🙏🚩 छत्रपति शिवाजीमहाराज यांचे तिरुपती बालाजी दर्शन छत्रपति शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक राजधानी रायगडावर संपन्न झाला ( दि. 6 जून 1674, शनिवार ) राज्याभिषेकानंतर शिवाजीमहाराजांनी दक्षिणदिग्विजयाची मोहीम हाती घेतली. दक्षिणदिग्विजय म्हणजे शिवचरित्रातील चरित्रातील अतिशय तेजस्वी पर्व आहे. रायगड ही आपली अयोध्या आणि या अयोध्येचा श्रीराम दक्षिणदिग्विजय करण्यासाठी निघाला होता. 6 ऑक्टोबर 1676 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर महाराज दक्षिणेकडे निघाले. या काळात त्यांनी दक्षिणेत हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला.या काळातील एक घटना म्हणजे महाराजांनी श्रीशैलम येथे श्रीशैलमल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. कृष्णा नदीत स्नान करुन महाराजांनी श्रीशैलमल्लिकार्जूनाचे दर्शन घेतले. महाराजांना येथे साक्षात कैलासाचा भास झाला. देहभावाच्या पलीकडे जाऊन ते शिवचरणी लीन झाले. विल्बदलाच्या ऐवजी आपले शिरकमलच अर्पण करावे असेही क्षणभर त्यांना वाटले.पण कर्तव्यभावनेने महाराज सावरले. तंजावरच्या सरस्वतीमहालात एक हस्तलिखित सापडले आहे. त्यात शिवाजीमहाराजांनी रचलेला एक अभंग ज्येष्ठ शिवचरित्रकार श्री.विजयराव देशमुख यांना सापडला होता. नासिवंत सुखासाठी l अंतरला जगजेठी नाहि नाहि याते गोडी l लक्ष चौर्यांशीच्या जोडी मनुषजन्म गेल्याबारे l काय करशील बा रे शिवराज सांगे जना l म्या तो सोडीली वासना ll श्रीशैलम येथील शिवमंदिरात महाराजांची भावावस्था पाहता हा अभंग त्यांनी येथेच रचला असावा. महाराज येथे 9 दिवस मुक्कामी होते. महाराजांनी येथे गोपुर उभारले आहे,त्याला 'शिवाजीगोपुरम' असे म्हणतात. महाराजांचे एक शिल्पही तिथे कोरलेले आहे. छत्रपति शिवाजीमहाराजांनी श्रीशैलम येथे वास्तव्य केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व.मोरोपंत पिंगळे यांच्या पुढाकाराने आंध्रप्रदेशातील शिवभक्तांनी येथे 'श्रीशिवाजी स्फुर्ती केंद्रम' या भव्य प्रकल्पाची उभारणी केली आहे. महाराजांच्या कीर्तीला आणि पराक्रमाला साजेसे हे भव्यदिव्य स्मारक म्हणजे महाराजांच्या त्याग, शौर्य आणि साधनेचेही प्रतिक आहे. छत्रपति शिवाजीमहाराजांच्या जीवनावरील प्रदर्शनी,ध्यानमंदिर , महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे आपणास बघायला मिळतात.
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त #🚩मी शिवबा भक्त