंतु रात्रिच्या १ते २ वाजेपर्यंत त्यांचे लिखाण -वाचन किंवा घटना समितीच्या नोट्स काढण्याचे काम सुरु असायचे . तसा बालम (म्हणजे त्यांचा नोकर) हा अधून मधून त्यांना काय हवे नको ते पहायचा . अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दिनक्रम होता. #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.8K views
1 days ago
आंबेडकर पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आढावा भाग 4 (७) चाबूकस्वार : (अच्युतराव कोल्हटकर १९२५) या वृत्तपत्राचे मुख्य उद्दिष्टे म्हणजेच राजकीय सुधारणा करणे. (८) केसरी (संपादक न. चिं. केळकर) 'स्वराज्य' प्राप्ती हेच प्रमुख उद्दिष्टे होते. राजकीय शिक्षणाचा प्रसार करणे, राजकीय हक्काची जाणीव लोकांत निर्माण करणे, जहाल व क्रांतिकारी राजकीय विचारांचा प्रसार वृत्तपत्राद्वारे लोकमत जागृत करणे, स्वदेश, स्वधर्म व स्वराज्य हे त्रिसूत्री विचारांची त्यांची बैठक होती. (९) महाराष्ट्र (संपादक गोपाळ ओगळे, नागपूर, १९१४) सदर वृत्तपत्राचा ढाचा 'केसरी'सारखा होता. सामाजिक परिवर्तन व सुधारणा याकडे दुर्लक्ष डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरावर लेख यावरून तत्कालीन डॉ. आंबेडकरांची समकालीन वृत्तपत्राची उद्दिष्टे तशी भिन्न होती हे स्पष्ट होते. (१०) संदेश (संपादक: अच्युत कोल्हटकर, मुंबई, १४ जानेवारी १९१५) प्रथमतः या वृत्तपत्राची उद्दिष्टे टिळकांच्या विचारांप्रमाणेच होती. मात्र नंतर त्यात बदल होऊन जनतेस सर्व प्रकारच्या बातम्या देणे, राजकीय वृत्तपत्राचे कार्य करणे, नवीन युगाचा परिचय करून देणे, विरोधकांच्या बातम्या देणे, अस्पृश्यांच्या चळवळींची दखल घेणे, अस्पृश्यता निर्मूलनासाठी जे अनेक मार्ग सुरू आहेत, त्यापैकी नाशिकचा काळाराम मंदिर, महाडचा चवदार तळे सत्याग्रह हे होत. (११) लोकहितवादी : (संपादक के.सी. ठाकरे) यांचे लेखन सडेतोड व परिवर्तनवादी विचारांचे होते. 'बहुजनांच्या भल्यासाठी झटणारे' होते. शेवटी डॉ. आंबेडकरांच्या उद्दिष्टांप्रमाणेच असून ती परस्परांना पूरक होती. (१२) लोकमान्य : (संपादक काकासाहेब खाडीलकर) ९ एप्रिल १९९१ टिळकांच्या मृत्युनंतर मुंबईत या वृत्तपत्राला सुरुवात झाली. सदर वृत्तपत्राने लोकमान्य टिळकांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून हे वृत्तपत्र काढले. पुढे डॉ. आंबेडकरांच्या इसवी १९३५ धर्मांतरांच्या घोषणेवर पुढील टीका केलेली आहे : 'हरिजनाने हिंदू धर्म सोडणे म्हणजे आत्मघात होय.' पुढे डॉ. आंबेडकरांचे विचार पटल्यावर २२ जुलै १९४२च्या अंकात असे लिहिले, 'हिंदू समाजात अस्पृश्य म्हणून राहण्यापेक्षा त्या समाजाच्या बाहेर जाणे.' असे डॉ. आंबेडकर म्हणतात. त्या संबोधाने तक्रार करण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत ते पाकिस्तानसारखी किंवा राष्ट्रच्छेदाची मागणी करीत नाहीत तोवर त्यात राष्ट्रविरोधी काही नाही.' (१३) नवा काळ : (संपादक: काकासाहेब खाडीलकर लोकमान्य सोडल्यानंतर) 'नवा काळ' काढले ७ मार्च १९२३. सदर वृत्तपत्र मुंबईत प्रकाशित झाले. लोकमान्यप्रमाणेच उद्दिष्टे होती. सदर वृत्तपत्रे दररोज काम करणारे होते. लोकमान्य व महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे सदरचे वृत्तपत्र होते. (१४) तरुण भारत : (संपादक खरे, २० जानेवारी १९२६, नागपूर) 'राष्ट्रसभा व स्वराज्य यास पाठिंबा देऊन जनतेसमेर राष्ट्र विमोचनाने मार्ग स्पष्ट मांडीत राहणे शक्य त्या स्वावलंबन पूर्ण उपायाने हिंदी जनतेचे सामर्थ्य, तेच संघटना वाढवून त्यात प्रतिकार शक्तीचा विकास करणे, हिंदी स्वराज्याचा झगडा अखंड सुरू ठेवण्याची खटपट करणे.' (१५) प्रभात : (संपादक पांडुरंग भागवत, मुंबई, गिरगांव) या वृत्तपत्राने बहुजन समाजाचे दैनिक अशी दृष्टी व धारणा होती. ती त्यांनी पाळली. या वृत्तपत्राची उद्दिष्टे डॉ. आंबेडकरांच्या उद्दिष्टांप्रमाणेच 'समाजपरिवर्तन व समाजसुधारणा घडवून आणणे, शैक्षणिक व अन्य स्वरूपाचा विकास करणे, विविध राष्ट्रीय चळवळीचे लोन समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत पोचवून जागृती करणे.' (१६) सकाळ (संपादक नारायण परुळेकर, १९३२, पुणे) 'रोजची बातमी गोळा करून स्वदेश व परदेश यात एकाच वेळी काम चालले आहे. याची कल्पना मराठी वाचकास जितक्या पूर्णतेने देता येईल, तितकी ते देऊन विचार करावयास लागणारे सामग्री जनतेला पुरविणे, निपक्ष व स्वतंत्रपणे लिहिण्याचे धोरण.' (१७) स्वराज्य : (संपादक गो. म. लाडांचे नेतृत्व, २१ मार्च १९३६) 'सकाळ'चाच एक भाग होय. डॉ. आंबेडकरांच्या समकालीन समाजपरिवर्तनाला उद्दिष्टे मानणारे नव्हते, तर तत्कालीन राजकारणाचे विचार करणारे होते... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
548 views
2 days ago
आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम करणाऱ्याशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे. काय व्हायचे असेल ते होईल. त्याला भिण्याचे कारण काय आहे? तुमच्याजवळ आहे काय की ते हरपण्याची धास्ती वाटावी? इतके तुम्ही निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलूमाचा तुम्हास प्रतिकार करता येईल. -डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( पंढरपूर ३१ डिसेंबर १९३७ ) #viral #explore #trendingnow #reach #growth #facebookgrowth #facebook #fb #Posts #facebookpost #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
657 views
4 days ago
आंबेडकर पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आढावा... भाग 4 'महाराष्ट्रातील किल्येक वृत्तपत्रे अज्ञान लोकांना मूर्ख बनविण्याचे कारखाने आहेत. कारण त्यांना वृत्तपत्रे म्हणजे जनकल्याणाची, लोकजागृतीची व समाजपरिवर्तनाची साधने वाटत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आपल्या समकालीन काही वृत्तपत्रांना जे ध्येयशील पत्रकारितेच्या ध्येयापासून वंचित झाली होती, त्यांना वृत्तपत्रांच्या मूळ उद्दिष्टांची जाणीव करून देणारे टीकाही केली आहे.' डॉ. आंबेडकरांचे समकालीन वृत्तपत्रे म्हणजे 'काळ', 'नवयुग', 'प्रभात', 'कुलाबा', 'समाचार', 'पुरुष 'पुरुषार्थ', 'सकाळ', 'भाला', 'लोकमान्य', 'अग्रणी', 'राष्ट्रवीर', 'केसरी', 'नवाकाळ' इत्यादी आहेत. यांची झेप मर्यादित होती. त्यामुळे सामाजिक सुधारणेत व मूलभूत सामाजिक परिवर्तनाला अग्रस्थान दिलेले दिसत नाही. डॉ. आंबेडकर प्रणित 'समता' या वृत्तपत्रानी प्रारंभ केले आणि त्यातून समताधिष्ठीत समाजव्यवस्था निर्माण होण्यास पूरक ठरणाऱ्या अग्रलेखनास प्रारंभ झाला. त्यातून एकसंघाने एका अस्पृश्यांचा विवाह वैदिक पद्धतीने घडून आला. त्यातून रोटी बंदी व बेटी बंदी तोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचे निश्चित केले. डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्राने अस्पृश्यता निर्माण करणे, मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करणे, धार्मिक खोट्या कल्पना, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, जातीभेद ग्रंथप्रामाण्य नष्ट करणे ही उद्दिष्टे मानल्यामुळे या अनुषंगाने वैचारिक बुद्धिप्रामाण्ययुक्त अग्रलेखन व अन्य लेखन केलेले आहे. 'इतरांप्रमाणे आम्हालाही आमची मती आहेत आणि ती प्रतिपादने हा आमचा हक्क आहे. ते आमचे कर्तव्यही आहे, तेव्हा हेही लक्षात ठेवले पाहिजे की अस्पृश्यता हा प्रश्न इतर प्रश्नांपासून अजिबात वेगळा करणे शक्य नाही. जातीभेद, धर्मविषयक कल्पना, ग्रंथप्रामाण्य राजकीय हक्क व राजकीय चळवळ इत्यादी अनेक गोष्टींचा अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाशी कमीजास्त प्रमाणात संबंध पोचतो. अस्पृश्यता निवारण्याच्या बाबतीत टोलटोलवी करायला आम्ही सवड देत नाही, हेच आमच्या कित्येक उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या टीकाकारांचा आमच्याइतका रोष आहे हे आम्ही जाणून आहोत.' समकालीन वृत्तपत्रातून खालीलप्रमाणे काही टीका केलेल्या आहेत (१) काळ : 'आम्ही डॉ. आंबेडकरांना एवढे सुचवू शकतो की ज्यात त्यांना काही समजत नाही व ज्याबद्दल त्यांना मुळीच आदर नाही, त्यात त्यांनी तोंड घालू नये व निष्कारण वाद चिघळू देऊ नये. डॉ. आंबेडकरांना सध्या जे महत्त्व प्राप्त झाले आहे, ते केवळ त्यांच्या गुणांमुळे नसून महार जातीत्वामुळे होय.' (२) नवयुग : 'डॉ. आंबेडकरांचे बाष्फळ उद्‌गार होत. अशा प्रकारे 'भगवद्गीता', 'मनुःस्मृती' व अन्य धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून त्यांचे तर्क कठोर मांडणी डॉ. आंबेडकरांनी करू नये.' (३) भाला : 'तुम्ही केवळ देऊळ किंवा पाणवठे बाटविण्याचा प्रयत्न एकदम बंद करा, तसे न केल्यास आम्ही तुमच्या पाठी सडकू' त्यावर. (४) बहिष्कृत भारत : 'आमच्या जो पाठी सडकील त्यांची आम्ही टाळकी सडकू.' डॉ. आंबेडकरांच्या या मुक्तीवादाला 'भाला'कार उत्तर देऊ शकले नाहीत व पुढे टीकाही केलेली नाहीत. पुढे डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेवर 'प्रभात' दैनिकाने विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी 'डॉ. आंबेडकर धर्मांतर करण्यास पुढे सरसावले, तर पुणे कराराप्रमाणे त्यांना मिळणाऱ्या सवलतीस त्यांना मुकावे लागेल म्हणून धर्मांतरापेक्षा पक्षांतर अधिक हितावह असेल, म्हणून त्याचा विचार व्हावा.' (५) हंटर (संपादक: कोल्हापूरचे खंडेराव बागल १९२५) 'समता' आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मिळेपर्यंत आम्ही उच्च म्हणविणाऱ्या जातीला स्वस्त बसू देणार नाही. हे या वृत्तपत्राचे धोरण होते. यातून सत्यशोधक तत्त्वांचा प्रसार, अस्पृश्यता निवारण, हिंदू-मुस्लिम ऐक्य विचारांचा प्रसार केला जात होता. या वृत्तपत्राने डॉ. आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्रकरणाची बाजू घेतली. (६) कुलाबा समाचार : (संपादक रामभाऊ मंडलीक, पुणे) या वृत्तपत्राने राजकीय कीय चळवळीचे प्रमुख साधन मानले होते. सदर वृत्तपत्राने डॉ. आंबेडकरांच्या विचार व कार्यावर वेळोवेळी टीका करीत होते... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #🙏 प्रेरणादायक बॅनर #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
581 views
5 days ago
आंबेडकर पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आढावा... भाग 2 'नेटी व ओपिनियन' रावसाहेब मंडलीक यांच्या पुढाकाराने सुरू झाले. (४ जानेवारी १८६४) यातून राजकीय, सामाजिक व नैसर्गिक स्वातंत्र्याची मते प्रसिद्ध केली जात होती. समाजसुधारणेचा जोरात पुरस्कार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत' आणि 'जनता' या वृत्तपत्राच्या नावावरूनही त्या वृत्तपत्राची उद्दिष्टे स्पष्ट होतात. प्रारंभीच्या वृत्तपत्रामुळे केवळ भाषा व विचार यांनाच परिपक्वता लाभली नव्हती; तर समाज प्रबोधन, परिवर्तन, जागृती सुधारणाविषयक कार्यालाही परिपक्वता लाभत गेली. वृत्तपत्राचा जन्मच समाजसुधारणा व हिंदू समाजरचना व हिंदू समाजव्यवस्था यात परिवर्तन करण्याच्या हेतूने झालेला आहे. 'सुबोध पत्रिका' ४ मे १८५३ ते १९७३ धार्मिक व सामाजिक सुधारणा, लोककल्याण, लोकजागृती, ज्ञानप्रसार हे या वृत्तपत्राचे मुख्य उद्दिष्टे होते. या वृत्तपत्राचे 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ही ज्ञानशिक्षणाचा प्रसार समाजसुधारणा व परिवर्तन यांनी प्रेरित होती. ही पत्रकारिता परिवर्तनाच्या ध्येयवादाच्या तळमळीतून साकार झाली होती. पुढे 'केसरी', 'मराठा' लोकमान्य टिळकांनी काढली. 'केसरी' लोकमान्य टिळक यांचा या वृत्तपत्रावर फार मोठा दबदबा होता. ते महाराणीपासून ते सरकारी कामगारापर्यंत सर्वांना सारखीच नजर राहात असल्याने कोणताही अन्याय लपवला जात नव्हता. निर्भीडपणे लेखन समाजाचे नेतृत्व, अन्यायाला वाचा फोडणे हे या वृत्तपत्राचे वैशिष्ट्य होते. 'सुधारक' आगरकर सदर वृत्तपत्रात गोखले यांचे विचाराची पाश्चिमात्यांच्या चांगल्या गोष्टी आपण उचलल्या नाहीत. (१५ ऑक्टोबर १८८८) असे प्रकट विचार मांडता यावे, तसेच स्त्रियांना स्वतंत्र मत मांडता यावे, सामाजिक, धार्मिक परिवर्तन, समाज परिवर्तन सुधारणा करणे, हिंदू धर्म विचारात सुधारणा करणे, समाज उन्नतीसाठी प्रयत्न करणे. सदर वृत्तपत्रात अन्यायाबद्दल चीड विशेषतः दिसून येते. पुढे १९२० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे वृत्तपत्र 'मूकनायक' प्रारंभ केले. आगरकरांच्याच विचारांच्या उद्दिष्ट्यांचा वारसा पुढे चालू ठेवला. त्या आधी राष्ट्रीय, सामाजिक, सुधारणा या वादात न पडता समाजसुधारकांना प्राधान्य दिले. (२) डॉ. आंबेडकर पूर्व महाराष्ट्रातील प्रारंभीच्या बहुजन समाजाच्या वृत्तपत्राची उद्दिष्टे महाराष्ट्रात १८७७ सालापर्यंत ज्या वृत्तपत्रांचा प्रारंभ झाला ती प्रामुख्याने उच्च जातीतील पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या व्यक्तीकडून प्रसिद्ध झाली. ती विचारवंत व सुधारकांची पहिली पिढी निर्माण झाली. यात मुख्यत्वे उच्चवर्गातील लोक होते. त्याने सुरुवातीला वृत्तपत्राद्वारे समाजप्रबोधन व समाजसुधारणा करण्यास प्रारंभ केला. मात्र त्यातही जीवनप्रणालीच्या मर्यादा पडलेल्या होत्या; कारण मोठ्या संस्थेत बहुजन समाज व त्यापेक्षा कनिष्ठ असा दलित वा बहिष्कृत समाज होता. त्यांना वृत्तपत्रांचा लाभ होत नव्हता, त्यांच्या वृत्तपत्रातील सुधारणावादी विचार बहुजन व मागासवर्गीय जातीपर्यंत पोचू शकत नव्हते. शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता. तेथे दलित जातीच्या शिक्षणाचा प्रश्नच नव्हता, म्हणूनच पहिल्या वृत्तपत्रांचा प्रारंभ ज्या उच्च जातीतील लोकांकडून झाला त्या वृत्तपत्रातील चर्चा, प्रबोधन, वाद-प्रतिवाद यांचा बहुजन समाजाच्या व दलित समाजाच्या जीवनाला फारसा स्पर्श होत नव्हता. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडता येत नव्हती. मात्र महात्मा फुले यांनी सामाजिक कार्यास प्रारंभ केला व हा विचार प्रवाह खालच्या स्तरातून घुसळून वर आला. त्यातूनच परिवर्तन व सुधारणांचे आधुनिक साधन म्हणून वृत्तपत्र निरनिराळ्या रंगरूपासह जन्मास आले. ते म्हणजे बहुजनाचे 'दिनबंधू' हे वृत्तपत्र होय. त्यात शूद्रांची मते विचारात घेतली जात नव्हती. बहुजन समाज व दलित समाजाची विषमतावादी धार्मिक वादातून व सामाजिक गुलामगिरीतून मुक्ती करण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३मध्ये 'सत्यशोधक' समाजाची स्थापना केली. त्याद्वारे समग्र विचार मांडण्यास सुरुवात झाली. ब्राह्मण जातीपेक्षा ब्राम्हणी मनोवृत्ती विरुद्ध बंड करून सामाजिक विषमतेला वाचा फोडण्याचा व बहुजन समाजाला स्वावलंबी बनविण्याचा मानस होता. त्यासाठी त्याने सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. (अ) 'दिनबंधू' १ जानेवारी १८७७ पुण्यात स्थापना. उद्देश बहुजन समाजात व शूद्रातिशूद्र समाजात वैचारिक जागृती करणे. धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करणे. त्याचे प्रबोधन करून विद्येचा प्रसार... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.2K views
5 days ago
*संघटना हजार झाल्या नेते हजार झाले! कोणा म्हणावे आपुले,चेहरे हजार झाले! तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? भीमा तुझ्या मताची माणसे मेलीत का रे? आपल्या गितातून देशाचे प्रबोधन करणारे वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏🙏💐💐* *महाकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन* *आजही वामनदादांची गाणी आणि त्यातील शब्द कानावर पडताच वैचारिक आत्मभान जागृत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढा, चळवळ, प्रसंग, विचार आणि कृती या संपूर्ण आंबेडकरी संघर्षाला गीतस्वरूपी माळेत गुंफून शब्दबद्ध करणारे, समाजजागृतीची आणि विचारपेरणी आयुष्यभर करणारे महाकवी, लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!* *आंबेडकर चळवळीच्या मुक्त विद्यापीठ असणार्या, आंबेडकर चळवळीसाठी आयुष्य कुर्बान करणार्या वामन दादांस विनम्रतापूर्वक अभिवादन...💐💐💐* *नुसताचं भीम आता इथे कोणी पेरीत नाही वामन तुझ्या सारखा....* *राबत नाही कोणी आता इथे चळवळीच्या खळ्यात या वामन तुझ्या सारखा....* *#वामनदादा_कर्डक* *#Wamandada_Kardak* #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
571 views
6 days ago
आंबेडकर पूर्वीच्या वृत्तपत्रांचा आढावा आपल्या देशातील दलित समाजावर आंबेडकरी पत्रकारितेचा काय परिणाम झाला? दलित समाजातील व्यक्ती आंबेडकरी विचारांचे कोणकोणते वृत्तपत्रे वाचतात? त्यातील कोणता भाग त्यांना आवडतो? खरोखरच या दलित समाजातील व्यक्तींची मानसिकता बदलली का? तसेच त्यांच्यात मतपरिवर्तन झाले का? या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने या संदर्भात जे काही संबंधित संशोधन झाले आहेत. साहजिकच या झालेल्या संशोधन कार्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये हे काम केले आहे. उद्दिष्टे. (१) डॉ. आंबेडकरपूर्व महाराष्ट्रातील प्रारंभीच्या काळातील वृत्तपत्राची ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी भारतातील सार्वजनिक जीवनाची कल्पनाच नष्ट झालेली होती. जाती-उपजाती, अंध धर्म-विचार श्रद्धा व त्यावर आधारित विस्कळीत समाज जीवन होते. त्याला सुरळीत आणण्यासाठी वर्तमानपत्रासारखी साधने नव्हती; परंतु ब्रिटिश सत्तास्थापनेनंतर पाश्चात्त्य शिक्षणामुळे नवी दृष्टी येऊ लागली व नवा विचार घडण्यास प्रारंभ झाला. (१) सामाजिक परिवर्तनाने समाजसुधारणा करणे 'दर्पण' या वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी आयुष्यभर विविध साधनांनी शैक्षणिक कार्य केले. सदर वृत्तपत्र महाराष्ट्रातील समाजातील समाजसुधारणा व समाजपरिवर्तन करण्यासाठी प्रारंभ झाले. हे वृत्तपत्र मतपत्र जनतेला बहुमोल मार्गदर्शन करण्यासाठी सरकारलाही त्याहून अधिक मार्गदर्शन करीत होते. (राजा, कायदा, प्रजा) 'ओरिएंटल ख्रिश्चन स्पेक्टेटर' या मासिकात मार्च १८३३ला चांगला अभिप्राय मिळाला. 'दर्पण' हे अतिशय प्रतिष्ठित व उपयुक्त असे इंग्रजी व मराठी भाषेत लिहिणारे पत्र आहे. त्यातील विचारांचा समतोलपणा व भिन्न पक्षातील वादी प्रतिवादींना त्यात लाभणारे लाभ निःपक्षपातीत्त्व हे त्यांचे गुण प्रशंसनीय होत. समाजाला ज्ञानदान करून सुविचारी बनविण्याच्या कार्यात त्याचा केव्हाही खंड पडलेला नाही. 'जात' या मुद्द्यावर वाद सर्वाधिक तटस्थ होते. त्यामुळे समाजजागृती, सुधारणा व समाजपरिवर्तन घडण्यास या वृत्तपत्रातून योग्य दिशा मिळाली. स्वदेशी लोकांना योग्य दिशा देण्याचे कार्य 'प्रभाकर' गोविंद कुंटे यांचे वृत्तपत्रे २४ ऑक्टोबर १८४१ ते ६२ या वृत्तपत्राने अज्ञान, परंपरागत रूढी अशा रोगाने पिडलेल्या समाजाला पाश्चात्त्य शिक्षणाच्या नवविचाराचे औषधपाणी पाजून ज्ञानसंपन्न, समर्थ व स्वाभिमानी बनविण्यासाठी या वृत्तपत्राचे मोलाचे कार्य आहे. प्रथम इंग्रज राजवटीवर टीका या वृत्तपत्राने केली. 'ज्ञानोदय' हे वृत्तपत्र धर्मप्रसारासाठी व मराठी भाषा विकासासाठी प्रयत्न केले. मात्र खिस्ती वाचकापुरतेच मर्यादित होते. 'ज्ञानप्रकाश' महाराष्ट्राच्या जीवनात सदर वृत्तपत्राला विशेषतः महत्त्व होते. १९५० पर्यंत सदर वृत्तपत्र चालू होते. 'इंदुप्रकाश' सदरचे वृत्तपत्रे रानडे व भांडारकर यांनी मिळून काढले. हे वृत्तपत्र इंग्रज सरकारला विरोध न करता सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्याची भूमिका या वृत्तपत्राने केली. नंतरचे संपादक विष्णूशास्त्री पंडित होते. (कालावधी २ जानेवारी १८६९ ते १९२४) पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
593 views
7 days ago
दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे मोठा मूर्खपणा आपली झोपडी शाबूत राखा. मनमाड नाशिक येथे रविवार दिनांक 16 जानेवारी 1949 रोजी झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अस्पृश्य समाज हा इतर कोणत्याही समाजापेक्षा अधिक राजकारणी ,ज्ञानी समाज आहे त्याबद्दल मला बिलकुल शंका नाही .कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. आपले राजकारण यशस्वी करण्यात आपल्या समाजास मोठ्या अधिकाराच्या जागा पाहिजेत म्हणजे मी म्हणतो माऱ्याच्या जागा काबीज केल्या पाहिजेत. जरी आपल्याला राखी जागा मिळाल्या नसल्या तरी भिण्याचे कारण नाही. आपण सात कोटी लोक आहोत .आपण जर संघटित राहिलो तरच आपला पक्ष बलवान होईल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपला जो राजकीय संघ शेड्युल कास्ट फेडरेशन त्यालाच आपण चिकटून राहिले पाहिजे. आपण जरी अल्पसंख्य असलो तरी स्वतःच्यात मनगटाच्या जोरावर संघर्ष करू. आपणास भिण्याचे कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कधी दुसऱ्या पक्षाशी संगनमत करावे लागेल .जो पक्ष आपले कल्याण करील. तोच आपल्याला जास्त जवळचा, ज्याचा कार्यक्रम जास्तीत जास्त आमच्या कार्यक्रमाची जुळेल त्या पक्षाची आम्हाला संगनमत करायला काही हरकत नाही. मग तो काँग्रेस असो, समाजवादी असो अगर बहुजन समाजवादी असो. वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही .मला तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे संघ सोडून तुटकपणाने दोघा-चौघांनी दुसऱ्या संघात सामील होणे म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहीत आहे आपण कळपाने राहिले पाहिजे. "आपले घर सोडून दुसऱ्याच्या हवेली शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. तसे न झाल्यास ब्राह्मणेतर पक्षांप्रमाणे आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही." आपली झोपडी मोडणे हे मला बिलकुल पसंत नाही. आपली झोपडी मोडून आम्ही काही करणार नाही. "आपल्या लोकांची नीतिमत्ता सोज्वल असावी .अस्पृश्यांचे भवितव्य अतिशय उज्वल आहे याविषयी खात्री बाळगा. काँग्रेस म्हणते परकीय सत्तेला हाकलून देऊन आम्ही क्रांती केली .त्याबद्दल त्यांना धन्यवाद. परंतु अर्धवट क्रांती होय. खरी लोकशाही निर्माण करायची असल्यास आज हजारो वर्ष डोक्यावर नाचत असलेला वरचा वर्ग खाली व समाजातील खालचा वर्ग वर गेल्याशिवाय खरी क्रांती होणार नाही. क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. आसासह चाक पूर्ण फिरल्याशिवाय खरी क्रांतीच होऊ शकत नाही ते चक्र आम्हीच फिरवू." संदर्भ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 वा भाग 3 पान नंबर 138, 139 #viral #explore #trendingnow #reach #growth #facebookgrowth #facebook #fb #Posts #facebookpost. #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
656 views
8 days ago
"ज़िंदगी भागने के लिए नहीं... महसूस करने के लिए है। हर पल को जीओ... बिना जल्दबाज़ी, बिना चिंता। सांसों पर ध्यान दो, अपने म #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर न को शांत करो। ना भूत में उलझो, ना भविष्य में खो जाओ...
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
892 views
10 days ago
१० मे *चळवळीला लाचार करून संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते कदापि मान्य करणार नाही.* *व्यक्तिगत फायद्यापेक्षा चळवळ मोठी आहे बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेत्याचा वाढदिवस !* *देशातील भल्या भल्या प्रस्थापितांना घाम फोडणारे, वंचितांचे कैवारी, बहुजनहृदय सम्राट श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!* *वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, प्रखर विचारवंत, अभ्यासू नेते आणि लाखो कार्यकर्त्यांच्या मनातील प्रेरणास्थान...* *वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष* *मा. श्री. प्रकाश आंबेडकर साहेब* *आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा..!* *आपले विचार, संघर्ष आणि समाजासाठीची निष्ठा आम्हा सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे.* *आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीस भरभरून यश लाभो हीच बुद्धचरणी प्रार्थना..!* #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙