नरेंद्र मोदी चॅलेंज

Devendra Fadnavis
929 views
5 days ago
जनविश्वास विधेयक 2026 : विश्वासावर आधारित नवे प्रशासनिक युग! संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास (तरतुदींमधील सुधारणा) विधेयक, 2026 मंजूर केल्याने भारतातील ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल उचलले गेले आहे. या महत्त्वपूर्ण सुधारणेत, 79 कायद्यांमधील 1000 हून अधिक तरतुदी, ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व (ब्रिटिश) काळातील अनेक कायदेही समाविष्ट आहेत, एका निर्णयाद्वारे सुलभ व सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक पावलामुळे नियमांचा बोजा कमी होऊन विश्वासावर आधारित व नागरिकाभिमुख शासनव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, प्राधिकरणांना थेट दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आल्याने दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. अनेक दशकांपासून नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यांच्या प्रभावाखालील अशा व्यवस्थेत काम करावे लागत होते, जिथे कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ही विश्वास आणि निष्पक्षतेऐवजी दंडात्मक उपायांवर आधारित होती. ही सुधारणा विश्वास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख शासनाला धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या निर्णायक बदलाचे प्रतीक आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील हा उपक्रम व्यक्ती आणि उद्योग दोघांनाही सक्षम करणारा असून, प्रगत आणि भविष्याभिमुख भारताच्या पायाभरणीला अधिक बळकटी देणारा आहे. #नरेंद्र मोदी
Devendra Fadnavis
1.2K views
4 months ago
जय महाराष्ट्र! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जोहान्सबर्ग येथे झालेल्या ‘रिदम्स ऑफ अ यूनायटेड इंडिया’ या कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जोहान्सबर्गमध्ये महाराष्ट्राच्या कला संस्कृती आणि परंपरेचे अभूतपूर्व दर्शन घडले. #महाराष्ट्र #मराठी #देवेंद्र फडणवीस #नरेंद्र मोदी
Devendra Fadnavis
2K views
6 months ago
विदर्भाच्या विकासाला वेग देणारी 'अमृत भारत एक्सप्रेस'!🚉 वर्ध्यातील प्रवाशांसाठी ओडिसा, छत्तीसगड आणि गुजरात दरम्यान आरामदायी, वेळेची बचत करणारी आणि सर्वांना परवडणारी साप्ताहिक लागोपाठ दुसरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. या गाडीचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 27 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. वर्धा व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी ही महत्त्वाची भेट दिल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार! #नरेंद्र मोदी #महाराष्ट्र