1 एप्रिल दिन विशेष

❍͜ғͥғɪᴄͣɪͫ͢͢͢Aʟ🇲ιѕѕ 𝐀@𝐬𝐡𝐚𝄟⃝❤️🚩
51.3K views
1 months ago
१ एप्रिलपासून नोकरदार वर्गासाठी पगाराचे आणि नोकरीचे नियम पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. नवीन 'वेज कोड'नुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (बेसिक पगार) एकूण पगाराच्या ५० टक्के ठेवणे बंधनकारक असेल. यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. परिणामी, दरमहा हातात येणारा पगार (टेक होम पे) काहीसा कमी होणार असला तरी, निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. नोकरी बदलणाऱ्या किंवा सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालाय. आता राजीनामा दिल्यानंतर किंवा नोकरीवरून कमी केल्यानंतर कंपनीला संबंधित कर्मचाऱ्याचा पूर्ण पगार आणि इतर सर्व देणी केवळ दोन दिवसांत द्यावी लागतील. यापूर्वी हा हिशोब पूर्ण होण्यासाठी अनेक महिने लागायचे. या नवीन नियमांमुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानीला लगाम बसणार असून कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे होणार आहे. #🤗1 एप्रिल पासून होणार मोठे बदल 👉 #1 एप्रिल दिन विशेष #📄सरकारी योजना #सरकारी नियम #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
😭💔I๓iˢˢℽ๏u💔😭
2.2K views
1 months ago
*बहुतेक लोकांना वाटते की बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिले पण खरे तर ते भारताच्या आर्थिक कणाचे शिल्पकार होते त्यांच्या 'रुपयाची समस्या' या पुस्तकातून सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य निरर्थक आहे आणि आर्थिक स्थैर्याशिवाय सामाजिक न्याय अशक्य आहे आणि १ एप्रिल हा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.!!*✍🏻💙✊🏻🏦🪙 #1 एप्रिल दिन विशेष #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
😭💔I๓iˢˢℽ๏u💔😭
3.3K views
1 months ago
*आज आपण रिझर्व बँकेच्या (Reserve Bank) अस्तित्वाला अनुभवतो. सुरक्षिततेची भावना अनुभवतो आहोत.पण, जेव्हा देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग (Finance Commission), राज्यांची मागणी असते ती म्हणजे इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण घेईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते. वित्त आयोगाची आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी, याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीआय (RBI) असो... अशा अनेक संस्था आहेत..💙💸📚* *भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारताची सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे, जी १ एप्रिल १९३५ रोजी स्थापन झाली. चलन छपाई, मौद्रिक धोरण (Monetary Policy) आखणे, बँकिंग प्रणालीचे नियमन करणे आणि देशाची आर्थिक स्थिरता राखणे ही RBI ची मुख्य कार्ये आहेत ती सरकारची बँक, नोटा जारी करणारी संस्था आणि पत नियंत्रक म्हणून काम करते* #1 एप्रिल दिन विशेष #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻