शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩

mahesh m. shirkar
529 views
11 hours ago
*शिवविचार प्रतिष्ठान* *५ सप्टेंबर इ.स.१६५९* युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या पत्नी, महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री, निंबाळकर घराण्याची लेक सौभाग्यवती, स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई राणीसाहेब यांचा आज स्मृतिदिन. *५ सप्टेंबर इ.स.१६६१* शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला. *५ सप्टेंबर इ.स.१६६५* छ. संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी. *५ सप्टेंबर इ.स.१६७६* छत्रपती शिवरायांनी ही रयतेची राज्यव्यवस्था ही गोम अगोदरच ओळखली होती. शेती नि शेतकरी टिकावा म्हणून त्यांनी सक्त ताकीद दिली होती सरदार, जहागीरदारांना. ५ सप्टेंबर १६७६ रोजीचे रयतेच्या राजाचे एक पत्र प्रशासनावर कशी जरब असावी याचे उत्तम उदाहरण आहे. कोकणातील प्रभावळीचे सुभेदार रामजी अनंत यांना महाराजांनी पत्र लिहून शेतकर्‍यांची काळजी वाहण्याचा हुकूम दिला. प्रजेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. शेती करायला प्रोत्साहन द्यावे. ज्यांच्याकडे शेती नाही, बैल नाही त्यांना बारदाणा पुरवावा. हीच सेवा केली तरी राज्याच्या खजिन्यात भर पडेल असे समजावे असा मांदियाळ मजकूर पत्रात आहे. दूरदृष्टी व रयतेच्या भल्याची तळमळ यातून दिसते. #🙏शिवदिनविशेष📜 #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
678 views
5 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *३० ऑगस्ट इ.स.१६५८* च्या रात्री औरंगजेबाचा गुलाम नजर बेग आणि त्याच्या साथीदारांनी दाराच्या तुरुंगाला भेट दिली. तेथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे जागच्या जागी तुकडे केले. अश्या प्रकारे वारसाहक्काच्या युद्धात औरंगजेबाचा विजय झाला. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕
mahesh m. shirkar
1.1K views
7 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२९ ऑगस्ट इ.स.१६६७* शिवराय किल्ले राजगडवर मुक्कामी आले. *२९ ऑगस्ट इ.स.१६६६* आग्रा सुटकेनंतर मुघल सैन्याने शिवरायांचे मावळे समजून भलत्याच तीघा व्यक्तींना घोलपूर येथे अटक केली. *२९ ऑगस्ट इ.स.१६८२* स्वराज्याचा शिलेदार आणि छत्रपती संभाजी महाराजांचा निष्ठावंत सेवक परशुराम जोगी यास रूहल्लाखानने फितुरी करुन साल्हेरचा किल्ला ताब्यात घेण्याची फुस लावली पण त्याला न जुमानता साल्हेर किल्ला स्वराज्यातच सुरक्षित राहीला. #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
788 views
8 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२८ ऑगस्ट इ.स.१६६७* औरंगजेब बादशहाच्या आदेशाने मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर बुऱ्हाणपूर येथे विषप्रयोग करून त्यांना ठार करण्यात आले. *२८ ऑगस्ट इ.स.१६७९* छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले. मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी-उंदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले. मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला. *२८ ऑगस्ट इ.स.१६८२* दंडाराजपुरीचा फौजदार याकुतखान व खैरातखान ह्यास देण्याकरिता उत्तम पोशाख बहरामंदखानाच्या हवाली करण्यात आला. *२८ ऑगस्ट इ.स.१६८२* सिद्दीने मराठ्यांच्या ( नागोठणे ) प्रदेशात घुसून अनेक लोकांना त्रास दिला. बर्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडून मुंबईस नेले. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
1.6K views
10 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *#छत्रपती शंभूराजे* छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघी आठ-नऊ वर्षांची; पण केवढी संघर्षमय! घरीदारी शत्रू आणि सीमांवरही शत्रू! त्या सर्वांशी एकाच वेळी संघर्ष. अशा संघर्षातील दोन घटना पाहा. पहिली घटना आहे जून-जुलै १६८२ ची. औरंगजेबाने स्वराज्याच्या सर्व सीमांतून आपल्या फौजा आत घुसविल्या व प्रखर हल्ले चढविले; पण छत्रपती संभाजी महाराजांनी तितकाच प्रखर प्रतिकार करून हे सर्व हल्ले परतवून लावले. मराठ्यांचे स्वराज्य हां हां म्हणता बुडवून टाकू, अशी उमेद धरून व घमेंड बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला हा फार मोठा धक्का होता. या संदर्भात इंग्रज आपल्या पत्रव्यवहारात लिहितात "बादशहाला आलेल्या अपयशाने तो इतका चिडून गेला की, त्याने आपल्या डोक्यावरची पगडी त्राग्याने फेकून दिली असून, संभाजीराजाचा नायनाट केल्याशिवाय ती पुन्हा डोकीवर न घालण्याची त्याने शपथ घेतली आहे!" दुसरी घटना आहे, पुढच्याच वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यातील. स्वराज्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या फोंडा किल्ल्यावर चाल करून आलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयचा छत्रपती संभाजी महाराजांनी सपाटून पराभव केला आणि त्याला गोव्याकडे पळवून लावले! गोव्यापर्यंत त्याचा पाठलाग करून महाराजांनी पोर्तुगीजांचे जुवे बेट काबीज केले. आता पुन्हा व्हाइसरॉय जुवे बेटावर चालून आला. तेव्हा त्याला पुन्हा इतका जबरदस्त मार दिला की, त्याला पळता भुई थोडी झाली! कसाबसा तो आपल्या राजधानीत पोहोचला. संभाजी महाराजांची आता प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी होणार, हे स्पष्ट दिसू लागताच व्हाइसरॉयने सेंट झेवियरची शवपेटी उघडून त्याच्या पायाशी त्याने आपला राजदंड ठेवला आणि गोव्याचे रक्षण करावे म्हणून डोळ्यांत अश्रू आणून त्याने झेवियरची प्रार्थना केली! #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
718 views
11 days ago
👑 ⛳शिवविचार प्रतिष्ठान ⛳👑: *#शिवविचार_प्रतिष्ठान* २५ ऑगस्ट इ.स.१६७४ मराठ्यांनी फोंडा किल्ल्यावर हल्ला केला. मात्र आण्णाजी पंताच्या मूर्खपणामुळे प्रयत्न फसला. परंतु नंतर १६ मे १६७५ रोजी हा किल्ला स्वराज्यात आला *फोंडयाचं युद्ध :-* मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील प्रदेशाची केलेली हालत पाहून विजरई पुरता संतापला , तो उत्तर प्रदेशात मराठ्यांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता , आणि तेथील पोर्तुगीज फिरंग्यांस मदतही पाठवू शकता नव्हता . त्यामुळे त्याने फोंडा दुर्गावर हमला करण्याचे योजिले , जेणेकरून की , मराठ्यांचे लक्ष फोंडयाकडे केंद्रित केलं जावं , असा त्या व्हाईसरॉयचा डाव होता . *फोंडा दुर्गाबद्दल माहिती* : - दुर्ग अतिशय मजबूत बांधणीचा , तसेच भिंती रुंद व जाड होत्या , तटबंदीदेखील अभेद्य होती , बुरूज वर्तुळाकार रचनेत होते . दि. १६ मे १६७५ ला , फोंडा दुर्ग , छत्रपती शिवरायांनी जिंकला ; त्यामुळे अंत्रुजा , बाळी , चंद्रवाडी , अष्टगार , हमाडबासे , काकोडे , सांगे , केपे आणि काणकोण हे महाल हिंदवी स्वराज्यात आले होते . किल्ला एकंदरीत मजबूत स्थितीत होता , कारण शिवरायांनी स्वतः त्यात काही बदल करून त्यास प्रबळ बनविले होते . दि. २७ ऑक्टोबर , १६८३ रोजी , व्हाईसरॉय आगाशीजवळ १२०० पोर्तुगीज शिपाई , २५०० साष्टीतील शिपाई , ३ नामचिन कॅप्टन तसेच ६ आधुनिक तोफा आणि गरजेचे युद्धसाहित्य व धान्यसामग्री यांसह पोहोचला . पुढे त्याने दुर्भाट घेतले [ इथे फितुरी झाली होती ] , दुर्भाट हे बंदर याआधी मराठ्यांकडे होते . त्यावेळी ३०० मराठे फिरंग्यांवर चालून गेले मात्र फिरंग्यांच्या सैन्यबळापुढे मराठ्यांस माघार घ्यावी लागला पुढे दि. १ नोव्हेंबर १६८३ रोजी ,व्हाईसरॉय आपल्या फिरंगी फौझेनिशी फोंडया - दुर्गाजवळ आले , त्यासमयी फोंडयाचे किल्ले - दार , पायदळाचे सेनापती , शूरवीर येसाजी कंक होते , तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे पराक्रमी पुत्र कृष्णाजी कंकही होते , आणि ६०० मावळे होते , व २०० मावळे नजदिकच्या जंगलात होते . त्यावेळी छत्रपती शंभूराजे राजापूर येथे होते व्हाईसरॉयने फोंडा दुर्गाच्या महादरवाज्याच्या बरोबर समोरील टेकडीवर त्याने तोफा डागल्या , आणि इशारा देऊन मारा सुरु केला . गडावरूनही तीव्र प्रतिकार होत होता , सलग ३ दिवस तोफगोळ्यांचा वर्षाव हा चालूच होता , पण तटबंदी काही केल्या पडत नव्हती , मात्र एक बुरूज ढासळला , येसाजी हे योग्य नियोजनपद्धतीने किल्ला लढवीत होते . व्हाईसरॉयने त्याच्या कॅप्टनला खंदक बुजविण्याचा आदेश दिला , कॅप्टनने कानडी लोकांच्या मदतीने बुजविला . गडावर येसाजी आणि मर्द मराठे पराक्रमांची शर्थ करत होते , व्हाईसरॉयने ही हल्ला तीव्र केला , आणि तोफांच्या प्रभावी माऱ्यामुळे तटबंदीला बगधाड पडलं आता मराठ्यांच्या चिंता वाढल्या , तरीही चिवट मराठे किल्ला लढवीत होते , आता त्या तटबंदीच्या आतून शिरणार , व अखेरचा हल्ला करणार असा फिरंग्यांचा डाव होता आणि तितक्यात विजरईच्या सैन्याच्या मागून प्रचंड धुळीचे लोट उठले , येसाजी बुरूजावरून दुर्बिणीच्या मदतीने बघत होते , आणि पाहतात तर काय , स्वतः धनी !!!!!! शंभुराजांना पाहून येसाजींचा आनंद गगनात मावेना , राजे १५०० घोडदळ आणि निवडक पायदळानिशी आले , आता फिरंगी चांगलेच फसले . शंभूराजे स्वतः आलेत हे फिरंगी सैन्याला कापर फुटलं , यांच्यात प्रचंड घबराट निर्माण झाली , राजांनी विद्युत वेगाने फिरंग्यांवर आक्रमण केले . राजांना बहिर्जी नाईकांनी एक गुप्त खबर दिलेली की , रणांगणात व्हाईसरॉय नेमकी कुठे होता , राजांनी ते स्थान बरोबर हेरले , मराठे - फिरंगी सैनिकांत युद्ध सुरू झाले ,मराठे त्वेछाने लढत होते , राजांनी व्हाईसरॉय फ्रान्सिस्कु द तांव्हर कोंद - दी - आल्व्हर याला , एका घोड्यावर बसून लढताना पाहिले , राजे त्याच्यावर चालून गेले , एक वार केला , पण व्हाईसरॉय वाचला , त्याला त्याच्या कॅप्टनने सुरक्षित जागी लगोलग हलविले , 【 परंतु सांगायची गोष्ट तो वार थोड्या अंतराने हुकला , वार हा विजरईच्या मानेवर होणार पण त्याने मान मागे वळविली , व तलवार ही त्याच्या शिरस्थानाला लागून , तो ज्या घोड्यावर बसला होता त्याच्या मानेवर तलवारीचा घाव बसला , आणि घोड्याची मान ही जमिनीवर पडली , हे पाहून विजरईला प्रचंड धडक बसली , कदाचित त्याने विचार केला असावा , अरे एका वारात जो आपल्या घोड्याची गर्दन कलम करू शकतो , जर तो वार आपल्यावर झाला तर काय होईल ? किती भयावह असेल ते ?????】, आणि रणसंग्राम चालू होता , अखेर अंधार पडला आणि युद्धविराम झाला व्हाईसरॉयने त्या दिवशी , रणांगणातील शंभूराजांना पाहून , त्यास चांग -- लीच वचक भरली , त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला , ह्या आदेशामुळे फिरंगी सैन्यास खूपच बरे वाटले आणि दि. १० नोव्हेंबर १६८३ रोजी , फोंडयातून पळ काढला .कृष्णाजी कंक यांनी , निवडक फौझेनिशी विजरईचा पाठलाग केला , दुर्भाट येथे चकमक झाली , दुर्भाटच्या नजदिक टेकडीपाशी काही फिरंगी सैनिक दबा धरून बसले होते , जेव्हा विजरईचा पाठलाग करत करत मराठे त्या टेकडीजवळ आले , विजरई निसटताना दिसला , तेव्हा कृष्णाजी कंक तेज गतीने चालून गेले , पण टेकडीवरील फिरंग्यांच्या टप्प्यात जसे मराठे आले , तसा बंदुकीने मारा सुरू झाला , कृष्णाजी आघाडीवर होते , मारा अतिशय प्रभावी असल्यामुळे कृष्णाजी आणि काही मावळे जब्बर जखमी झाले . कृष्णाजी कंक यांना अनेक गोळ्या लागल्या होत्या , मराठ्यांना त्यासमयी माघार घ्यावी लागली , त्यांना गडावर आणण्यात आले . सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू झाले , कृष्णाजी यांच्या जखमा काही केल्या भरून येत नव्हत्या , अखेर त्यांनी गडावर देह ठेवला , मावळे सुद्धा धारातीर्थी पडले , तर अनेक मावळे जखमी झाले , राजांना अपरिमित दुःख झाले , राजांनी येसाजी कंक यांचे सांत्वन केलं फोंडयाजवळ पोर्तुगीजांचा छत्रपती संभाजी महाराजांनी दारून पराभव केला , तो इतका जबरदस्त होता की , पोर्तुगीज फिरंग्यांना मराठ्यांनी पळून पळून मारलं ........इतका भीषणरीत्या पराभव प्रोतुंगीजांना स्वीकारावा लागला होता ,मराठ्यांनी पोर्तुगीजांचे बहुत युद्धसाहित्य जप्त केले होते . पुढे २ ते ३ दिवस राजे फोंडा दुर्गावरच होते . फोंडयाच्या लढाई नंतर , छत्रपती संभाजी महाराज राजधानीकडे जातील असा , व्हाईसरॉयचा कयास होता , पण संभाजी महाराजांनी कडक शासन करण्याचे ठरविले होते . राजांनी दि. २४ नोव्हेंबर , १६८३ रोजी , गोवे प्रांतातील जुवे बेटावरील कोट व एकंदर प्रदेश हस्तगत केला . ही खबर जेव्हा गोव्यात समजली तेव्हा तिकडे हाहाकार उडाला , कारण आता फक्त खाडी ओलांडली की , मराठे राजधानी गोव्यात प्रवेशणार होते , आणि मराठ्यांचं शौर्य पाहून फिरंगी सैनिकांत , मराठ्यांबद्दल प्रचंड दहशत होती , " हे व्हाईसरॉय जाणून होता " . व्हाईसरॉयने त्याच्या युद्धमंडळाची तात्काळ बैठक घेतली , आणि मराठ्यांनी खाडी ओलांडण्याच्या अगोदर आपणाचं त्यांच्यावर हल्ला करून रोखू जेणेकरून पोर्तुगीजांची राजधानी गोवा वाचविता येईल हा मनसुभा होता . त्याप्रमाणे व्हाइसरॉय आपल्या फौजेसह मराठ्यांवर , जुवे बेटावर चालून आला , राजांनी त्याला आत येऊन दिले . आणि मराठ्यांनी जो प्रतिहल्ला केला , त्याचे वर्णन करणे महाकठीण , मराठे पोर्तुगीजांना सपासप कापत होते , खंडोजी बल्लाळ ह्यांनी तर मोठा पराक्रम गाजविला होता . फोंडयाप्रमाणे , पोर्तुगीजांनी पळ काढावयास सुरुवात , व्हाईसरॉय जेव्हा पळत होता , तेव्हा राजांनी त्याचा पाठलाग सुरू केला , काही अंतरावर त्याकरिता बोटीची व्यवस्था केली होती . अखेर त्याने बोट गाठली . व्हाईसरॉय होडीतून बसून गोव्यात जाण्याच्या बेतात होता , तितक्यात त्याची नजर तेज घोड्यावर स्वार होऊन येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज , यांच्याकडे गेली तो होडीत बसून निघाला , राजेही पाण्यात उतरले ते ही घोड्यानिशी , तेवढयात राजे खूप पुढे गेले , पाण्याचा प्रवाह खूपच जोर धरत होता , व्हाईसरॉय देखील खूप पुढे होता , राजेही पाठलाग करनारच पण खंडोजी बल्लाळ यांनी घोड्यावरून उडी मारली , आणि पोहून राजांच्या घोड्याचा लगाम खेचला व राजांचा जीव वाचविला ; कारण निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही . व्हाईसरॉय ह्यावेळी जखमी झाला होता , केवळ दैव चांगले म्हणोनिच तो वाचला , तसेच चिटणीस खंडोजी बल्लाळ यांची स्वामिनिष्ठा उल्लेखनीय आहे . पुन्हा मोठा पराभव पत्करून , पळ काढीत , व्हाईसरॉय गोव्यात आला , त्यासमयी राजधानीची परिस्थिती अशी झाली होती , ह्याचे सुरेख वर्णन , पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे , सरदेसाई म्हणतात , " इकडे व्हाईसरॉयने जुवे बेटातून पळून शहरात प्रवेश केला , तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले , सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता , ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते , ते पाहताच व्हाईसरॉयही गर्भगळीत झाला . त्याला काही सुचेना , तेव्हा त्याने सेंट झेवीयरला शरण जायचे योजिले , आणि तो चर्चकडे निघाला , त्याच्याबरोबर लोकांचा मोठा एक जमाव होता . सगळेजण मशाली पेटवून सेंट झेवीयरची शवपेटी ज्या तळघरात ठेवलीहोती , तिथे जाऊन त्यांनी ती शवपेटी उघडली . व्हाईसरॉयने आपला राजदंड आणि इतर राजचिन्हे झेवीयरच्या पायापाशी ठेविले , तसेच त्या राजचिन्हाबरोबर , व्हाईसरॉयच्या सहीचा एक कागद होता , त्या कागदाच्या वतीने त्याने गोव्याचे राज्य सेंट झेवीयरला अर्पण केले , व त्याने चमत्कार करून शत्रूला माघारा परतवून लावावे , अशी याचना केली होती . विजरई मग झेवीयरच्या डोक्याजवळ गेला व डोळ्यात अश्रू आणोन त्याने त्याची करुणा भाकली " . #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
1.6K views
12 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२४ ऑगस्ट इ.स.१६५७* औरंगजेबाकडून सर्व आदिलशाही बुडवली गेली तर तो अधिक प्रबळ बनेल व शहाजहाननंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून त्याची ताकद वाढेल, म्हणून दारा शुकोहने शहाजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. **२४ ऑगस्ट इ.स.१६७७* दक्षिण दिग्विजय मोहीम- छत्रपती शिवरायांनी उत्तर कर्नाटक जिंकले. *२४ ऑगस्ट इ.स.१६८०* राजसत्ता हातात आल्यावर छत्रपती संभाजीराजांनी साधूसंताबद्दल आदर व पूज्यभाव प्रकट केला त्याचवेळी म्हणजेच मंचका रोहाणानंतर १ महिन्याने म्हणजेच ( २४ ऑगस्ट १६८०, शके १६०२ भाद्रपद शुध्द दशमी , सोमवार ) या दिवशी संभाजीराजांनी पूर्वी राज्याधिकार प्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्याच्या इच्छेने ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ , ग्रामनिवासी बाकरे शास्त्री जामदग्न्य गोत्री आश्वलायन सूत्री हृग्वेदांतर्गत सकल शाखाध्यायी , कुऱ्हाडे, ब्राम्हण, परशुराम क्षेत्रातील कुडाळ येथील नाग्रोपाध्याय, बाकरे आडनावाचे नामदेव मट्टाचे पुत्र, महाशय सर्व मान्त्रीकात श्रेष्ठ यांना प्रतिवर्षी १०,००० होणांचे दानपत्र करून दिले #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🙏शिवदिनविशेष📜 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
862 views
13 days ago
*#शिवविचार;प्रतिष्ठान* *२३ ऑगस्ट इ.स.१६६३* छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे जिंकून ताब्यात घेतले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैनिकांनी कवी परमानंद यांना दौसा येथून ताब्यात घेतले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* आग्रा कैदेतील सुटकेनंतर शिवरायांनी होडीच्या मदतीने शाही दस्तक दाखवून चंबळ नदी पार करुन पुढे गेल्याचे परकाल दासाने कल्याण दासास पत्र लिहून कळवले. *२३ ऑगस्ट इ.स.१६६६* फिदाईखानच्या तपासावरून शिवरायांनी घोड्यावरुन नरवीरची घाटी पार केली. या सर्व बाबतीत दस्तक व्यवस्थित न तपासण्याच्या आरोपातून नरवीर घाटीचा फौजदार ईबादुल्लाखानची मनसबदारी बादशाहने ५०० घोडेस्वाराने कमी केली. #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🚩छत्रपति शिवाजी महाराज
mahesh m. shirkar
1.8K views
15 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२१ ऑगस्ट इ.स.१६८८* माहुली गड मुघलांच्या ताब्यात गेला. *२१ ऑगस्ट इ.स.१६६२* छत्रपती शिवरायांनी रामराजपंतांच्या जागी "नरहरी आनंदराव" यांना पेशवेपदी नेमले, तर "अण्णाजी दत्तो" यांना वाकनिशी दिली. तसेच इतर काही मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली. *२१ ऑगस्ट इ.स.१६८१* औरंगजेबाने आपला दुसरा मुलगा आज्जम याला “शहा” हि पदवी देवून दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवले. *२१ ऑगस्ट इ.स.१६८२* "किल्ले रामशेज" मराठ्यांकडून जिंकण्यासाठी मुघल सरदार "कासीमखान" याने कील्ल्याच्या बरोबरीने डेरे (मनोरा) उभे केले. पण मराठ्यांनी रात्रीतच ते नेस्तनाबूत केले. #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕 #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🙏शिवदिनविशेष📜 #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩
mahesh m. shirkar
1.6K views
17 days ago
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१९ ऑगस्ट इ.स.१६७५* छत्रपती शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली. *१९ ऑगस्ट इ.स.१६००* बुर्हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला. *१९ ऑगस्ट इ.स.१६६६* शिवराय औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा छत्रपती शिवराय सुटले आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले होते .महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले होते . *१९ ऑगस्ट १६८९* छत्रपती राजाराम महाराज जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले. #🗿शिवकालीन पुराणवस्तू #🚩छत्रपति शिवाजी महाराज #शिव विचार प्रतिष्ठान 🚩🚩🚩 #🙏शिवदिनविशेष📜 #🚩महाराष्ट्रातील गडकिल्ले🛕