शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

mahesh m. shirkar
537 views
11 hours ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *12 आँगस्ट 1683* पोर्तुगीज विजरईज छ.संभाजी महाराज यांना पकडनार होते त्यांना छ.संभाजी महाराज पंचगंगा नदिवर नारवे येथे आंघोळीसाठी आष्टमी दिवशी येणार हि बातमी समजली. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
1.2K views
1 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* ११ ऑगस्ट इ.स.१६७८ शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची एक वर्षानंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
873 views
2 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *१० ऑगस्ट इ.स.१६४८* छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळचे ठाणे जिंकले. *१० ऑगस्ट इ.स.१६६०* "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. *१० ऑगस्ट इ.स.१६६६* "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. *१० ऑगस्ट इ.स.१७४९* चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. *१० ऑगस्ट इ.स.१७५५* थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. . *१० ऑगस्ट इ.स.१७६०* सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
673 views
3 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *९ ऑगस्ट इ.स.१६५४* छत्रपती शिवरायांनी निळोपंताना पुरंदर साठी इनामपत्र दिले. *९ ऑगस्ट इ.स.१६४८* पुरंदर - खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
595 views
4 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* ८ ऑगस्ट इ.स.१६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई. पुरंदर खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांनकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द छत्रपती शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. *८ ऑगस्ट इ.स.१६८३* चौलच्या वेध्याचे काम निळोपंत पेशवे यांच्याकडे होते त्यांनी ते स्थळ हस्तगत करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले असता चौलच्या तटावर मराठ्यांनी निकराचा हल्ला केला, त्या प्रसंगात पोर्तुगीझांनी पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच कोरलाइचा किल्लाही पोर्तुगीझांच्या ताब्यात होता त्यावरसुद्धा मारात्र्ह्यांनी छापा घातला. पुष्कळ मराठे धारातीर्थ पडले पण स्थळ हाती आले नाही. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
mahesh m. shirkar
682 views
5 days ago
⛳ *शिवविचार प्रतिष्ठान* ⛳ *७ ऑगस्ट इ.स.१६७५* शिवराय कोल्हापुर विभागात दाखल कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. *७ ऑगस्ट इ.स.१६७९* किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
1.8K views
6 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *६ ऑगस्ट इ.स.१६५७* छत्रपती शिवरायांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला. *६ ऑगस्ट १६४८* छत्रपती शिवरायांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. *६ ऑगस्ट इ.स.१६५९* ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण - भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजी राजेंचा मुलगा (शिवबा राजे) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
mahesh m. shirkar
5.5K views
1 months ago
*👑 ⛳ #शिवविचार_प्रतिष्ठान ⛳👑* *12 व 13 जुलै 1660* *कथा पावनखिंड रणसंग्रामाची* कालची रात्र, खलबतखान्या मध्ये महाराज खासे मंडळींची बैठक झाली. सगळे निघुन गेले. ढगांचा कडकडात,चमकणार्या विजा आणि पाऊस या शिवाय कोणी नव्हते. बाजी बांदल, रायाजी बांदल तीन दरवाजाकडे माळावर गेले. बांदलांच्या त्या सेनेच्या तळात येऊन बाजी बांदलांनी सुचना केली, सारी बांदल सेना भोवतीने गोळा झाली. बाजी बांदलांनी ६०० बांदलांची निर्भिड,रग्गड अशी सेना निवडली. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे या बांदल सेनेचे सेनापती म्हणून त्यांना सुचना करत होते अन् सेना शांतपणे त्या सुचना ध्यानी ठेवत होती कारण प्रसंग खुप अवघड होता तो निभावाऊन न्यायचाच होता ” मरण आल तर बेहत्तर पण आमचा पोशिंदा निसटला पाहीजे या मगरमिठीतुन” इकडे महाराज आणि नेबापुरचा निडर सेवक शिवा काशीद यांच्यात मसलत चालली होती. राज्यांच्या मनाला बोचत होत पण पर्याय नव्हता. शिवाला पण माहीत होत ”राजा निसटला पाहीजे, राजासाठी लाख वेळा मरण आल तरी बेहत्तर” रात्र सरली गुरूपौर्णिमेचा दिवस उजाडला. पन्हाळ्यावर काहींना कळाल होत काहींना कळायच राहिल होत आज राजाला निरोप द्यायचा आहे राजाला सुखरूप बाहेर काढायच आहे. महाराजांनी किल्लेदार-गडकर्यांना सुचना दिल्या ”जोपर्यंत गड झुंजता ठेवता येईल तोपर्यंत गड झुंजवा,जीव राखा माणुस वाचवा” गड चोख करण्यात आला. इकडे ६००रणधुरंदर हातात नंग्या तलवारी घेऊन,कमरेला गोफणी बांधुन तयार,फक्त महाराजांच्या सुचनेची वाट बघत होते. महाराजांनी वकीला करवी सिद्दीच्या सरदार-सेनेला गाफिल केल होत. आता फक्त त्या चंद्राची,काळोखाची आणि सह्याद्रीची लक्ष्मी असणार्या त्या पावसाच्या सरींची वाट बघत होते. *लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे* सुर्यणारायण अस्ताला गेला होता, गडावर सगळीकडे शांत वातावरण होत आवाज होता तो फक्त झाडांच्या पाणाच्या सळसळाटाचा आणि रिपरिप पडणार्या पावसाचा. तटबंदीवरच्या मशाली पेटल्या होत्या,चौकी पहारे गस्त घालत होते. पुसाटी कडे सहाशे निवडक बांदल जमले होते. तिकडेच ती काय फक्त तणावपूर्ण कुजबूज चालू होती. एव्हाणा सगळ्या पन्हाळ्याला माहिती झाली होती आज राजा वेढा फोडणार आहेत. शिवा काशीद महाराजांच्या दालनात आले होते. महाराज त्यांना प्रत्येक गोष्ट समजावत होते. शिवा काशीद नी मनाची तयारी केली होती. आता वेळ होती ती शिवा ची शिवाजी होण्याची. ” साहजिकच कोणीही फसेल असा शिवाचा शिवाजी झाला ” रात्रीचा पहिला प्रहर चालू होता, साधारण नऊ-दहाची दरम्यान होता. महाराज आणि शिवा काशीद पुसाटी कडे निघाले. पुसाटीवरच्या सगळ्यांचे मुजरे झडले महाराजांसोबत ६००मावळा आणि शिवा सोबत काही अंगरक्षक अशी योजना ठरली होती. शिवाने हमरस्त्याने मलकापूरकडे निघायचे होते तर महाराज आडमार्गे मसाई पठारावरून विशाळगडाकडे कुच करणार होते. दिंडी दरवाजा करकरला, महाराज, बाजी बांदल,रायाजी बांदल,बाजीप्रभू,फुलाजीप्रभू, शंभुसिंह जाधव आणि बांदल सेनेने पन्हाळ्यास मुजरा केला. आता वेळ होती ती ”रुस्तुम-ए-जमान” ची ”आतुन मैत्री निभावायची” सगळे दिंडी मार्गे पुसाटी बुरजाच्या खालच्या बाजुस सरकु लागले. वेढा तसा आता सैल झाला होता कारण सिद्दीच्या तळावर महाराज येणार त्यामुळे सैन्य गाफिल झाले होते. पण वेढा उठवला नव्हता.शिवा काशिदांची पालखी मलकापुरचा मार्ग दौडू लागली. ६०० मावळे दबक्या पावलांनी कधी थोडीशिच धाव घेत,तर कधी सरपटत निघाले होते. त्यांना साथ होती ती आधुनमधुन येणार्या चंद्रप्रकाशाची.वेढा जवळ आला होता, सगळे चिडीचुप पणे सरफटत मसाईचा मार्ग जवळ करत होते. ईथेच जिवाची बाजी पलटवणारा सगळा खेळ होता… ”आई जगदंबेने सार्या स्वराज्याच ऐकल आणि राजा सुखरूप पणे मसाई पठारावर पोहचले” तिकडे शिवा काशिद मलकापुरकडे दौडत होते. घात झाला सिद्दी जौहरच्या नजरबाजांनी शूरवीर शिवा न्हावी यांची पालखी पकडली. पळून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज कैद झाला. ती पालखी कडक बंदोबस्तासह सिद्दी जौहरच्या तळावर आणण्यात आली. शिवाजींना मसुदने जौहर समोर हजर केले, छत्रपती शिवाजी राजे सापडल्याच्या आनंदात सगळीकडे चैन-मस्ती-शराब चालली होती. अफझलखान पुत्र फाजलखान जौहरच्या डेर्यात दाखल झाला.त्याने शिवाजीला पाहताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने फेरजबाब केला शिवाजींना आता वेळ आल्याची कल्पना शिवांच्या मनात आली. जौहर झालेल्या घाताने चरफडत राहीला,लालबुंद नेत्र त्या काळ्य् कूट्ट चेहर्यावर खुप भयावह दिसत होते. जौहर संतापला होता. म्यानातुन समशेर निघाली होती. ”शिवाजी… त्याला जायच तिथ तो जातो, त्याला थांबायच तिथ तो थांबतो, त्याच बसन-उठण, चालन-फिरण हे शत्रुवर अवलंबून नसत.. माझा राजा निघाला… सुखरूप निघाला… शिवाजी राजा म्हणुन मृत्युच भाग्य मला लाभतय माझ्या साता जन्माची पुण्याई, मुजरा घ्यावा राज्ज्ज मुजरा…”समशेर पोटातुन आरपार झालेली. एव्हाना या सगळ्या गोष्टीत अर्धा प्रहर लोटला होता.महाराज आणि बादंल सेना भर पावसात चिखल तुडवत आड वाटेने विशाळगडाकडे दौड करत होते ईकडे पन्हाळ्यावरून जौहरने सिद्दी मसूदला महाराजांच्या पाठलागावर पाठवले होते. स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा.. रात्रीचे सगळे प्रहर लोटले होते, रात्रभर चिखलातून,काट्या-झुडपातून,माळरानातून तर कधी ओढ्यातुन फक्त पळणे झाले होते.कोणाला काही झाल तरी थांबायला उसंत नव्हती कारण राजाला सुखरूप विशाळगडी पोहचवायचे होते. मावळ्यांच्या पाठीवर सुर्यणारायनाने थाप मारली होती, दिव़ उजाडायला सुरूवात झाली होती. पांढरपाणी यायला थोडाच अवधी होता.हेरांकडून मागची पुढची बातमी कळत होती. सिद्दी मसूद पाठलाग करत जवळच आला होता. आता रणकंदण माजणार होते. विशाळगड जवळ करता करता ठरल की फौज विभागली जावी आणि अर्धे पुढे निघुन जावे आणि बाकीच्यानी गनिमास थोपवून धरावे. बाजींनी वयाच्या अधिकाराने महाराजांना विनंती वजा आदेश केला ”राज्ज निघा ईथुन, गनिम दावा साधेल निघा. पोहचता क्षणी तोफेच बार काढा, तोपर्यंत मी खिंड थोपवतो.” फौज विभागली गेली. बाजींनी फौजेला सुचना केली. टप्प्या टप्प्याने लढायला फळी तयार केली होती. काही झाडाझुडपात लपले होते, तर काही कड्यांवर गोफणी घेऊन तयार होते.आता पांढरपाणी ते विशाळगड रणकंदन माजणार होते. सिद्दी मसुदची फौज जवळ आली होती. आता फक्त लढाई करून वेळ काढायचा होता. पांढरपाण्याला पहिली फळी ऊभी केली होती. सिद्दी मसुदची फौज भिडली. तलवारी वर तलवारी खणखणु लागल्या,प्रचंड कापाकापी चालू झाली, एक मराठा दहा-दहा लोकांना भारायी पडत होता. पण त्या सेनासागरासमोर ती फळी टिकाव धरू शकली नाही. पुढे सरकणार्या मसुदाच्या फौजेला चेव चढत होता. त्या झाडाझुडपात मराठे दिसेना झालेले, तोवर मसुद टप्प्यात आल्याचा ईशारा झाला. त्या सह्याद्रीच्या कुशीतुन हात भिरभिरू लागले, ते गोफणीचे दगड जणु सह्याद्रीच्या तोफेतुन निघणारे तोफगोळे भासत होते. मसुदाच्या फौजेवर आदळत होते, डोकी फुटली जात होती. अनेक गनिम जायबंदी झाला होता. जसजशी मसुदची फौज खिंडीकडे सरकू लागली तस तसे मराठे जमवून ठेवलेल्या दगडी शिळा खिंडीत ढकलून देत होते. मसुदाचा खुप सैन्य मारला गेला होता. आता वेळ होती ती प्रत्यक्ष लढाईची मसुदचे पायदळ खिंडीत उतरले होते. मराठ्यांच्या तलवारी खाली येईल तो कापला जात होता बाजींच्या तलवारीखाली येईल त्याच शिर सलामत राहतच नव्हते. सिद्दीच्या फळ्यानंतर फळ्या गारद होत होत्या. काही मराठेही पडले होते,काही जायबंदी होऊनही लढत होते कारण ” माझ्या धन्यास सुखरूप विशाळगडी पोहचवायच होत” आता मसूदने ठासणीचा बंदुकदार आणला होता.त्याला आदेश देण्यात आला होता.मचाणावर चढून त्याने नेम धरला होता. प्रचंड गर्दीत सुध्दा त्याने बाजींना ओळखले होते कारण ”शेंदूर फासल्या हणुमानासारखे बाजी रक्ताळले होते. डोक्यावरची पगडी पडून तुळतुळीत गोट्यावर ती शेंडी रूळत होती आणि तो रणमर्दाचा आवेश” बार निघला तो डसला बाजींच्या खांद्याला.तरीही बाजी लढत होते. त्याच्यासोबत ते बांदल पण.. काय ती स्वामीनिष्ठा….. तोपर्यंत महाराजांनी आणि रायजींनी तो विशाळगडाला पडलेला सुर्व्यांचा वेढा फोडला होता. राजे गडावर पोहचले. किल्लेदाराला तोफेचे बार काढण्याची ईशारत झाली. ढडाम-ढुमममम् तोफबार निघाले.ईशारा पोहचला खिंडीत बांजीचे-बांदल सेनेचे कान ज्या गोष्टीसाठी आतुरले होते ती गोष्ट ऐकून बाजी धन्य झाले. जीवन कृतार्थ झाल्याचे मानुन बाजींनी खिंडीत देह ठेवला. घोडखिंड पावन झाली. मराठ्यांची सुध्दा प्रचंड फौज कापली गेली होती. आता हाताच्या बोटावर मोजता येईल ईतकीच फौज शिल्लक होती. राहीलेल्या सगळ्यांनी जंगलात पोबारा केला आणि सिद्दीच्या सैन्यास वाट दिली. मसूद विशाळगडी पोहचला आता ईथे वेढा घालणे आणि लढाई करणे शक्य नव्हते म्हणुन तो परत पन्हाळगडी फिरला. असा हा प्रचंड पराक्रम बांदल सेनेच्या रणमर्दांनी गाजवला. आपली स्वामीनिष्ठा मनी धरून आयुष्य कृतार्थ ठरवले. अशा या पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्रामात धारातिर्थी पडलेल्या परिचीत-अपरिचीत वीरांना मानाचा मुजरा. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩शिवराय #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज