*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल*
*इतिहास शिवरायांचा*
**********************************
*शिव दिनविशेष*
🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩
*१५ मे इ.स.१६५८*
*गोव्याचे हंगामी गव्हर्नर फ्रांसिश्कू द काश्त्रू व आंतोनियू द सौझ कौंतिन्यू यांनी पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद !*
*महाराजांनी उत्तर कोकणवर इ.स.१६५८ स्वारी केली तेव्हा पोर्तुगिजांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला. त्यांच्या सैन्याकडून पोर्तुगिजांच्या ताब्यातील दमण आणि चौल ह्या ठाण्यात अतिक्रमण झाल्याबद्दल त्यांनी महाराजांकडे निषेध नोंदविला होता. परंतु महाराजांनी या निषेधाची दखल घेतली असल्याचा उपलब्ध नाही. पण गोव्याचे हंगामी गव्हर्नर फ्रांसिस्कू द काश्त्रू व आंतोनियू द सौझ कौंतिन्यू या दोघांनी हिंदुस्थानातील राजकीय घडामोडीचा आढावा घेऊन, पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्रात महाराजांच्या लष्करी हालचालीचा उल्लेख केला आहे.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१६६५*
*( जेष्ठ शुद्ध एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, सोमवार )*
*मुरारबाजी काका दिलेर खानाशी भिडले :-*
*पुरंदरच्या मदतीसाठी रसद घेऊन आलेले मुरारबाजी काका व दिलेर खानाची मोठी चकमक झाली. मुरारबाजीकाका भिडले ते थेट दिलेर खानाशी!*
*काकांचा पराक्रम पाहून दिलेरखान बोलला, "या खुदा तुमने ये कैसा मर्द सिपाई पैदा किया". खानाने कौल देऊन मुरारबाजी काकांना स्वतःकडे येण्यास सांगितले. पण काका म्हणाले,*
*"कोण रे तू, काय तुझा कौल, मी शिवाजीराजांचा मर्द मावळा,तुझा कौल घेतो की काय?".*
*त्यानंतर कडोविकडीची चकमक झाली. काका काही केल्या मैदानात आवरत न्हवते. शेवटी अंबारीत बसलेल्या खानाने बाणाने टिपून मुरारबाजींचा कंठछेद केला. त्यात मुरारबाजीकाका धारातीर्थी पडले. त्याचबरोबर चिव्हेवाडी येथील पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावातील ३०० मावळे एकाच वेळी लढून धारातीर्थी पडले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१६७९*
*गोव्याचा गव्हर्नर आंतोनियू पाईश द सांद याने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. "वसई किल्ल्याचे कॅप्टन फ्रांसिश्कू सिमाइंश द लैताव यांनी पत्र पाठवून कळविले की, बाल्लीच्या हवालदाराने असोळणे नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर एक किल्ला बांधावयास घेतला आहे. तो बांधून पूर्ण झाला तर आमच्या राजास त्या किल्ल्यापासून उपद्रव पोहोचणार आहे. आदिलशाही अमदानीत त्या ठिकाणी किल्ला बांधण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. तरी सन्माननीय सभासदांनी या बाबतीत आपले मत प्रकट करावे"."*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१६८२*
*मोगलांचा आधिकारी रसद घेऊन किल्ले रामसेजला!*
*शरीफखान मोगली सैन्याची रसद घेऊन चालला असता मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. शहाबुद्दीनच्या सैन्याला, शरीफखानला मराठ्यांनी घेरले. घनघोर युद्ध झाले. ७ हजार मराठे सैन्य शरीफखानावर तुटून पडले. जाहीरखान, फैजुल्लाखान आणि अनेक सरदार प्राणास मुकले. मुहंमद शरीफ जखमी झाला. त्यावर औरंगजेब बादशहा म्हणाला, "मी तुम्हाला सांगतच होतो की, मराठे थांबून थांबून हल्ला करतित". तरी सावधगिरीने रहावे. मराठ्यांचे ५०० ते ६०० लोक मेले. २००० लोक जखमी झाले. शरीफने मोगलांना जय मिळाल्याचे कळविले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१६८४*
*(ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार गुरुवार)*
*कर्णाटक वखारीसंदर्भात इंग्रजांचा वकील छत्रपती शंभुराजेंकडे!*
*मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड केजवीन याने कॅप्टन हेन्री गेटी व थॉमस बिल्किन्स यांस वकील म्हणून तर राम शेणवी यांस दुभाषा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठविले. कर्णाटकात इंग्रजांच्या व्यापारी वखारी असाव्यात याबद्दल विनंती करण्यासाठी हे वकील व दुभाषाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराजांना भेटण्यास गेले.*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१७३७*
*मनोर (अशेरीगड) किल्ल्याला वेढा*
*मराठ्यांनी तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*१५ मे इ.स.१८६९*
*कोल्हापूरच्या चिमाजी महाराजांची समाधी पाकिस्तानातल्या कराचीमध्ये आहे. १८५७ चा उठाव कोल्हापूर संस्थानात देखील झाला होता त्या उठावाचे हिरो होते कोल्हापुरचे महाराज चिमासाहेब !!!*
*२६ डिसेंबर १८३० साली बुवासाहेब महाराज आणि आनंदीबाई यांच्या पोटी शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला. तर बुवासाहेब महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी नर्मदाबाई यांच्या पोटी शाहू उर्फ चिमासाहेब महाराजांचा जन्म झाला. १५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांच निधन झालं. लिहारी नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांनी स्थानिक लोकांनी तिथे महाराजांची समाधी बांधली. आजही कराचीमध्ये ती समाधी आहे. कोल्हापूरच्या रक्तात ज्यांनी क्रांतीची बीजे पेरली त्या महाराजांनी ती समाधी !!!*
🚩🚩⛳⛳⛳🚩🚩
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
⛳ *जय गडकोट*⛳
*!! हर हर महादेव !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री मंगेश चंद्रकांत वीर*
( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख )
मा श्री महेंद्र तानाजी देवघरे*
( अध्यक्ष पुणे जिल्हा )
मा श्री योगेशजी सुदामराव शेलार
(प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल)
महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल
#🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #📜इतिहास शिवरायांचा #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜