bhimsenik

Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
342 views
3 hours ago
दलित साहित्य आणि नामांतराचा वाद भाग 4 दलित बाजार भडव्यांचे लेखन हे मानवी मूल्याधिष्ठ विचारांच्या संघर्षात्मक बंड उभारणाऱ्या बौद्ध धम्म स्वीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवा असलेला समता, स्वातंत्र्य व बधुत्वाचा मूलमंत्र देणारा आंबेडकरवाद जो अन्याय, अत्याचार, गुलामगिरी, अस्पृश्यता यांच्याविरूद्ध दंड थोपटून उभा राहणारा आंबेडकरी विद्रोह आहे. तो या दलित साहित्यात आपणास कसा सापडेल? आणि डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असणारे विद्रोही, बंडखोर, क्रांतिकारी, परिवर्तनशील, शास्त्रशुद्ध व बुद्धीवादी साहित्य जर मानव मुक्तीसाठी निर्माण करायचे असेल तर ते स्वाभिमानशून्य व पिछेहाट करणाऱ्या 'दलित' या शब्दात कसे व्यक्त होईल? त्यासाठी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, गुलामगिरी, अन्याय, अत्याचार यांना झुगारणारा समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाचे मुक्तीगीत गाणारा हा धम्म परिवर्तनशील आंबेडकरी तत्वप्रणालीत, बौद्ध साहित्याचाच भाग आहे व दलित, बहुजन, मागासवर्गीय, नव्हे तर संपूर्ण जगालाच, मानवी कल्याणकारी बौद्ध धम्माची व साहित्याचीच आज गरज आहे. नव्हे बौद्ध साहित्यच जगाला तारणारे साहित्य आहे. कारण त्यात बुद्ध, कबीर, फुले व आंबेडकरवाद उद्घोषीत आहे. डॉ. बाबासाहेब ही थोर व्यक्ती होती. त्यांनी शिक्षणशास्त्रात पदवी प्राप्त करून घेतली होती. अनेक क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता. देशीय आणि परदेशीय दोन्ही ठिकाणी त्यांनी आपला अभ्यास पूर्ण केला होता. ते प्रख्यात पंडित असून त्यांनी सामाजिक, राजकीय, धाम्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक, कायदा व न्याय, पत्रकारिता या सर्व गोष्टीत प्राविण्य मिळविले होते. व्हॉलटेअर, रूसो, टॉलस्टॉय, कार्ल मार्क्स, लेनिन, इ. जगातील थोर तत्ववेत्यांचे तत्वज्ञान त्यांनी अंगीकारले होते. हिंदू, मुस्लिम, सिख, पारसी, खिश्चन, जैन, बौद्ध या प्रमुख धर्माचे तत्वज्ञान आभ्यासले होते. त्यामुळे त्यांच्या विचाराला चिंतनशीलता, शास्त्रयुक्त आधार लाभला असल्याने जगातील कुठल्याही तत्वेत्त्यापेक्षा डॉ. आंबेडकरांचे तत्वज्ञान तसूभरही कमी पडणारे नाही. किंबहुना श्रेष्ठच ठरणारे आहे. याचे कारण डॉ. आंबेडकरांनी बुद्ध, कबीर, फुले यांना आपले गुरू मानले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी या थोर 'युगंधराने' तथागत गौतम बुद्धाचा विश्वकल्याणकारी बौद्ध धम्म आपल्या लाखो अनुयायांसोबत स्वीकारून आपल्या तत्व प्रणालीची दिशा जाहीर केली. समता, स्वातंत्र्य बंधूप्रेम या बुद्धाच्या विश्वव्यापी मानवतावादी तत्वज्ञानालाच 'आंबेडकरी तत्वज्ञान' किंवा 'आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य' असे संबोधतात व याचे सर्वपरिचित नाव म्हणजे 'बौद्ध साहित्य' होय. "आंबेडकरवादी बौद्ध साहित्याची" ही संकल्पना गुलामगिरीविरूद्ध बंडाची भूमिका घेणारी आहे. माणसाचे मुक्तिीगीत गाणारी आहे, जे जे सुंदरमंगल आणि सत्य आहे, त्यावर विश्वास ठेवणारी आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुप्रेम, न्याय विश्वशांतीचा मंत्र देणारी आहे. विश्वाच्या कानाकोपऱ्यातील दुःखितांचे अश्रू पुसणारी आहे, म्हणून हे जे समाज परिवर्तनवादी 'आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य' आहे. ते 'बौद्ध साहित्याचं', दीन, दलित, बहुजन, बौद्ध समाजाच्या व जनहिताच्या दृष्टीने फार मोलाचे आहे. म्हणून याचा अंगीकार समस्त दलित, बहुजन, आंबेडकरवादी साहित्यिकांनी' करावयास हवा. ५ आंबेडकरवादी साहित्य बौद्ध तत्वज्ञान दलित साहित्य का नको ? दलित साहित्यिकांची रंग बदलणारी आंबेडकरी निष्ठा, स्वार्थासाठी विकृत मनाचे, अस्विकृत जीवन, स्वकथन, आत्मचरित्र, विद्रोही कविता या साहित्यप्रकारात "आमची प्रेरणा ही आंबेडकर आहे," असे सांगून समाजाचे गलिच्छ व किळसवाणे चित्र साहित्यातून मांडले असल्याचे लक्षात आल्याने समाजामधूनच "दलित साहित्य" या संकल्पनेला, आज कडाडून विरोध होत आहे. आणि हा विरोध बौद्ध साहित्यिक विजय सोनवणे यांनी "दलित साहित्य का नको"? या ग्रंथात १९७९ सालीच दर्शविलेला आहे. ते म्हणतातः "बहुतेक 'दलित साहित्य' हे वेश्याव्यवसाय आणि व्यभिचारांची वर्णने करण्यात खर्ची पडलेले आहे. दलित साहित्यिकांच्या प्रतिभेची आणि प्रज्ञेची झेप कामाठीपुरा, गोलपीठा, झोपडपट्टी, हातभट्टी सोडून पुढे सरकतच नाही. कारण नवसाहित्यांच्या नावाखाली खून, मारामारी, बलात्कार, "समलिंगी संभोग” गरमी, महारोग यांची वर्णने रेखाटली जातात. अर्धशिक्षित अथवा विकृत मनाच्या वाचकांकडून अशा पुस्तकांस चांगली दाद मिळते, पुस्तकांचा खप वाढतो, प्रकाशकांचे उखळ पांढरे होते, प्रसिद्धीच्या उच्च टोकावर जाण्याचा हा जवळचा आणि हमखास मार्ग असतो. त्यासाठी वैचारिक लेखन वाचनाची काहीच गरज लागत नाही. म्हणूनच दलित साहित्यिक पैसे आणि किर्ती मिळावी म्हणून या मार्गाकडे वळले असावेत, गणिका, सूड, हातभट्टी, गोलपीठा, पिंपळपान ही पुस्तके वाचल्यानंतर माझ्या मुद्याची कल्पना येईल. दलित साहित्यिकांनी आपल्या तथाकथित बंडखोर दलित साहित्यास "कोंडवाडा" "गावकुसा... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
539 views
2 days ago
दलित साहित्य आणि नामांतराचा वाद भाग 3 समजला नाही. परंतु त्यांना हे कळत नाही की, एखादे दुसरे समीक्षेचे पुस्तक छापून साहित्य क्षेत्रात थोर तत्वज्ञांनी साहित्यिकांच्या बरोबर जावून बसता येत नाही, कारण समीक्षक हा विचारांचा निर्माता नसतो. तो विचारवंतानी मांडलेल्या प्रमेयांची शहानिशा, विचाराचे मोजमाप करून, विचारांचा गर्भात अर्थ विश्लेषण करून, सामान्य वाचकांसमोर मांडतो. तो नवविचार नवी दिशा समीक्षाद्वारे समाजाला देऊ शकत नाही. आणि विशेष म्हणजे पुस्तकांवर, कथा, कादंबरी कवितेवर लिहिणे म्हणजे समीक्षा करून बाप मारणे नव्हे! आंबेडकरवाद इतका संकुचित व सोपा नाही. त्याला बौद्ध तत्वज्ञानाची वैचारिक बैठक आहे, व बौद्ध तत्वज्ञानात असे कंपूशाही निर्माण करणारे दलितत्वाला जीवननिष्ठा समजून नवा आशय प्राप्त करून देऊन सवर्णाकरवी पारितोषिके मिळविणारे दोषमूलक साहित्यिक बसत नाहीत. ८ 'आंबेडकरवादी साहित्याचे' मूळ उद्‌गाते राजा ढाले महाराष्ट्र बौद्ध साहित्याच्या १४ व्या बौद्ध साहित्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणामधून बोलत असतांना श्रेष्ठ बौद्ध साहित्यिक राजा ढाले यांनी १९७६ साली आआंबेडकरवादी साहित्याची मूळ भूमिका मांडली आहे. नव्हे तर समाजामध्ये रूजलेला हा मूळ विचार आहे, कारण की आंबेडकर हे बौद्ध, बहुजन, दलित समाजाचे नायक आहेत. त्यांनी मांडलेले विचार हे आम्हांला स्वीकृत, प्रेरणादायक आहेत. कारण ते बुद्धीप्रामाण्यवादी असल्याने आम्ही आमच्या माजाच्या दृष्टिकोनाने प्रवर्तक विचारांना साहित्यात सातत्याने मांडणार आहोत व मांडीत आलो आहोत. तोच आंबेडकरवाद आहे. राजा ढाले यांच्या शब्दाः आंबेडकरवादी भूमिका पाहा. ते म्हणतात, "आज तुम्हाला मी एका नव्या नावाने संबोधणार आहे. आज मी तुम्हाला दलित साहित्यिक म्हणणार नाही, अथवा बौद्ध साहित्यिक असं म्हणणार नाही, आज मी तुम्हाला 'आंबेडकरी प्रेरणेचे साहित्यिक' हे नाव देणार आहे. पुढील परिच्छेद पहा - "म्हणून तुम्हाला आज मी आंबेडकरवादी जनता व तुमच्या साहित्याला आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य म्हणणार आहे. आपण आहोत, 'आंबेडकर प्रेरणेचे साहित्यिक' आणि आपले साहित्य आहे, "आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य." ही आहे १९७६ साली राजा ढाले यांनी मांडलेली भूमिका, ही दलित व बौद्ध साहित्यिकांच्या ऐक्याच्या अर्थी वापरली आहे. पण जर कोणी साहित्यिक दलित व बौद्धसाहित्यिंका मध्ये आंबेडकरवादी साहित्यिकांचा तिसरा गट या अर्थी उचलेगिरी करून हा स्वयंमविचार म्हणून मांडीत असतील तर तो आंबेडकरवादी जनतेशी केलेला विद्रोह आहे. हे तितकेच खरे, म्हणून आंबेडकरवादी साहित्य व बौद्ध साहित्य वेगळे नाही. बौद्ध साहित्य म्हणजे आआंबेडकरवादी साहित्य व आंबेडकरवादी साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य हे त्रिवार सत्य आहे. कांही बांडगूळ साहित्यिकांची वरकरणी भूमिका जरी बौद्ध असली तरी, त्यांची मानसिकता ही दलित आहे. त्यामुळे ते आंबेडकरवाद व आंबेडकरवादी साहित्य ही भूमिका मांडू शकत नाहीत. त्यासाठी खरा बुद्धीष्ट म्हणून प्रथम आपण स्वतःस सिद्ध केले पाहिजे नंतर आंबेडकरवादी म्हणून लोक अपोआपच मान्यता देतील. हे तितकेच खरे. कारण आंबेडकरवाद समजून घ्यायचा म्हणजे प्रथम बौद्ध तत्वज्ञान समजून घ्यावे लागते आणि बौद्ध तत्वज्ञान समजून घेतल्याखेरीज आंबेडकरवाद मांडता येत नाही व आंबेडकरवाद आचरणात आणल्याखेरीज आंबेडकरवादी साहित्य निर्मिती होऊ शकत नाही. ती दलित साहित्य निर्मिती होऊ शकते बौद्ध अथवा आंबेडकरवादी नाही. ९ बौद्ध साहित्य का हवे? दलित, बहुजन, बौद्ध समाजाच्या साहित्याचे काय स्वरूप असावे? व त्या साहित्यास आंबेडकरवादी विचाराचे समर्पक नाव कोणते व का असावे? या संदर्भात आज चर्चा सुरू आहे. दलित हा घृणास्पद शब्द आहे. त्याची उत्पत्ती ही हिंदूसंस्कृतीची देण आहे. हा शब्द बहुअर्थी वापरला जातो. दलित म्हणजे चारवर्षीय स्तरातील सर्वात खालच्या थराचा अस्पृश्य समाज या अर्थी वापरला जातो. म्हणजे दलित बहुजन समाजामधील आर्थिकदृष्ट्या नडलेला, पिडलेला ब्राम्हण वर्गाशिवाय इतर मागासवर्गीय समाज, दलित म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या पिडलेला सर्व थरातील समाज. मग त्याची जात, रंग, वर्ण, धर्म कोणताही असो तो समाज दलित म्हणून संबोधला जातो आणि या सर्वहारा समाजाने आपल्या विमुक्तीसाठी लिहिलेले जे विद्रोही साहित्य आहे, ते दलित साहित्य होय. असा जर दलित साहित्य या शब्दाचा अर्थ असेल तर सुरूवातीस ग्राह्य वाटतो. परंतु दलित या शब्दाला प्रेरणा मानून सवर्णांचे वर्चस्व मान्य करून समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा यांना लौकिकतेच्या रसभरीत वर्णनात्मक कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रांमधून प्रबुद्ध आंबेडकरी समाजांचे विकृत चित्र इतिहासरूपाने प्रस्थापित करून नावलौकिक मिळविणाऱ्या, शूद्र आणि स्त्रियांची अबू वेशीवर टांगणाऱ्या स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या खाजगी व नाजूक प्रश्नांचा बाजार करून चव्हाट्यावर मांडणाऱ्या विचाराने गलीच्छ असलेल्या... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #💙 भीमसैनिक 💙
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.1K views
2 days ago
संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की..* *आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो..* *आणि "रूबाब" विकत घेता येत नाही..* *आन् दाखवता पण येत नाही..* *तो व्यक्तीमत्वातून सिध्द होतो..* #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #bhimsenik
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
538 views
3 days ago
दलित साहित्य आणि नामांतराचा वाद भाग 2 ब्राम्हणवादी हिंदू संस्कृती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे जोरदार समर्थन श्रेष्ठ बौद्ध साहित्यिक विजय सोनवणे यांनी "दलित साहित्य का नको?" या पुस्तकात केले असून बौद्ध साहित्याचा आग्रह धरतांना ते म्हणतात "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे जे प्रबुद्ध साहित्य आणि प्रगत तर्कशुद्ध बौद्ध विचार पुढे येत आहेत जे साहित्य समता, स्वातंत्र्य आणि बंधुप्रेमातून उत्स्फुर्त पाऊन ज्ञानाने मार्गदर्शित झालेले आहे, ते प्रबोधनकारी साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. पुढे ते म्हणतात, "या साहित्यास बौद्ध साहित्य म्हंटले जाते". धर्मांतरानंतर डॉ. आंबेडकरांचा जो 'इझम' आहे. तो बुद्धाच्या तत्वप्रणालीमुळे अधिकच बळकट झाला आहे. म्हणूनच आम्हांला आंबेडकरवाद हा कार्ल मार्क्सच्या वादाशी जुळता आहे, असे वाटत नाही. मार्क्सवाद हा अपूर्ण वाटतो. आम्हाला आंबेडकरवादच हा आमच्या प्रगतीकात्मक एकमेव वाद मान्य असून तो बौद्ध साहित्यात संपूर्णपणे व्यक्त झाला आहे. असा आमचा ठाम विश्वास असून, सामाजिक परिवर्तनासाठी तो परिपूर्ण आहे. ५ आंबेडकरवादी साहित्यिक म्हणवून घेणाऱ्यांचा आंबेडकरवाद संधिसाधू दलित साहित्यिक आणि बौद्ध साहित्यिकांमधील दलित वृत्तीचे बौद्ध साहित्यिक यांना आपण बांडगूळ साहित्यिक हा शब्दप्रयोग करणार आहोत है आपल्या लिखाणात. जीवनवादी, बुद्धिवादी, आंबेडकरवादी, सौंदर्यवादी, कमिटमेंट, प्रवर्तक, जळतगाभा, परिवर्तन की प्रवर्तन इ. जड शब्दांची शब्दफेक करून आपल्या उथळ बुद्धीचे प्रगल्भ बुद्धीत रूपांतर करून घेण्याच्या प्रयत्नात हे बांडगूळ, दोषमूलक समीक्षक असतात. त्यामुळे त्यांचे म्हणणे नेमके काय आहे, याचा सुगावा वाचकांना लागत तर नाहीच पण आपल्या लिखाणात आंबेडकरवाद कसा आहे. हे पटवून देण्यासाठी रविवारी व सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यातील भूछत्र्यांसारखे उगवतात व प्रांतवाद मांडून आपल्या सभोवार बेडकांची मैफिल जमवून, मटण व दारूच्या वासासोबत आंबेडकरवाद व आंबेडकरवादी साहित्य अशा चर्चाकरवी आपण किती किलो आंबेडकरवादी आहोत याचे मोजमाप सिद्ध करण्याच्या प्रयत्नात हे दोष मूलक (खोटे बौद्ध) साहित्यिक ब्राम्हणांच्या पंगतीला जावून बसतात. यांना बौद्ध साहित्याची फार अॅलर्जी आहे. त्यांच्या आंबेडकरद्रोही कारस्थानाचा डाव त्यांना वाटते कोणाच्या लक्षातच येत नाही. व आपण दलित व बौद्ध साहित्याच्या दोन्ही कुरणात मोकाट बैलासारखे स्वैर चरू शकतो, मात्र त्यांना कदाचित माहीत नाही की, बौद्ध साहित्यिक म्हणवून घ्यायचे व दलित साहित्यकृतीवर व साहित्यिकांवर लिहायचे. बौद्ध शब्दाचा व साहित्यिकांचा उल्लेख कटाक्षाने टाळायचा व मान्यवर दलित साहित्यिकांकरत्री आपली पाठ थोपटून घ्यायची हा त्यांचा स्वहितार्थ चाललेला युक्तिवाद लोकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे आज ना उद्या, "धोबी का कुत्ता न घर का ना घाट का" ही त्यांची स्थिती साहित्य क्षेत्रात होणार आहे. म्हणून यापेक्षा प्रामाणिक दलित साहित्यिक आम्हांला परवडला परंतु दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे असा समाजाचा विश्वासघात करणारा विश्वासघातकी समीक्षक, लेखक, कवी, साहित्यिक नको. ६ 'आंबेडकरवादी साहित्याचे' प्रयोजन आंबेडकरवादाचे मूळ बौद्ध तत्वज्ञानात असल्याने आणि बौद्ध तत्वज्ञानच बांडगूळ साहित्यिकांना पचणारे नसल्याने, आज आंबेडकरवादी साहित्य निर्मितीत त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आणि दलित साहित्यिक तर आज आवर्तनाच्या भोवऱ्यात सापडले असल्याने त्यांच्या मनात दलित साहित्य की बौद्ध साहित्य किंवा आणखी कोणते साहित्य हा गोंधळ त्यांना आपल्या हेतूसापेक्ष सोपा करायचा असल्याने बौद्ध साहित्यिकाचे नाव धारण न करता त्यांना आंबेडकरवादी साहित्य या नावाखाली बौद्ध साहित्याच्याच व्यासपिठावर यायचे आहे, असे दिसते. मग हा आंबेडकरवादी साहित्याचा पडदा का? बौद्ध साहित्य व्यासपीठ हे सर्वांसाठी खुले आहे. ज्यांना यायचे त्यांनी पुढील दाराने यावे. कारण बौद्ध तत्वज्ञान वगळून आंबेडकरवाद मांडता येत नाही. डॉ. बाबासाहेबांचे विचार तर आमची जीवननिष्ठा आहे व 'बौद्ध साहित्य हेच आंबेडकरवादी साहित्य' आहे. बौद्ध साहित्य हे चक्रधर स्वामींच्या 'हत्ती व चार आंधळे' या दृष्टांतातील संदेशाप्रमाणे आहे. हत्ती म्हणजे दलित, बहुजन, बौद्ध समाजातील साहित्यिक नाम विधाने आहेत. म्हणून दलित, फुले, आंबेडकरवादी साहित्य, ग्रामीण, बहुजनवादी साहित्य व विद्रोही साहित्य या विविध हत्ती रूपीसाहित्य संकल्पना बौद्ध साहित्यात विलीन होतात. ७ आंबेडकरवादी साहित्य आणि बोगस समीक्षा "आंबेडकरवादी साहित्य" हा शब्दप्रयोग आम्ही जीवंत ठेवला अशी बिनबुडाची टिमकी हे बांडगूळ साहित्यिक वाजवीत असतात, की ज्यांना आंबेडकरवादच पूर्णपणे... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
2.6K views
4 days ago
दलित साहित्य आणि नामांतराचा वाद १ आंबेडकरवादी साहित्य हेच बौद्ध साहित्य ! बौद्धसाहित्याची व्याख्या "प्रानीन युगात बुद्धाने व अर्वाचीन काळात कबीर, फुले, आंबेडकर या मानवता वाद्यांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या मानवी मुल्यांचा पुरस्कार करून प्रज्ञा, शील, करूणा, मैत्री व शांती अधिष्ठित जण कल्याणकारी, विश्वव्यापी स्वतंत्र संकल्पना मंडली जी शास्त्रशुद्ध, बुद्धीप्रामाण्य व प्रवर्तनशील आहे. या सामाजिक न्यायाचा व सहिष्णूतेचा आदर्श समोर ठेवून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात दुःखी, पिडीत, शोषितांची न्यायी संघर्षासाठी विद्रोही आयडेंटीटी मांडणारे जे जे उदात्त, मंगल, सौदर्यवादी साहित्य असेल, मग कोणत्याही सजीवाने कोणत्याही ज्ञात प्रकारात विमुक्तीसाठी अभिव्यक्तीत केलेले, अथवा लिहिलेले ते 'बौद्ध साहित्य' म्हणून ओळखले जाईल". २ बौद्ध साहित्यिक कोणास म्हणावे जे साहित्यिक आंबेडकरी निष्ठा मानतात, ज्यांचा बौद्ध तत्वज्ञानावर विश्वास आहे, ज्यांचा आंबेडकरवादावर विश्वास आहे, ज्यांचे साहित्य हे आंबेडकरी प्रेरणेचे आहे. जे हिंदू धर्मातील सामाजिक व्यवस्था नाकारतात, दलितत्वाचा, दास्याचा धिक्कार करतात, जे समता स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, जे हिंदू धर्माकडून बौद्ध धम्माकडे आणि दलित साहित्याकडून बौद्ध साहित्याकडे वळले आहेत व ज्यांच्या प्रेरणा मनू प्रेरणीत भाकडकथा नसून, बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर अशा वास्तववादी व शास्त्रशुद्ध, बुद्धिप्रामाण्य आहेत, ते साहित्यिक आंबेडकरवादी साहित्यिक किंवा बौद्ध साहित्यिक म्हणून संबोधले जातील. आम्ही बौद्ध झालो तरी समाजातील काही अंशी लोकांच्या मनातील हिंदू संस्कार पद्धती समूळ नष्ट झाली नाही. त्यामुळे समाजात अमूलाग्र बदल घडवून आणणे, तो बौद्ध सांस्कृतिकदृष्ट्या योग्य बनविणे हे समाज परिवर्तनाचे महान काम बौद्ध साहित्यिक घडवून आणणार आहेत. हे सर्व घडवून आणण्यासाठी जी साहित्यकृती ते निर्माण करतील, जे तत्वज्ञान मांडतील, बौद्ध तत्वज्ञान व आंबेडकरवाद हा त्यांचा मूळ पाया आधारभूत असणार आहे. म्हणून हे साहित्यिक आपल्या साहित्याला 'आंबेडकर प्रेरणेचे साहित्य', बौद्ध साहित्य अथवा 'आंबेडकरवादी साहित्य' म्हणून संबोधतात. ३ आंबेडकरवादी साहित्य हेच बौद्ध साहित्य जेव्हा आपण आंबेडकरवादाचा पुरस्कार करतो, तेव्हा आमच्यासमोर रूढी, परंपरा यांना झुगारून सामाजिक क्रांती हे परिवर्तन आमचे उद्दिष्ट असते. आणि ते साध्य करण्यासाठी आम्ही आंबेडकरवादी भूमिका मांडत असतो. आंबेडकरवादाचे सर्व निकष हे बौद्ध साहित्यास लागू पडतात, बौद्ध साहित्य हे मानवी मूल्यांवर आधारित आहे. आणि डॉ. आंबेडकर हे मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते आहेत. समता, स्वातंत्र्य व बंधुप्रेम, या संकल्पना बुद्धाच्या तत्वज्ञानात आहेत. व त्या डॉ. आंबेडकरांनी अंगीकारून घटनेद्वारा लोकशाही पद्धतीने मांडल्या आहेत. विश्वशांती, विश्वकल्याण, करूणा, मैत्री या संज्ञा बौद्धतत्वज्ञानातून आंबेडकरवादात आल्या आहेत. व या तत्वाशी प्रेरित होऊन आंबेडकरांनी सारा भारत देश बौद्धमय करण्याचे वर्तमान पाहिलेले आहे. म्हणूनच त्यांचा हा आदर्श आमच्या साहित्याचा विषय व आशय आहे, नव्हे तर ती आमची जीवननिष्ठा आहे. म्हणूनच बौद्धसाहित्यात बौद्धतत्वज्ञान व आंबेडकरवाद हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे बौद्धसाहित्य म्हणजे आंबेडकरवादी साहित्य, व आंबेडकरवादी साहित्य म्हणजे बौद्ध साहित्य ही भूमिका १४ आक्टोबर १९५६ पासून समाजामध्ये प्रवाहित आहे. ४ 'दलित साहित्य' आंबेडकरवादी साहित्य आहे का? 'दलित साहित्य' या नावाने जे जे साहित्य आजपातोर निर्माण केले गेले त्या प्रपंचात आंबेडकरी प्रेरणा ही जरी मूल स्थानी गृहीत धरली तरी, आंबेडकरवाद मात्र सर्व दलित साहित्यकृतीतून मांडला गेला आहे, अथवा हे साहित्य पूर्णतः आंबेडकरवादी साहित्य आहे, हे मानणे कठीण आहे. कारण दलित साहित्यात खरा आंबेडकरवाद मांडण्यात आला नाही. उदा. बलुत, आठवणींचे पक्षी, सूड, जेव्हा मी जात चोरली, ऊपरा, उचल्या, गोलपिठा, इ. कलाकृतीतून कोणता आंबेडकरवाद मांडला आहे. दोन्ही ही साहित्य प्रकारांनी जातीयवाद सोडला नाही तसेच प्रवर्तक साहित्य निर्मिले नाही. 'समुचित' व 'अस्मितादर्श' हिंदू विचारांचे आखाडे होऊन बसले आहेत. आंबेडकरांऐवजी कार्ल मार्क्स, मर्डेकर, कमलेश्वर बाबुराव बागुल, केशवसुत व हेगडेवार यांना गुरू मानून बुद्धा ऐवजीकार्ल मार्क्स, व ब्राम्हणी समरसतावाद मांडणे चालू ठेवले आहे. म्हणून दलित साहित्यात आंबेडकरवाद कमी व ब्राम्हण, कम्युनिष्टवाद, जातीयवाद जास्त मांडला आहे. म्हणून त्यांची प्रेरणा ही बौद्ध संस्कृती नसून... पुढील भागात मुक्तीदाता विशेषांक #bhimsenik #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
643 views
6 days ago
*२९ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने स्थापन केलेल्या मसुदा समितीचे (Drafting Committee) अध्यक्षपद भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आले.मसुदा समितीविषयी महत्त्वाची माहिती:स्थापना: २९ ऑगस्ट १९४७ रोजी ही सात सदस्यीय समिती स्थापन झाली.मुख्य कार्य: स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा (आराखडा) तयार करणे.अध्यक्ष: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (त्यांच्या कायदेविषयक कौशल्यामुळे त्यांना मसुदा समितीचे शिल्पकार मानले जाते).समितीचे इतर ६ सदस्य:१. एन. गोपालस्वामी अय्यंगार२. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर३. के. एम. मुन्शी (कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी)४. सैयद मोहम्मद सादुल्ला५. बी. एल. मित्तर (त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर एन. माधवराव यांची नियुक्ती झाली)६. डी. पी. खेतान (१९४८ मध्ये त्यांच्या निधनानंतर टी. टी. कृष्णमाचारी यांची नियुक्ती झाली)डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या समितीने अत्यंत परिश्रमाने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, जो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.* #DrBabasahebAmbedkar #Ambedkar #Constitution #Bhimrao #DraftingCommittee #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💙 भीमसैनिक 💙 #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #bhimsenik #🙂Positive Thought
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
1.5K views
23 days ago
#अन्याय_के_खिलाफ_जंग_हमारी_है, #हक़_की_आवाज़_ही_हमारी_पहचान_है...! आज पुन्हा सिध्द झाले, आणि नांदेडकरांनी सिध्द केले की, नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे म्हणून, आज दि ०९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड मध्ये भव्य आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा,हजारोंच्या मोठ्या संख्येने पार पडला,यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब व हजारो आंबेडकरवादी तरुण उपस्थित होते. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! #जयभीम #jaybhimpublic #jaybhim_india #भीमसैनिक #bhimsenik #ambedkarwadi_status #nandednews #नांदेड #nandedkar #nandeddistrict #महामोर्चा #jaybhim #viralreelschallenge #bhimarmy #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🪷बुद्धांची तत्वे📜 #🙂Positive Thought #💙 भीमसैनिक 💙 #bhimsenik
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
4.2K views
25 days ago
आज नांदेडमध्ये उपवर्गीकरण विरोधी भव्य महामोर्चाच्या माध्यमातून हजारो भीमसैनिकांनी आपली एकजूट आणि ताकद दाखवून दिली. या महामोर्च्याला उपस्थित राहिलेल्या सर्व माता-भगिनी, बांधव, युवा वर्ग, कार्यकर्ते आणि भीमसैनिकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानतो! आज नांदेडच्या भूमीतून सर्व समाजबांधवांनी दाखवून दिलेली अभेद्य एकजूट हीच आपल्या संघर्षाची खरी ताकद आहे. घटनात्मक आरक्षणावर कोणत्याही आघात करणारे प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आरक्षण हे सामाजिक समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. नांदेडच्या या महामोर्च्याच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या सर्व आयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समाजबांधवांचे मी मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानतो. जय भीम! जय बुद्ध! जय संविधान! #drbabasahebambedkar #AnandrajAmbedkar #RepublicanSena #आरक्षण #ambedkar #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🪷बुद्धांची तत्वे📜 #💙 भीमसैनिक 💙 #🙂Positive Thought #bhimsenik
Dhamnashrya yuwa vichar mnach nanded
7.8K views
1 months ago
अधिकार अधिकार उपचार के साथ हो अधिकार तभी वास्तविक होते हैं, जब उनके साथ उपचार भी हो। यदि पीड़ित व्यक्ति को अपने अधिकारों का अतिक्रमण किए जाने पर कोई कानूनी उपचार प्राप्त नहीं है अधिकार प्रदान करना बेकार है। परिणामस्वरूप जब संविधान अधिकारों की गारंटी देता है, तो यह आवश्यक हो जाता है कि विधायिका और कार्यपालिका को उन पर हावी होने से रोकने के लिए उपबंद किया जाए। यह काम प्रायः न्यायपालिका को सौंपा जाता है और न्यायालयों को संविधान द्वारा प्रदत्त अधिकारों का विशेष संरक्षक बनाया गया है। मुक्तीदाता विशेषांक संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वांग्मय खंड-2, पृ. 191 अनुभव तो यह सिद्ध करता है कि अधिकारों की रक्षा कानून के द्वारा नहीं, बल्कि समाज की सामाजिक तथा नैतिक चेतना द्वारा की जाती है। यदि सामाजिक चेतना ऐसी है कि वह उन अधिकारों को मान्यता देने के लिए तैयार है जिनका अधिनियमन कानून करता है, तो अधिकार सुरक्षित रहेंगे। परंतु यदि मूल अधिकारों का समुदाय द्वारा विरोध किया जाता है तो कोई कानून, कोई संसद, कोई न्यायपालिका, वास्तविक अर्थ में उनकी गारंटी नहीं दे सकती। मुक्तीदाता विशेषांक संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वांग्मय खंड-1, पृ. 267 'दे ग बाई जोगवा' कहने से अधिकार नहीं प्राप्त होते। भिक्खा मांगकर अथवा अन्यों की धर्मबुद्धि पर निर्भर रहने से अपहृत किया गया स्वत्व वापस नहीं आता। उस काम के लिए अपना तेज प्रकट करना चाहिए। मुक्तीदाता विशेषांक संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवन चरित्र., पृ. ४० ....अधिकार सहृदयता के रूप में नहीं दिया जा सकता। मुक्तीदाता विशेषांक संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण वांग्मय खंड-3, पृ. 217 #🪷बुद्धांची तत्वे📜 #bhimsenik #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #💙 भीमसैनिक 💙