शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

mahesh m. shirkar
620 views
1 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१३ ऑगस्ट इ.स.१६५७* छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहाजीराजांच्या सुटके करिता परत दिलेला. सिंहगड विजापुरच्या आदिलशाहीच्या कब्जात होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
648 views
3 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *12 आँगस्ट 1683* पोर्तुगीज विजरईज छ.संभाजी महाराज यांना पकडनार होते त्यांना छ.संभाजी महाराज पंचगंगा नदिवर नारवे येथे आंघोळीसाठी आष्टमी दिवशी येणार हि बातमी समजली. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
1.4K views
4 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* ११ ऑगस्ट इ.स.१६७८ शिवरायांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची एक वर्षानंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू
mahesh m. shirkar
931 views
5 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *१० ऑगस्ट इ.स.१६४८* छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळचे ठाणे जिंकले. *१० ऑगस्ट इ.स.१६६०* "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली. *१० ऑगस्ट इ.स.१६६६* "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती. *१० ऑगस्ट इ.स.१७४९* चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. *१० ऑगस्ट इ.स.१७५५* थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म. . *१० ऑगस्ट इ.स.१७६०* सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
771 views
6 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *९ ऑगस्ट इ.स.१६५४* छत्रपती शिवरायांनी निळोपंताना पुरंदर साठी इनामपत्र दिले. *९ ऑगस्ट इ.स.१६४८* पुरंदर - खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
684 views
7 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* ८ ऑगस्ट इ.स.१६४८ पुरंदरावर स्वराज्याची पहिली लढाई. पुरंदर खळत-बैलसर येथे स्वराज्याची पाहिली मोठी लढाई. आदिलशाही सरदार फत्तेखानाच्या एकुण ६०००च्या फौजेचा शिवरायांनकडून सपशेल पराभव. फत्तेखानाच्या ३००० फौजेविरुद्ध खुद्द छत्रपती शिवराय चालून गेले. ह्या लढाईमध्ये फत्तेखान जबर जखमी होउन पसार झाला. ही लढाई खळत-बैलसर येथे झाली. तर पुरंदर-सासवड येथे आदिलशाही सरदार हैबतराव याच्याशी लढताना 'बाजी पासलकर' यांना वीरमरण आले. *८ ऑगस्ट इ.स.१६८३* चौलच्या वेध्याचे काम निळोपंत पेशवे यांच्याकडे होते त्यांनी ते स्थळ हस्तगत करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेले असता चौलच्या तटावर मराठ्यांनी निकराचा हल्ला केला, त्या प्रसंगात पोर्तुगीझांनी पुष्कळ मराठे कापून काढले. जवळच कोरलाइचा किल्लाही पोर्तुगीझांच्या ताब्यात होता त्यावरसुद्धा मारात्र्ह्यांनी छापा घातला. पुष्कळ मराठे धारातीर्थ पडले पण स्थळ हाती आले नाही. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
mahesh m. shirkar
722 views
8 days ago
⛳ *शिवविचार प्रतिष्ठान* ⛳ *७ ऑगस्ट इ.स.१६७५* शिवराय कोल्हापुर विभागात दाखल कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले. *७ ऑगस्ट इ.स.१६७९* किल्ले खांदेरी-उंदेरी वर शिवरायांच्या आदेशावरून गोड्या पाण्याचे झरे खोदुन तेथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
1.9K views
9 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *६ ऑगस्ट इ.स.१६५७* छत्रपती शिवरायांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला. *६ ऑगस्ट १६४८* छत्रपती शिवरायांनी "किल्ले पुरंदर" वर हल्ला केला. किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल. *६ ऑगस्ट इ.स.१६५९* ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला 'मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान' असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण - भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- "शहाजी राजेंचा मुलगा (शिवबा राजे) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत." #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
mahesh m. shirkar
956 views
10 days ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *५ ऑगस्ट इ.स.१६५२* हिरडस मावळ मधील खोपडे देशमुख घराणे यांच्यात नेहमीच भाऊ बंदकीचा वाद व्हायचा अखेर शिवरायांच्या मध्यस्थीने पूर्णपणे हा वाद मिटवला गेला. *५ ऑगस्ट इ.स.१६७७* छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते. या कारवाईमुळे व्यंकोजी राजे महाराजांवर रागावुन निघून गेले. शिवरायांनी दक्षिणेतील एलवनसूर किल्ला जिंकला. #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर