꧁शिवदिनविशेष ꧂

🆔Official_Sagar 💞💤👑
1.8K views
10 hours ago
🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६५६ छ्त्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर किल्ले प्रबळगड वर हिशोब तपासनीचे काम चालू. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६५९ छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभूंना हिरडस मावळ मधील किल्ले मोहनगड ची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांविषयी रामसिंगाकडे कालच्या प्रकरणाविषयी अधिक चर्चा केली व दरबारात युवराज शंभूराजांना सन्मान करुन वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली. रामसिंग महाराजांच्या भेटीस! राजांचा राग निवळावा म्हणून आज संध्याकाळी दरबारात शंभुराजांना बोलावून त्यांना भरजारी वस्त्रे, मोत्यांची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६७० मराठ्यांनी लोणावळा जवळील लोहगड नंतर विसापुर जिंकला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६७४ इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १६७७ छञपती शिवरायांची कर्नाटकातील दक्षिण दीग्विजय मोहीम महाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याची १ तुकडी पाठवली, परंतू किल्लेदार महंम्मदखान याने ५०,००० रुपयांच्या जहागिरीच्या मोबदल्यात किल्ला मराठ्यांना दिला व गडावर भगवे निशान फडकले. कुठलाही रक्तपात न होता हा किल्ला मराठ्यांना मिळाला. जिंजी चांगला मोठा व भक्कम किल्ला होता. ही बातमी मिळताच छत्रपती शिवाजीराजांनी जिंजीकडे कूच केले व त्याची पाहाणी केली. रायाजी नालगे यांना तिथले किल्लेदार म्हणून नेमले गेले. विठ्ठल पिळदेव अत्रे यांना जिंजी सुभ्याचे सुभेदार म्हणून नेमले गेले. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ९ मे ते १४ मे १६७७ छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी. राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 १३ मे १८१८ दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला. #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
🚩 शि🚩व 🚩भ 🚩क्त 🚩सा 🚩ग 🚩र🚩
1K views
12 hours ago
# *आजचे_शिव_दिनविशेष* 🚩 **१३ मे इ.स.१६७४* *छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" इंग्रजांचा वकिल "हेन्री ऑक्झिंडेन" मुंबईहून रायगडास येण्यास निघाला तो थेट कैरलई जवळच्या आगरकोट या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला.* 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩 ⛳शिवभक्त सागर⛳🚩 #꧁शिवदिनविशेष ꧂ #🙏 शिवराय स्टेटस #⛳जय शिवराय ⛳ इतिहास शिवरायांचा 🚩 #🚩🚩आम्ही शिवभक्त😍❤️🚩🚩 #😎✌️आम्ही नाशिककर✌️😎 🚩🚩MH15-NASHIK 🚩🚩
सचिन दादा पानसरे शिरवळ शहर
1.1K views
12 hours ago
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 📜 १३ मे इ.स.१६६६ (वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार) रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात! कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🚩शिवराय https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtube.com/shorts/fnjIXf-ZBhY?feature=share 📜 १३ मे इ.स.१६७१ महाराजांचे एक पत्र : "चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी क लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा." वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मे इ.स.१६७४ इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇 📜 १३ मे इ.स.१६७५ भूमीपुत्रांबद्दल १६७५ च्या एका पत्रात इंग्रज काय म्हणतात... १३ मे १६७५ ला मुंबईहुन एका इंग्रज अधिकाऱ्याकडुन राजापुरच्या अधिकाऱ्याला एक पत्र गेलं. हे पत्र जाण्यामागील पार्श्वभुमी अशी होती की अण्णाजी पंडिताद्वारे इंग्रजांना ५००० होन किंमतीचा माल विकला जाणार होता. या मालात नारळ आणि सुपारीचा समावेश होता. त्याकाळी नारळाचा दर अडिच लारी खंडी तर सुपारीचा दर ८० लारी खंडी असा होता. छत्रपती शिवाजी महाराज फक्त उत्तम प्रशासक नाही तर ते एक अत्यंत कुशल व्यापारी देखील होते. वेळेचा फायदा घेणे शिवरायांना चांगलेच ठाऊक होते. इ.स. १६६१ ला राजापुर लुटल्यानंतर महाराजांनी त्याची भरपाई देण्यास कबुल केले खरे पण त्यातील कीती पैसे वास्तविक इंग्रजांना मिळाले हा प्रश्नच आहे. त्यावर कधितरी सविस्तर लिहीला येइल. माझा हे सांगण्याचा उद्देश हा की होइल तेवढा नफा इंग्रजांकडुन महाराज कमवत होते. पैशाच्या बाबतीत तर महाराज अत्यंत दक्ष होते. वर सांगितल्या प्रमाणे ५००० होनाचा माल इंग्रज घेणार होते पण महाराजांनी त्या मालाची किंमत नारळाला ५ लारी खंडी तर सुपारीला १०० लारी खंडी लाउन त्यांना माल विकला. खरं तर हे लोक आपल्याला फ़सवत आहेत याची इंग्रजांना कल्पना आलीच असेल पण इंग्रज त्यावर फार काही बोलु शकत नव्हते. कारण पुढे महाराजांना भेटुन काही मागण्या त्यांना पुर्ण करुन घ्यायच्या होत्या. हि सर्व हकिकत १६७५ च्या एप्रिल महिन्यात घडली. राजापुरहुन ‘शिवाजी महाराज आम्हाला फसवत आहेत’ हि वार्ता मुंबई ला पोहोचली. मुंबई ला पत्र अधिकाऱ्याने वाचले. विचार करुन अधिकाऱ्याने राजापुर ला पुन्हा एक पत्र लिहिले त्या पत्रात अधिकारी लिहीतो, ‘महाग दरात नारळ आणि सुपारी देउन अण्णाजी आपल्यावर अन्याय करीत आहेत हे खरे आहे, पण इतरही व्यापाऱ्यांना हा माल अशाच किमतीत विकल्या जातो का हे आपल्याला तपासायला पाहिजे, शिवाजी राजांचा असा प्रघात असेल तर आपल्याला तक्रारीला जागा राहत नाही. पण तुम्ही अण्णाजीचा योग्य मान ठेवा.’ यापुढे अधिकारी जे लिहीतो ते या भुमिपुत्रांचे यश आहे. तो लिहीतो ‘ज्यांच्याशी तुम्हाला वागायचे आहे ते मराठे लोक चतुर आणि चौकस आहेत. त्यांच्याशी व्यवहार करतांना विचाराने करावा. भावनाप्रधान किंवा फाजील घमेंडखोर लोकांची केवळ कुचेष्ठा करुनच न थांबता ते त्यांच्यापासुन शक्य तितका आपला फायदा करुन घेतात’. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मे इ.स.१६८१ (ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार) किल्ले औरंगजेब बादशहाकडे अनेक सरदारांचे खोटे अर्ज! खान बहादुराचा अर्ज डाक चौकीने दरबारात आला. त्यात त्याने लिहिले होते की, "गनिमांची फौज औरंगाबादच्या भोवतालचा प्रदेश लुटण्यासाठी आली होती म्हणून खानजान, मुजफ्फरखान, रणमस्तखान, दाऊदखान वगैरे बादशाही सरदार स्वार होऊन तेथे पोहोचले. तर्फेची लढाई झाली. बादशाही सुदैवाने त्यांनी शत्रूंचे १५०० लोक मारले व अनेकांना जखमी केले. शत्रूने पळ काढला. बादशाही फत्ते झाली". ."औरंगजेब बादशहाचा दुसरा सरदार अनुपसिंग हाडा याने अब्दुल रहिमखान यास कळविले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगाबादेस झालेल्या लढाईत अत्यंत कष्ट घेतले आहेत. हुजूरास त्याचा पुर्ण अर्ज देत आहे, कृपेची आशा करतो. खान जहानबहादूर याने त्याचे ५०० जात ५००, पाचशे स्वार कमी केले होते. त्याच्या वाढीबाबत तजवीज केली आहे. असा अब्दुल रहिमखानाने बादशहाकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात आली. आशा आशयाची बढाई मारणारी पत्रे, खोटा आशय असणारी पत्रे लिहून, पाठवून बादशाही कृपा होण्यास लाळघोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते, म्हणूनच औरंगजेब मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवू शकला नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मे इ.स.१६९९ १३ मे १६९९ ला हेरकाऱ्याकडून बादशहास समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला. तेथील देशमुखाने ७ दिवस गढी लढविली. शेवटी धनाजीन जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याजकडून ४० हजार रुपये चौथ म्हणून घेतले. हे बादशहास कळताच त्याने चीनकुलीजखान बहादूर यांस धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवाच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मे इ.स.१७९० इस्माईल बेग नारनोळाहून पाटणास आला! पाटण हे जयपूरच्या उत्तरेस सुमारे ८० मैलावर आहे. नारनोळ हे ठिकाण पाटणचे उत्तरेस ३० मैलावर आहे. त्याच्या उत्तरेस २० मैलावर कानोड आहे. ही ठिकाणे जयपूरच्या शेखावत परगण्यात आहेत. इस्माईल बेग १३ मे इ.स.१७९० रोजी नारनोळाहून पाटणास आला. तेथे चोहोबाजूला पहाड आहेत. तो पाटणास मुक्काम करून राहीला. जयपुर आणि जोधपूरची फौज त्याच्या दिमतीला येणार होती. मराठ्यांच्या फौजा पाटणास नदीच्या अलीकडे होत्या. गोपाळराव रघुनाथ, अंबुजी इंगळे, काशीराव होळकर, नजफकुलीखान, रावराजा प्रतापसिंह, द वुआन्य याचे कंपू अशा लोकांच्या फौजा होत्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १३ मे इ.स.१८०३ सेनापती वेल्स्ली पुण्यास आल्यावर त्याने क्लोझला निरोप पाठवून बाजीरावास घेऊन पुण्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार क्लोझ पेशव्याला घेऊन ता. १३ मे १८०३ रोजी पुण्यात आला व शनिवारवाड्यात मोठ्या समारंभाने इंग्रजांनी ‘ हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादूर ‘ यांची मसनदीवर स्थापना केली. या निमित्ताने पेशव्याने अधिकार धारण केल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. खेरीज इंग्रजांनी पुण्यातील आपल्या तळावर तसेच मुंबई, कलकत्ता, मद्रास, सुरत व श्री रंगपट्टण येथे खुशालीच्या तोफांची सरबत्ती करून हिंदुस्थानची अप्रत्यक्ष मालकी आपणांकडे आल्याचे सर्वांना जाहीर केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
❤🚩शिवभक्त🚩❤
2.8K views
21 hours ago
*महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल* *इतिहास शिवरायांचा* ********************************** *शिव दिनविशेष* 🚩🚩🚩⛳⛳⛳⛳🚩🚩🚩 *१३ मे इ.स.१६५९* *छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६६६* *(वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)* *रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात!* *कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७०* *मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७४* *इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कैरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६७७* *(वैशाख वद्य सप्तमी, शके १५९९, संवत्सर पिंगळ, वार रविवार)* *मराठ्यांनी जिंजी काबीज केली.* *किल्ले जिंजीचे शिवकालीन नाव चंदी तत्कालीन जिंजीचा सरदार नासीर मुहंमद याने महाराजांच्या हल्ल्यानंतर फारसा प्रतिकार न करता हा किल्ला महाराजांनी जिंकला. महाराजांना या किल्ल्यामुळे दक्षिणेत एक सुरक्षित आणि बळकट ठाणे निर्माण झाले. रायाजी नलगे याला किल्ल्याची हवालदारी तर तिमाजी केशव यांना किल्ल्याची सबनिशी दिली. काही फेरफार व इमारती बांधण्यासाठी रुद्राजी साळवी यांना या कामी नेमले. महाराजांना जिंजी काबीज झाल्याची बातमी मिळाली आणि पुढील काही दिवसातच महाराज जिंजीस रवाना झाले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६८१* *(ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार शुक्रवार)* *किल्ले औरंगजेब बादशहाकडे अनेक सरदारांचे खोटे अर्ज!* *खान बहादुराचा अर्ज डाक चौकीने दरबारात आला. त्यात त्याने लिहिले होते की, "गनिमांची फौज औरंगाबादच्या भोवतालचा प्रदेश लुटण्यासाठी आली होती म्हणून खानजान, मुजफ्फरखान, रणमस्तखान, दाऊदखान वगैरे बादशाही सरदार स्वार होऊन तेथे पोहोचले. तर्फेची लढाई झाली. बादशाही सुदैवाने त्यांनी शत्रूंचे १५०० लोक मारले व अनेकांना जखमी केले. शत्रूने पळ काढला. बादशाही फत्ते झाली". ."औरंगजेब बादशहाचा दुसरा सरदार अनुपसिंग हाडा याने अब्दुल रहिमखान यास कळविले की, "मी छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगाबादेस झालेल्या लढाईत अत्यंत कष्ट घेतले आहेत. हुजूरास त्याचा पुर्ण अर्ज देत आहे, कृपेची आशा करतो. खान जहानबहादूर याने त्याचे ५०० जात ५००, पाचशे स्वार कमी केले होते. त्याच्या वाढीबाबत तजवीज केली आहे. असा अब्दुल रहिमखानाने बादशहाकडे अर्ज केला व त्याप्रमाणे त्यास वाढ देण्यात आली. आशा आशयाची बढाई मारणारी पत्रे, खोटा आशय असणारी पत्रे लिहून, पाठवून बादशाही कृपा होण्यास लाळघोटेपणा करणारे हे सरदार औरंगजेबाच्या पदरी होते, म्हणूनच औरंगजेब मराठ्यांवर निर्णायक विजय मिळवू शकला नाही.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१६९९* *१३ मे १६९९ ला हेरकाऱ्याकडून बादशहास समजले की धनाजी जाधव यांनी पिठूरच्या गढीला वेढा घातला. तेथील देशमुखाने ७ दिवस गढी लढविली. शेवटी धनाजीन जाधव यांनी देशमुखास कैद केले आणि त्याजकडून ४० हजार रुपये चौथ म्हणून घेतले. हे बादशहास कळताच त्याने चीनकुलीजखान बहादूर यांस धनाजी जाधवांचे पारिपत्य करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो जाधवाच्या पारिपत्यासाठी परंडा भागात पोहोचला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१८०३* *१३ मे १८०३ रोजी सर ऑर्थर वेलस्ली याने बाजीराव पेशव्यांना (दुसरे) 'हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहाद्दर' अशी उपाधी बहाल करून पुन्हा पेशव्यांच्या मसनदीवर बसवले.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *१३ मे इ.स.१८१८* *दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.* 🚩🚩⛳⛳⛳🚩🚩 *जय जगदंब जय जिजाऊ* *जय शिवराय जय शंभूराजे* ⛳ *जय गडकोट*⛳ *!! हर हर महादेव !!* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री मंगेश चंद्रकांत वीर* ( भोर तालुका गड किल्ले संवर्धन सेल सोशल मीडिया प्रमुख ) मा श्री महेंद्र तानाजी देवघरे* ( अध्यक्ष पुणे जिल्हा ) मा श्री योगेशजी सुदामराव शेलार (प्रदेशाध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल) महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल #📜इतिहास शिवरायांचा #🚩जय भवानी जय शिवाजी🚩 #🙏 शिवराय स्टेटस #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
🆔Official_Sagar 💞💤👑
614 views
1 days ago
🚩☝️ राजश्री स्वामींचे उपकार जे आज आम्ही हिंदू म्हणवून पृथ्वीवर जगत आहोत. हे अवघ्यानी ध्यानात ठेवावे 🙇🚩 रणधुरंदर छत्रपती शंभूराजे जयंती ⚔️🔥 🚩🚩 【 अवघे ०२ दिवस 🚩 】 🚩🚩 १४ मे 🚩🚩 【 अवघे ०२ दिवस 🚩 】 🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त