mahesh m. shirkar
718 views • 11 days ago
👑 ⛳शिवविचार प्रतिष्ठान ⛳👑:
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
२५ ऑगस्ट इ.स.१६७४
मराठ्यांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. मात्र आण्णाजी पंताच्या मूर्खपणामुळे प्रयत्न फसला. परंतु नंतर १६ मे १६७५ रोजी हा किल्ला स्वराज्यात आला
*फोंडयाचं युद्ध :-* मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील प्रदेशाची केलेली हालत पाहून विजरई पुरता संतापला , तो उत्तर प्रदेशात मराठ्यांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता , आणि तेथील पोर्तुगीज फिरंग्यांस मदतही पाठवू शकता नव्हता . त्यामुळे त्याने फोंडा दुर्गावर हमला करण्याचे योजिले , जेणेकरून की , मराठ्यांचे लक्ष फोंडयाकडे केंद्रित केलं जावं , असा त्या व्हाईसरॉयचा डाव होता .
*फोंडा दुर्गाबद्दल माहिती* : - दुर्ग अतिशय मजबूत बांधणीचा , तसेच भिंती रुंद व जाड होत्या , तटबंदीदेखील अभेद्य होती , बुरूज वर्तुळाकार रचनेत होते . दि. १६ मे १६७५ ला , फोंडा दुर्ग , छत्रपती शिवरायांनी जिंकला ; त्यामुळे अंत्रुजा , बाळी , चंद्रवाडी , अष्टगार , हमाडबासे , काकोडे , सांगे , केपे आणि काणकोण हे महाल हिंदवी स्वराज्यात आले होते . किल्ला एकंदरीत मजबूत स्थितीत होता , कारण शिवरायांनी स्वतः त्यात काही बदल करून त्यास प्रबळ बनविले होते . दि. २७ ऑक्टोबर , १६८३ रोजी ,
व्हाईसरॉय आगाशीजवळ १२०० पोर्तुगीज शिपाई , २५०० साष्टीतील शिपाई , ३ नामचिन कॅप्टन तसेच ६ आधुनिक तोफा आणि गरजेचे युद्धसाहित्य व धान्यसामग्री यांसह पोहोचला . पुढे त्याने दुर्भाट घेतले [ इथे फितुरी झाली होती ] , दुर्भाट हे बंदर याआधी मराठ्यांकडे होते . त्यावेळी ३०० मराठे फिरंग्यांवर चालून गेले मात्र फिरंग्यांच्या सैन्यबळापुढे मराठ्यांस माघार घ्यावी लागला पुढे दि. १ नोव्हेंबर १६८३ रोजी ,व्हाईसरॉय आपल्या फिरंगी फौझेनिशी फोंडया
- दुर्गाजवळ आले , त्यासमयी फोंडयाचे किल्ले - दार , पायदळाचे सेनापती , शूरवीर येसाजी कंक होते , तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे पराक्रमी पुत्र कृष्णाजी कंकही होते , आणि ६०० मावळे होते , व २०० मावळे नजदिकच्या जंगलात होते . त्यावेळी छत्रपती शंभूराजे राजापूर येथे होते व्हाईसरॉयने फोंडा दुर्गाच्या महादरवाज्याच्या बरोबर समोरील टेकडीवर त्याने तोफा डागल्या , आणि इशारा देऊन मारा सुरु केला . गडावरूनही तीव्र प्रतिकार होत होता , सलग ३ दिवस तोफगोळ्यांचा वर्षाव हा चालूच होता , पण तटबंदी काही केल्या पडत नव्हती , मात्र एक बुरूज ढासळला , येसाजी हे योग्य नियोजनपद्धतीने किल्ला लढवीत होते . व्हाईसरॉयने त्याच्या कॅप्टनला खंदक बुजविण्याचा आदेश दिला , कॅप्टनने कानडी लोकांच्या मदतीने बुजविला . गडावर येसाजी आणि मर्द मराठे पराक्रमांची शर्थ करत होते , व्हाईसरॉयने ही हल्ला तीव्र केला , आणि तोफांच्या प्रभावी माऱ्यामुळे तटबंदीला बगधाड पडलं आता मराठ्यांच्या चिंता वाढल्या , तरीही चिवट मराठे किल्ला लढवीत होते , आता त्या तटबंदीच्या आतून शिरणार , व अखेरचा हल्ला करणार असा फिरंग्यांचा डाव होता आणि तितक्यात विजरईच्या सैन्याच्या मागून प्रचंड धुळीचे लोट उठले , येसाजी बुरूजावरून दुर्बिणीच्या मदतीने बघत होते , आणि पाहतात तर काय , स्वतः धनी !!!!!! शंभुराजांना पाहून
येसाजींचा आनंद गगनात मावेना , राजे १५०० घोडदळ आणि निवडक पायदळानिशी आले , आता फिरंगी चांगलेच फसले . शंभूराजे स्वतः आलेत हे फिरंगी सैन्याला कापर फुटलं , यांच्यात प्रचंड घबराट निर्माण झाली , राजांनी विद्युत वेगाने फिरंग्यांवर आक्रमण केले . राजांना बहिर्जी नाईकांनी एक गुप्त खबर दिलेली की , रणांगणात व्हाईसरॉय नेमकी कुठे होता , राजांनी ते स्थान बरोबर हेरले , मराठे - फिरंगी सैनिकांत युद्ध सुरू झाले ,मराठे त्वेछाने लढत होते , राजांनी व्हाईसरॉय फ्रान्सिस्कु द तांव्हर कोंद - दी - आल्व्हर याला , एका
घोड्यावर बसून लढताना पाहिले , राजे त्याच्यावर चालून गेले , एक वार केला , पण व्हाईसरॉय वाचला , त्याला त्याच्या कॅप्टनने सुरक्षित जागी लगोलग हलविले , 【 परंतु सांगायची गोष्ट तो वार थोड्या अंतराने हुकला ,
वार हा विजरईच्या मानेवर होणार पण त्याने मान मागे वळविली , व तलवार ही त्याच्या शिरस्थानाला लागून , तो ज्या घोड्यावर बसला होता त्याच्या मानेवर तलवारीचा घाव बसला , आणि घोड्याची मान ही जमिनीवर पडली ,
हे पाहून विजरईला प्रचंड धडक बसली , कदाचित त्याने विचार केला असावा , अरे एका वारात जो आपल्या घोड्याची गर्दन कलम करू शकतो , जर तो वार आपल्यावर झाला तर काय होईल ? किती भयावह असेल ते ?????】, आणि रणसंग्राम चालू होता , अखेर अंधार पडला आणि युद्धविराम झाला व्हाईसरॉयने त्या दिवशी ,
रणांगणातील शंभूराजांना पाहून , त्यास चांग -- लीच वचक भरली , त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला , ह्या आदेशामुळे फिरंगी सैन्यास खूपच बरे वाटले आणि दि. १० नोव्हेंबर १६८३ रोजी , फोंडयातून पळ काढला .कृष्णाजी कंक यांनी , निवडक फौझेनिशी विजरईचा पाठलाग केला , दुर्भाट येथे चकमक झाली , दुर्भाटच्या नजदिक टेकडीपाशी काही फिरंगी सैनिक दबा धरून बसले होते , जेव्हा विजरईचा पाठलाग करत करत मराठे त्या टेकडीजवळ आले , विजरई निसटताना दिसला , तेव्हा कृष्णाजी कंक
तेज गतीने चालून गेले , पण टेकडीवरील फिरंग्यांच्या टप्प्यात जसे मराठे आले , तसा बंदुकीने मारा सुरू झाला , कृष्णाजी आघाडीवर होते , मारा अतिशय प्रभावी असल्यामुळे कृष्णाजी आणि काही मावळे जब्बर जखमी झाले . कृष्णाजी कंक यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या , मराठ्यांना त्यासमयी माघार घ्यावी लागली , त्यांना गडावर आणण्यात आले . सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू झाले , कृष्णाजी यांच्या जखमा काही केल्या भरून येत नव्हत्या , अखेर त्यांनी गडावर देह ठेवला , मावळे सुद्धा धारातीर्थी पडले , तर अनेक मावळे जखमी झाले , राजांना अपरिमित दुःख झाले , राजांनी येसाजी कंक यांचे सांत्वन केलं फोंडयाजवळ पोर्तुगीजांचा
छत्रपती संभाजी महाराजांनी दारून पराभव केला , तो इतका जबरदस्त होता की , पोर्तुगीज फिरंग्यांना मराठ्यांनी पळून पळून मारलं ........इतका भीषणरीत्या पराभव प्रोतुंगीजांना स्वीकारावा लागला होता ,मराठ्यांनी पोर्तुगीजांचे बहुत युद्धसाहित्य जप्त केले होते . पुढे २ ते ३ दिवस राजे फोंडा दुर्गावरच होते . फोंडयाच्या लढाई नंतर , छत्रपती संभाजी महाराज राजधानीकडे जातील असा , व्हाईसरॉयचा कयास होता , पण संभाजी महाराजांनी कडक शासन करण्याचे ठरविले होते . राजांनी दि. २४ नोव्हेंबर , १६८३ रोजी , गोवे प्रांतातील जुवे बेटावरील कोट व एकंदर प्रदेश हस्तगत केला . ही खबर जेव्हा गोव्यात समजली तेव्हा तिकडे हाहाकार उडाला , कारण आता फक्त खाडी ओलांडली की , मराठे राजधानी गोव्यात प्रवेशणार होते , आणि मराठ्यांचं शौर्य पाहून
फिरंगी सैनिकांत , मराठ्यांबद्दल प्रचंड दहशत होती , " हे व्हाईसरॉय जाणून होता " . व्हाईसरॉयने त्याच्या युद्धमंडळाची तात्काळ बैठक घेतली , आणि मराठ्यांनी खाडी ओलांडण्याच्या अगोदर आपणाचं त्यांच्यावर हल्ला करून रोखू जेणेकरून पोर्तुगीजांची राजधानी गोवा वाचविता येईल हा मनसुभा होता . त्याप्रमाणे व्हाइसरॉय आपल्या फौजेसह मराठ्यांवर , जुवे बेटावर चालून आला , राजांनी त्याला आत येऊन दिले . आणि मराठ्यांनी जो प्रतिहल्ला केला , त्याचे वर्णन करणे महाकठीण , मराठे पोर्तुगीजांना सपासप कापत होते , खंडोजी बल्लाळ ह्यांनी तर मोठा पराक्रम गाजविला होता . फोंडयाप्रमाणे , पोर्तुगीजांनी पळ काढावयास सुरुवात , व्हाईसरॉय जेव्हा पळत होता , तेव्हा राजांनी त्याचा पाठलाग सुरू केला , काही अंतरावर त्याकरिता बोटीची व्यवस्था केली होती . अखेर त्याने बोट गाठली . व्हाईसरॉय होडीतून बसून गोव्यात जाण्याच्या बेतात होता , तितक्यात त्याची नजर तेज घोड्यावर स्वार होऊन येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज , यांच्याकडे गेली तो होडीत बसून निघाला , राजेही पाण्यात उतरले ते ही घोड्यानिशी , तेवढयात राजे खूप पुढे गेले , पाण्याचा प्रवाह खूपच जोर धरत होता , व्हाईसरॉय देखील खूप पुढे होता , राजेही पाठलाग करनारच पण खंडोजी बल्लाळ यांनी घोड्यावरून उडी मारली , आणि पोहून राजांच्या घोड्याचा लगाम खेचला व राजांचा जीव वाचविला ; कारण निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही . व्हाईसरॉय ह्यावेळी जखमी झाला होता , केवळ दैव चांगले म्हणोनिच तो
वाचला , तसेच चिटणीस खंडोजी बल्लाळ यांची स्वामिनिष्ठा उल्लेखनीय आहे . पुन्हा मोठा पराभव पत्करून
, पळ काढीत , व्हाईसरॉय गोव्यात आला , त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती , ह्याचे सुरेख वर्णन , पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे , सरदेसाई म्हणतात , " इकडे व्हाईसरॉयने जुवे
बेटातून पळून शहरात प्रवेश केला , तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले , सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता , ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते , ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत
झाला . त्याला काही सुचेना , तेव्हा त्याने सेंट झेवीयरला शरण जायचे योजिले , आणि तो चर्चकडे निघाला , त्याच्याबरोबर लोकांचा मोठा एक जमाव होता . सगळेजण मशाली पेटवून सेंट झेवीयरची शवपेटी ज्या तळघरात ठेवलीहोती , तिथे जाऊन त्यांनी ती शवपेटी उघडली . व्हाईसरॉयने आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे झेवीयरच्या पायापाशी ठेविले , तसेच
त्या राजचिन्हाबरोबर , व्हाईसरॉयच्या सहीचा एक कागद होता , त्या कागदाच्या वतीने त्याने गोव्याचे राज्य सेंट झेवीयरला अर्पण केले , व त्याने चमत्कार करून शत्रूला माघारा परतवून लावावे , अशी याचना केली होती . विजरई मग झेवीयरच्या डोक्याजवळ गेला व डोळ्यात
अश्रू आणोन त्याने त्याची करुणा भाकली " . #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
7 shares