इतिहास छत्रपतींचा

Vaibhav Mhatre
10.8K views
9 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #५_सप्टेंबर_१६५९ #शिवरायांच्या_थोरल्या_पत्नी आणि #संभाजीराजेंच्या_मातोश्री #अखंडलक्ष्मीअलंकृत #सकलसौभाग्य_संपन्न #महाराणी_सईबाईसाहेब यांचे गुंजन मावळातील किल्ले #राजगडवर अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. अवघ्या २ वर्षांचे बालशंभूराजे पोरके झाले. याचवेळी शिवराय अफझलखानाचा सामना करण्यासाठी जावळीच्या खोऱ्यातील किल्ले प्रतापगडवर वास्तव्यास होते. शंभुबाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती. पुढे शंभू राजांना त्यांच्या आज्जी व शिवरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले. शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणीसाहेब अंथरुणाला खिळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी-लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य आमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला दि. ५ सप्टेंबर १६५९ रोजी #सरत्या_पावसाला_शिवाजीराजांचा_भावगड_ढासळला ! एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला ! भरल्या मळवटाने सईबाई छत्रपती महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या ते परत कधी न येण्यासाठी 🙏 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_सप्टेंबर_१६६१ शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #५_सप्टेंबर_१६६५ संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
540 views
1 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६५६ रायरी ताब्यात घेतल्यानंतर शिवरायांनी रायरीचे रायगड असे नामकरण केले होते. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आला. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६७८ संभाजीराजे व त्यांच्या पत्नी येसूबाई यांना शृंगारपूर येथे भवानीबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. युवराज संभाजीराजांना कन्यारत्न प्राप्त झाले. शिर्केंच्या वाड्यातील बाळंतिनीच्या दालनात बालबोल फुटला, कन्यारत्न आलं येसूबाई मासाहेब झाल्या! संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. यासमयी संभाजीराजे त्यांच्या सासुरवाडीत म्हणजेच श्रुंगारपुरला होते. मे महिन्यातच छत्रपती शिवाजीराजे दक्षिण दिग्विजय करून परत आले होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६७९ खांदेरीला इंग्रजांचा वेढा पडला. कॅप्टन एनसाईन ह्युजेस खांदेरी आणि मुख्य भूमी दरम्यान गस्त घालीत ३ शिबडे घेऊन सज्ज झाला. ह्या वेळच्या पोर्तुगीज पत्रांवरून असे दिसते की पोर्तुगीज ह्या प्रकरणावर विशेष नजर ठेवून होते. पोर्तुगीजांच्या वसाहतींच्या उत्तर विभागातील किल्ल्यांचा प्रमुख Juaanv De’ Mello De Sampaeyu याला तर गवर्नरचा स्पष्ट सल्ला होता की इंग्रजांनी शिवाजीराजांच्या विरोधात सामील होण्याकरिता विचारल्यास तटस्थ राहून – आमचा शिवाजीशी तह आहे असे सांगावे. ह्युजेस ने गस्त सुरु केल्यानंतर पुढचे सुमारे १० दिवस खांदेरीला पुरवठा बंद होता. ह्याच वेळी ह्युजेस ने ९ सप्टें रोजी मुंबईला संदेश रवाना केला व कळवले की मराठे तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत व विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा व बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇