#इतिहास छत्रपतींचा
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#५_सप्टेंबर_१६५९
#शिवरायांच्या_थोरल्या_पत्नी आणि
#संभाजीराजेंच्या_मातोश्री
#अखंडलक्ष्मीअलंकृत
#सकलसौभाग्य_संपन्न
#महाराणी_सईबाईसाहेब यांचे गुंजन मावळातील किल्ले #राजगडवर अल्पशा आजाराने अकाली निधन झाले.
अवघ्या २ वर्षांचे बालशंभूराजे पोरके झाले.
याचवेळी शिवराय अफझलखानाचा सामना करण्यासाठी जावळीच्या खोऱ्यातील किल्ले प्रतापगडवर वास्तव्यास होते.
शंभुबाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती.
पुढे शंभू राजांना त्यांच्या आज्जी व शिवरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.
शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणीसाहेब अंथरुणाला खिळल्या.
देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती,
तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता.
अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून
दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले.
सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी-लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य आमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला दि. ५ सप्टेंबर १६५९ रोजी
#सरत्या_पावसाला_शिवाजीराजांचा_भावगड_ढासळला !
एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला !
भरल्या मळवटाने सईबाई छत्रपती महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या ते परत कधी न येण्यासाठी 🙏
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#५_सप्टेंबर_१६६१
शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#५_सप्टेंबर_१६६५
संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय
#जय_शंभुराजे
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩