मुंबई अपडेट

Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
605 views
3 days ago
“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो” कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात. किती छान ना? म्हणजे कोणी ही यावं महापुरुषांना टपली मारून जावं...!!! बाहेरचा माणूस जसा तुमचा इतिहास बघतो, तसा तुमच्यातील वाददेखील बघतो. तुम्हीच सोशल मीडियावर महापुरुषांवर, धर्मावर,जातीपातीवर एकमेकांवर तुटून पडता. आपल्या महापुरुषांवर शंका घेता. आपला इतिहास अर्धवट सांगता. अहो येवढंच काय, सोशल मीडियावर महापुरुषांच्या-देवाधर्माच्या-जातीपातीच्या चांगल्या-वाईट पोस्ट टाकून पोस्टला लाईक्स-कमेंट मिळणवणारे महाभागही असतात. आज, तुम्ही एकमेकांना ट्रोल करता तुम्हीच आपल्या महापूरूषांवर प्रश्न उभे करता. तुम्हीच, इतर ज्यांना मानतात, त्या महापुरुषांवर वाईट “कंटेंट-मिम्स” बनवता. आणि मग राग तुम्हाला येतो, “बाहेरचे आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचं का बोलतात?” कारण तुम्हीच आधी आपल्या महापुरुषांची थट्टा करून ठेवली आहे ना? आज महाराष्ट्रात स्वाभिमान हा कायमचा गुण नाही, तो इव्हेंट-बेस्ड सर्विस आहे. कार्यक्रम असेल तर स्वाभिमान. कॅमेरा असेल तर स्वाभिमान. नेत्याचा आदेश असेल तर स्वाभिमान. तुम्ही स्वाभिमानासाठीही परवानगी घेता. “साहेबांनी सांगितलं तर बोलू…” “आदेश आला तर उतरू…” “नाहीतर शांत बसू…” म्हणजे तुम्ही स्वाभिमान भाड्याने दिलाय ना? बाहेरच्यांना हे दिसत नाही का हा भग्न समाज? भग्न भिंतीवर दगड मारायला कोणाला भीती वाटेल? बाहेरच्यांना माहिती आहे, इथल्या लोकांना चिडवणं सोप्पं आहे… आणि शांत करणं त्याहून सोपं. दोन-चार पोस्ट… एखादं भाषणं… क्षमेची नौटंकी...आणि सगळं काही शांत. छत्रपती शिवाजी महाराज एकच, पण तुम्हीच त्यांचे तुकडे केले. कुणासाठी ते राजकारण कुणासाठी ते भावना कुणासाठी ते फक्त स्टेटस तुम्हीच त्यांना विभागलं… आणि मग अपेक्षा ठेवता की इतरांनी त्यांना अखंड मानावं? बाहेरच्यांना आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचे बोलण्याची “हिंमत कशी होते?” हिंमत दिली तुम्हीच. कारण: तुमच्यात फूट आहे. तुमच्यात सातत्य नाही. तुमच्यात अभ्यास नाही. लक्षात घ्या, जिथे रिकामी जागा असते, तिथे कोणीही येऊन आपली कथा लिहितो. जग तुम्हाला पाहतं—तुमच्या वागण्यावरून. जर तुम्हीच तुमच्या आदर्श पुरुषांना विसरलात, तर बाहेरच्यांकडून आदराची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे. दगड बाहेरचा फेकतो-हो. पण: नेम धरायला आतला सांगतो. कमकुवत जागा आतला दाखवतो आणि कधी कधी… दगड उचलायलाही आतलाच मदत करतो इतिहासात किल्ले तोफांनी कमी, फितुरीने जास्त पडलेत. आजही तसंच आहे. बाहेरचा बोलतो, तो तर एक आवाज आहे. पण आतला त्याला पाठिंबा देतो. तोच प्रतिध्वनी बनतो. आवाजापेक्षा प्रतिध्वनी जास्त घातक असतो. आज, कोणता मुद्दा मोठा करायचा, कोणता दाबून ठेवायचा. कोणावर राग काढायचा. हे सगळं तुम्हीच ठरवता किंवा ठरवून घेता. बाहेरचा दगड फेकतो, पण लक्ष्य तुम्हीच रंगवून ठेवलं आहे ना? तुम्ही स्वतःला वापरू देता. तुमचा राग भाड्याने देतो. तुमची निष्ठा पॅकेजमध्ये येते. तुमचा आवाज ट्रेंडनुसार बदलतो मग दोष फक्त त्यांचा? की तुमचा आहे? “साहेबांनी सांगितलं तरच उभे राहू…” म्हणजे तुम्ही: स्वतंत्र नाही. जागरूक नाही. फक्त निर्देशांवर चालणारे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिलं…पण तुम्ही आजही "साहेबांच्या" परवानगीत जगतो. तुमचा स्वाभिमानही आता ‘ऑन-ऑफ’ स्विचवर चालतो…आणि स्विच कोणाच्या हातात? ‘साहेबांच्या’! बाहेरचा माणूस चूक बोलतो. हो, ते चुकीचंच आहे. पण आतला माणूस, शांत बसतो, सोयीप्रमाणे भूमिका घेतो, आणि कधी कधी टाळ्याही वाजवतो. तुमचा रागही कोणी ‘डायरेक्ट’ करतो का? तुमची प्रतिक्रियाही कोणी ‘स्क्रिप्ट’ करतो का? जर हो, तर मग दोष बाहेरच्यांना देणं अपुरं आहे. मग जास्त धोकादायक कोण? जो दगड फेकतो… की जो नेम कुठे मारायचा सांगतो तो? स्वतःला विचारा, तुम्ही सत्यासाठी उभे राहता का? की फक्त आपल्या गटासाठी? आपल्या पक्षासाठी? आपल्या नेत्यांसाठी? तुम्ही इतिहास समजून घेता का? की फक्त आपल्या सोयीप्रमाणे वापरता? जर उत्तर कटू असेल, तर मान्य करा तुम्ही त्या नेम सांगणाऱ्यांच्या रांगेत उभे आहात. “झोपू नकोस, रात्र वैऱ्याची आहे” याचा अर्थ फक्त बाहेरच्यांपासून सावध राहणं नाही, तर आतल्या फितुरीपासूनही सावध राहणं आहे. स्वतःच्या दुर्लक्षापासूनही जागं राहणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायचा असेल, तर आधी तुम्ही एकत्र उभं राहायला शिकावं लागेल. “ बाहेरून दगड फेकणाऱ्याला थांबवणं सोपं आहे पण आतून नेम सांगणाऱ्याला थांबवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागेल.” #👌प्रेरणादायी स्टेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो #🙌प्रेरणादायी व्हिडीओ #🏛️राजकारण
Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
3.5K views
5 days ago
महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही, तर विचारांची, समतेची, मानवतेची आणि प्रबोधनाची भूमी आहे. इथे संतांनी धर्माचा अर्थ कर्मकांडात नाही, तर माणुसकीत शोधला. संत ज्ञानेश्वर यांनी विश्वमानवतेचा विचार मांडला, संत नामदेव यांनी भक्तीला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवले, संत तुकाराम यांनी ढोंगीपणा आणि खोट्या अहंकारावर कठोर प्रहार केला. संत एकनाथ यांनी अस्पृश्यतेविरोधात उभे राहत समतेचा संदेश दिला, तर समर्थ रामदास यांनी आत्मबल, शौर्य आणि संघटन यांचे महत्त्व पटवून दिले. १९व्या शतकात संत भगवानबाबा यांनी शिक्षणाचे महत्व अधोरीखीत केले. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांनी अध्यात्म आणि जीवन यांचा सुंदर संगम घडवला. संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत सावता माळी, संत जनाबाई,संत सेना न्हावी, संत नरहरी सोनार यांनी आपल्या कार्यातून स्पष्ट सांगितले की देव हा जातीपातीच्या चौकटीत नसतो; तो श्रमात, प्रामाणिकपणात आणि माणुसकीत असतो. संत दामाजीपंत आणि संत दासोपंत यांनी समाजहिताला प्राधान्य दिले. पुढे गाडगे बाबा यांनी अंधश्रद्धा, अस्वच्छता आणि ढोंगीपणावर झाडू फिरवला, तर तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून राष्ट्रनिर्माणाचा विचार दिला. इतकी विशाल आणि प्रगल्भ संतपरंपरा महाराष्ट्रात असताना, जर आज समाजाला माणसामाणसात भेद निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या किंवा धर्माच्या नावाखाली व्यक्तिपूजा वाढवणाऱ्या भोंदूबाबांच्या प्रवचनांची गरज भासत असेल, तर ही केवळ सांस्कृतिक शोकांतिका नाही तर महाराष्ट्रधर्माच्या मूळ तत्त्वांपासून दूर जाण्याची धोक्याची घंटा आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे कोणत्याही एका जातीचा, पंथाचा किंवा व्यक्तीचा धर्म नव्हे. तो शिव-फुले-शाहू-आंबेडकरांच्या समतेचा विचार आहे. तो वारकरी परंपरेच्या “विष्णुमय जग” या मानवतावादी दृष्टिकोनाचा वारसा आहे. इथल्या संतांनी कधीही द्वेष शिकवला नाही; त्यांनी संवाद, करुणा, समता आणि विवेक शिकवला. आज काही लोक धर्माच्या नावाखाली समाजात भीती, द्वेष आणि अंधभक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याला विरोध करणे हीच खरी संतपरंपरेची सेवा ठरते. संत तुकारामांनी म्हटले होते “जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।” याच एका ओळीत महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा संपूर्ण आत्मा दडलेला आहे. म्हणूनच महाराष्ट्राने गायगपट्यातून आयात झालेल्या ढोंगी अध्यात्मापेक्षा आपल्या संतांच्या विवेकवादी, समतावादी आणि मानवतावादी विचारांकडे पुन्हा वळण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राची खरी ओळख ही टाळ-मृदंगातील भक्तीत आहे, पण त्याहून अधिक ती माणसाला माणूस मानणाऱ्या विचारात आहे. #👌हृदयस्पर्शी फोटो #👌प्रेरणादायी स्टेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #😊Feeling happy #🎭Whatsapp status
News34
929 views
16 days ago
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *🔥Chandrapur Breaking । धक्कादायक! वर्दी मिळण्यापूर्वीच अर्पिताने गळफास घेतला* *💥चंद्रपुरात खळबळजनक घटना* 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://news34.in/news/chandrapur-breaking-news-police-bharti-girl-suicide-tukum #news34chandrapur
Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
747 views
20 days ago
#🙏डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती🤚 मराठी माणसाच्या अस्मितेचा अमर दीप..c/p संदीप जाधव. आज १४ एप्रिल... संपूर्ण भारतभूमीवर, विशेषतः मराठी हृदयात एक पवित्र ज्योत प्रज्वलित झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तो दिवस जेव्हा सूर्योदय होतो, तेव्हा एका महान संघर्षाची, एका अमर संकल्पाची आठवण होते. बाबासाहेबांनी फक्त दलितोद्धार केला नाही, त्यांना फक्त दलितांचे कैवारी म्हणून बांधू नका.. ते गोबरपट्ट्यातील आयटी सेल छत्रपती ते बाबासाहेब या सर्वांचीच बदनामी करत असतात. लाखो ने सैनिक लढले तरीही विजयाच श्रेय राजाच असतं.. कितीही अंध भक्त जिंकले तरी श्रेय फेकूच असतं.. अगदी तसंच राज्यघटना लिहिण्याचे सर्व श्रेय हे फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचेच आहे. तर मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, संयुक्त महाराष्ट्रासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आवाज उठवला. म्हणून ते माझ्यासाठी सगळ्या महाराष्ट्राच्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण सुरुवातीच्या काळात ज्या साताऱ्यांच्या भूमीत झालं तिथेच मी सुद्धा शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे.आज या जयंतीनिमित्त आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो. १९४८ च्या धार आयोगापासून ते १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र समितीपर्यंत... बाबासाहेबांचा संघर्ष मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीसाठी होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती. धार आयोगासमोर त्यांनी सादर केलेल्या ‘महाराष्ट्र अ‍ॅज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स’ या ऐतिहासिक दस्तऐवजात त्यांनी मुंबईला महाराष्ट्राचा अविभाज्य भाग म्हणून सिद्ध केले. “मुंबई हे महाराष्ट्रीयनांचे घर आहे, दुसऱ्यांचे नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले. काँग्रेसच्या द्विभाषिक मुंबई राज्याच्या योजनेविरुद्ध ते उभे राहिले. त्यांच्या अनुयायांनी मुंबई महापालिकेत पहिला ठराव मांडला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र... १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेते एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, दांगे दिल्लीत बाबासाहेबांच्या घरी गेले. तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “माझी अनुसूचित जाती फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीला ‘जिब्राल्टरच्या खडकाप्रमाणे’ साथ देईल” त्यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानात समितीच्या बैठका होऊ लागल्या. त्यांच्या पक्षाने समितीशी युती केली, निवडणुकीत काँग्रेसला पराभूत केले. शेकडो आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, सत्याग्रह केले, जेल भोगल्या. बाबासाहेबांच्या स्वरात मराठी माणसाची व्यथा होती तो शेतकरी, तो कामगार, तो दलित, तो मागासलेला... सर्वांना एकत्र करून एक मजबूत, लोकशाही महाराष्ट्र घडवण्याची त्यांची स्वप्ने होती. बाबासाहेब शेवटपर्यंत लढले. आजारी असतानाही, शरीर थकलेले असतानाही त्यांचा आवाज मरला नाही. त्यांनी ‘Thoughts on Linguistic States’ या ग्रंथात भाषिक राज्यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समता आणि प्रगती कशी साधता येईल, याचे मार्गदर्शन दिले. त्यांना माहीत होते की, फक्त भाषा एकत्र करून चालणार नाही; त्या भाषिक राज्यात दलित, शोषित, कष्टकरी यांना शिक्षण, संघटन आणि संघर्षाची शक्ती मिळाली पाहिजे. त्यांचे ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हे मंत्र आजही मराठी माणसासाठी मार्गदर्शक आहे. आज भीम अनुयायी आणि इतर सर्व मराठी बांधव-भगिनींना बाबासाहेब सांगत आहेत एक होऊन उठा.. जात-पात, पक्ष-विभाग यांच्या भिंती तोडा. स्वतः शिका, आपल्या मुलांना शिकवा. शिक्षण हेच शस्त्र आहे ज्याने बाबासाहेबांनी स्वतःला आणि लाखो दलितांना गुलामीतून मुक्त केले. आज मराठी माणूस शिकला तरच तो मुंबईत, शेतीत, उद्योगात, राजकारणात प्रगती करू शकेल. भीम अनुयायांनी आंबेडकरी विचाराला मराठी अस्मितेशी जोडले पाहिजे. आणि इतर मराठी बांधवांनीही बाबासाहेबांच्या न्याय आणि समतेच्या विचाराला हृदयात बसवले पाहिजे. एकत्रितपणे शिक्षण घ्या, उद्योग उभार, शेती सुधार, तरुणांना संधी द्या. मराठी भाषेचा, संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान बाळगा, पण तो कोणावरही लादू नका. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात सर्वांना स्थान आहे – ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी, महिला, शेतकरी... सर्...त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नात फक्त एकच माणूस होता.. ‘मराठी माणूस’, जो कष्टाळू, स्वाभिमानी आणि न्यायप्रिय आहे. आज जयंतीच्या दिवशी आम्ही भीम अनुयायी आणि सर्व मराठी हृदय एकत्र येऊन म्हणतो.. बाबासाहेब, तुमच्या संघर्षामुळे आज महाराष्ट्र अस्तित्वात आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. तुम्ही शेवटपर्यंत मराठी माणसासाठी लढलात, आम्हीही तसेच लढू. तुमच्या विचाराने आम्ही प्रगती करू, एकत्रित होऊ, शिक्षित होऊ आणि मराठी संस्कृतीला विश्वात उंचीवर नेऊ.बाबासाहेब, तुम्हाला कोट्यवधी प्रणाम.. तुमचे स्वप्न आमचे ध्येय आहे. मराठी माणूस जागृत होईल, प्रगती करील आणि तुमच्या नावाने इतिहास घडवील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.. 🙏🙏 #maharashtra #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #👌प्रेरणादायी स्टेट्स #👌हृदयस्पर्शी फोटो
Lokmanthan News 24
649 views
26 days ago
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचा दिमाखात शुभारंभ https://www.youtube.com/watch?v=568627eO_xQ #HealthCare #MaharashtraNews #HealthMission #RuralDevelopment #MazaGaav #BreakingNews #PublicHealth #LokmanthanNews24 #🆕ताजे अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #🔴अशोक खरात: 'त्या' महिलांवर कारवाई ⁉️