mahesh m. shirkar
788 views 8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२८ ऑगस्ट इ.स.१६६७* औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर बुऱ्हाणपूर येथे विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले. *२८ ऑगस्ट इ.स.१६७९* छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले. मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी-उंदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले. मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला. *२८ ऑगस्ट इ.स.१६८२* दंडाराजपुरीचा फौजदार याकुतखान व खैरातखान ह्यास देण्याकरिता उत्तम पोशाख बहरामंदखानाच्या हवाली करण्यात आला. *२८ ऑगस्ट इ.स.१६८२* सिद्दीने मराठ्यांच्या ( नागोठणे ) प्रदेशात घुसून अनेक लोकांना त्रास दिला. बर्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडून मुंबईस नेले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
10 shares

More like this