इतिहास महाराष्ट्राचा

Vaibhav Mhatre
588 जणांनी पाहिले
16 तासांपूर्वी
#इतिहास छत्रपतींचा 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६५६ रायरी ताब्यात घेतल्यानंतर शिवरायांनी रायरीचे रायगड असे नामकरण केले होते. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आला. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा." 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६७८ संभाजीराजे व त्यांच्या पत्नी येसूबाई यांना शृंगारपूर येथे भवानीबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. युवराज संभाजीराजांना कन्यारत्न प्राप्त झाले. शिर्केंच्या वाड्यातील बाळंतिनीच्या दालनात बालबोल फुटला, कन्यारत्न आलं येसूबाई मासाहेब झाल्या! संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. यासमयी संभाजीराजे त्यांच्या सासुरवाडीत म्हणजेच श्रुंगारपुरला होते. मे महिन्यातच छत्रपती शिवाजीराजे दक्षिण दिग्विजय करून परत आले होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #४_सप्टेंबर_१६७९ खांदेरीला इंग्रजांचा वेढा पडला. कॅप्टन एनसाईन ह्युजेस खांदेरी आणि मुख्य भूमी दरम्यान गस्त घालीत ३ शिबडे घेऊन सज्ज झाला. ह्या वेळच्या पोर्तुगीज पत्रांवरून असे दिसते की पोर्तुगीज ह्या प्रकरणावर विशेष नजर ठेवून होते. पोर्तुगीजांच्या वसाहतींच्या उत्तर विभागातील किल्ल्यांचा प्रमुख Juaanv De’ Mello De Sampaeyu याला तर गवर्नरचा स्पष्ट सल्ला होता की इंग्रजांनी शिवाजीराजांच्या विरोधात सामील होण्याकरिता विचारल्यास तटस्थ राहून – आमचा शिवाजीशी तह आहे असे सांगावे. ह्युजेस ने गस्त सुरु केल्यानंतर पुढचे सुमारे १० दिवस खांदेरीला पुरवठा बंद होता. ह्याच वेळी ह्युजेस ने ९ सप्टें रोजी मुंबईला संदेश रवाना केला व कळवले की मराठे तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत व विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा व बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी ‘रिवेंज’ नामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभुराजे 🚩🏇🚩🏇
Slayy GK & Education
27.4K जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
AI indicator
महाराष्ट्राचा इतिहास - छत्रपती शिवाजी महाराज Complete Short Notes for MPSC छत्रपती शिवाजी महाराज – MPSC / Competitive Exams साठी महत्त्वपूर्ण Notes परिचय स्वराज्य स्थापना महत्वाचे किल्ले राज्याभिषेक अष्टप्रधान मंडळ आरमाराची स्थापना महत्वाच्या घटना Exam Tricks ही पोस्ट Save करा आण मित्रांना Share करा NOTE: ही पोस्ट AI Generated आहे. अभ्यासाच्या दृष्टीन पाहावी. काही माहितीमध्ये त्रुटी असू शकतात. #🚩महाराष्ट्राचा इतिहास🙏 #🎓जनरल नॉलेज #👨‍🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🗺️भारताचा इतिहास✍