mahesh m. shirkar
862 views 13 days ago
*#शिवविचार;प्रतिष्ठान* *२३ ऑगस्ट इ.स.१६६३* छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे जिंकून ताब्यात घेतले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैनिकांनी कवी परमानंद यांना दौसा येथून ताब्यात घेतले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* आग्रा कैदेतील सुटकेनंतर शिवरायांनी होडीच्या मदतीने शाही दस्तक दाखवून चंबळ नदी पार करुन पुढे गेल्याचे परकाल दासाने कल्याण दासास पत्र लिहून कळवले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* फिदाईखानच्या तपासावरून शिवरायांनी घोड्यावरुन नरवीरची घाटी पार केली. या सर्व बाबतीत दस्तक व्यवस्थित न तपासण्याच्या आरोपातून नरवीर घाटीचा फौजदार ईबादुल्लाखानची मनसबदारी बादशाहने ५०० घोडेस्वाराने कमी केली. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
16 shares

More like this