इतिहास महाराष्ट्राचा

Vaibhav Mhatre
693 views
21 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
701 views
21 hours ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र "मुरादबक्ष" याचे पत्र. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६५७ मराठ्यांनी कोकणातील "दंडाराजपुरी" जिंकली पण "किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला. या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१४_ऑगस्ट_१६६० जून १६६० रोजी शास्ताखान स्वराज्यावर चालून आला तो थेट संग्रामदुर्गावर, किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी मात्र अवघ्या ३५०च्या फौजेनिशी किल्ला ५५ दिवस लढवला. अखेर १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
1K views
2 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले. आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते. कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती, या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Vaibhav Mhatre
645 views
2 days ago
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१३_ऑगस्ट_१६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले. आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते. कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती, या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Slayy GK & Education
26.6K views
1 months ago
AI indicator
महाराष्ट्राचा इतिहास - छत्रपती शिवाजी महाराज Complete Short Notes for MPSC छत्रपती शिवाजी महाराज – MPSC / Competitive Exams साठी महत्त्वपूर्ण Notes परिचय स्वराज्य स्थापना महत्वाचे किल्ले राज्याभिषेक अष्टप्रधान मंडळ आरमाराची स्थापना महत्वाच्या घटना Exam Tricks ही पोस्ट Save करा आण मित्रांना Share करा NOTE: ही पोस्ट AI Generated आहे. अभ्यासाच्या दृष्टीन पाहावी. काही माहितीमध्ये त्रुटी असू शकतात. #🚩महाराष्ट्राचा इतिहास🙏 #🎓जनरल नॉलेज #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🗺️भारताचा इतिहास✍